पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेबाबत विभागीय अग्निशमन अधिकारी ईबी मॅटले यांनी सांगितले की "आज सकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. दुकानात खूप धूर होता. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आणि खाली येऊ न शकणाऱ्या लोकांना टेरेसवर नेण्यात आले. पाळीव प्राण्यांनाही सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. एकूण २४ जण, दोन कुत्रे आणि एका मांजरीलाही वाचवण्यात आले आहे. आता परिस्थिती सामान्य आहे."
Mumbai Showroom Fire : मुंबईतील पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूमला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखलमुंबईतील पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूमला आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. ५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमचे लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर वाहनाने ते जयसिंगपूरला जातील. त्यांच्या हस्ते शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमचे लोकार्पण होणार आहे. तेथून रात्री आठ वाजता ते कोल्हापूर विमानतळावर येतील. तिथून मुंबईकडे रवाना होतील.
Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमीरायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड येथे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
Supreme Court : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनवी दिल्ली : शिवसेना पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मुद्द्यावर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सात तारखेच्या कामकाजात या खटल्याचा समावेश करण्यात आला आहे. याच खंडपीठासमोर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाच्या संदर्भात १४ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षांपेक्षा जास्त काळ दोन्ही खटल्यांवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे उभय खटल्यांची होत निकाल लागणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Boot Factory Fire : कानपूरमधील बूट कारखान्यात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीरकानपूरमधील रहिवासी भागात चालणाऱ्या बेकायदेशीर बूट कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पाच मजली इमारतीत पसरली. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकांनी रात्रभर काम केले.
मागील काही दिवसांपासून भारताविरोधात गरळ ओकत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांची ‘एक्स’ खाती भारतात बंद करण्यात आली आहेत. भारताविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवत असलेली १६ युट्यूब चॅनेल अलीकडील काळात बंद करण्यात आली होती, तर हनीया अमीर, माहिरा खान, अली जाफर अन्य काही कलाकारांची सोशल मीडिया खात्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता.
Gokul Milk Rate Hike : 'गोकुळ'चे दूध दोन रुपयांनी महागले, आजपासून नवे दर लागूकोल्हापूर : गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. ५) नवे दर लागू होणार आहे.
Weather Update : राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारीपुणे : कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज (ता. ५) राज्यात पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
12th Exam Result : बारावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीरपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ५) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य मंडळ यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करणार असून, हा एक नवा विक्रमच आहे. तसेच, यंदा पहिल्यांदा डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध केली आहे.
India Government : भारत सरकारने चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाकिस्तानात वाहणारे पाणी केले बंदLatest Marathi Live Updates 5 May 2025 : माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. तसेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणीवाटप करार स्थगित करणाऱ्या भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक दणका देताना जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाकिस्तानात वाहणारे पाणीही बंद केले आहे. याशिवाय, मागील काही दिवसांपासून भारताविरोधात गरळ ओकत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांची ‘एक्स’ खाती भारतात बंद करण्यात आली आहेत. कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज राज्यात पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..