मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात वानखेडे स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स या दोघांचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी घोर निराशा केली. मुंबईच्या मुख्य 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र सूर्या आणि जॅक्स या दोघांनी काही वेळ मैदानात घालवला. जॅक्सने अर्धशतकी खेळी केली. तर सूर्याने 35 धावांची खेळी केली. तर अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने 27 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 150 मजल मारता आली.