बदलापूरमध्ये केंद्रीय गृह विभागाच्या सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं.
बदलापूर पूर्वेच्या शिरगाव माऊली चौकात हे मॉकड्रिल पार पडलं.
या मॉकड्रिलमध्ये सायरन वाजवत हवाई हल्ल्याची पूर्वसूचना कशाप्रकारे देण्यात येईल, हे दाखवण्यात आलं.
त्यानंतर परिसरात शोध मोहीम घेत जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, इमारतीतून त्यांना बाहेर काढणे, त्यांच्यावर प्रथमोपचार करणे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. हवाई हल्ल्यानंतर आग विझवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, हे ही यावेळी दाखवण्यात आलं. या मॉकड्रिलमध्ये पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बदलापूर नगरपालिका, महसूल विभागाने सहभाग घेतला होता. बदलापूरचे आमदार किसन कथोरे, प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी सहभागी झाले होते.
भारतीय लष्कर आणि परराष्ट्रीय मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद सुरुविंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, तत्काळ आणि सुनियोजित प्रत्युत्तरात, भारतीय सशस्त्र दलांनी केवळ ओळखल्या जाणाऱ्या लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले केले. पाकिस्तानने सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये भारतीय एस-४०० प्रणाली, सुरतगड आणि सिरसा येथील हवाई तळ नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानकडून प्रसारित केले जात असलेले हे खोटे दावे भारत स्पष्टपणे नाकारतो.
पंढरपूर जवळच्या टेंभुर्णी येथे एका खासगी बसला अचानक आग लागली. आगीमध्ये बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
खासगी बस हैदराबाद हून मुंबईकडे निघाली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस टेंभुर्णी येथे आली असता बसला अचानक आग लागली.
प्रसंगावधान राखल्याने 15 प्रवाशी सुखरूप बाहेर पडले.
आगीत बसचे मोठं नुकसान झाले आहे.
शरद पवारबोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते जालंधर ग्रामीणमधील एका गावात क्षेपणास्त्राचे भाग सापडलेजालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे भाग सापडले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
Ajit Doval: अजित डोवाल घेणार पंतप्रधान मोदींची भेट लाडघर समुद्रात टाँवर असलेलं अजस्त्र बार्जबॉम्बे हाय वरून निघालेली तेलाची रीग( बार्ज) हे रत्नागिरी येथील आंग्रेपोर्ट कडे चालले आहे.
लाडघर समुद्रात टाँवर असलेलं अजस्त्र बार्ज आंग्रेपोर्ट जाताना निदर्शनास आलं.
मात्र ग्रामस्थांना हे नेमकं कसले जहाज आहे याची उत्सुकता लागून राहिली होती. यासंदर्भात कस्टम विभागातील सूत्रांनी माहिती दिली आहे.
हे जहाज दुरुस्तीसाठी जयगड बंदरातल्या आंग्रे पोर्ट इथे चालले होते. त्यामुळे या जहाजापासून कुठलाही धोका नसल्याचे यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Gujrat: गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या सशस्त्र ड्रोनला यशस्वीरित्या पाडलेगुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याच्या सशस्त्र ड्रोनला यशस्वीरित्या पाडले आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
याठिकाणी मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्रापुर तळेगाव महामार्गावर भिषण अपघात- अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू...
- पीएमपीएल बस आणि दुचाकी चा झाला भिषण अपघात...
- रात्री उशीरा स्कुटी दुचाकी वरून तीन मित्र तळेगाव ढमढेरे कडे जात असताना समोरून येणाय्रा PMPML च्या बस ला जोरदार धडक बसून तीन जणांचा जागीच मृत्यू...
- अपघातात प्रथमेश शेलार,हर्षल घुमे,आयुष जाधव या तीघांचा झाला जागीच मृत्यू...
- या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा....!
रायगड जिल्ह्यातील पोलीस, महसूल यंत्रणा सतर्कभारत-पाक सीमेवर दोन्ही देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
त्याअनुषंगाने सुरक्षेच्या विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पोलीस दलातर्फे युद्धजन्य परिस्थितीचे मॉकड्रिल राबवण्यात आले आहे.
अचानक होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे याचा अभ्यास करण्यात आला.
जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी सुरक्षा सक्रिय करण्यात आली असुन ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईट लावण्यात आलेले आहेत.
अनोळखी बोट किंवा व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ हि माहिती कळविण्याबाबत सुचना मच्छीमार बांधवांना करण्यात आले आहे.
सद्य परिस्थितीत सतर्क राहावे, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये. अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
खामगाव शहरातील जवळपास भाविक २२ भाविक हे वैष्णोदेवी येथील कटरा येथे अडकलेखामगाव शहरातील जवळपास भाविक २२ भाविक हे वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेले असता सध्या ते कटरा येथील एका खाजगी हॉटेलवर अडकले आहेत.
काल रात्री त्यांना रेल्वेने परत यायचं होतं.
मात्र कटऱ्याहून जम्मू पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत त्यामुळे कटरा येथे एका खाजगी हॉटेल येथे अडकून पडले आहेत.
खामगाव परिसरातील २२ भावीक तर अकोला जिल्ह्यातील १८ भावीक अशी ४० भावीक कटरा येथे अडकून पडलेले आहेत. ज्यात १३ लहान मुलं आहेत.
शासणाने मदत करून अडकलेल्या भाविकांना जिल्ह्यात परत सुखरूप आणण्याची मागणी केली जात आहे.
Sharad Pawar: शरद पवार यांचा सांगोला दौरा रद्दज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आजचा सांगोला दौरा रद्द झाला आहे.
महत्वाची बैठक असल्याने तातडीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे.
शरद पवार आज सांगोला तालुक्यातील महूद येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेची पाहणी करण्यासाठी सकाळी 10 वाजता येणार होते.
India Pakistan War: श्रीनगरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानची २ विमानेश्रीनगरमध्ये पाकिस्तान हवाई दलाची दोन विमानं पाडण्यात आली आहे. भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे.
पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानची दोन विमानं पाडली आहेत. भारत सतत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला करारा जबाब देत आहे चोख प्रत्युत्तर देत आहे.
भारतीय सैनाला ही विमानं पाडण्यात मोठं यश आलेलं आहे. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्र, प्रत्येक मिसाईल आणि ड्रोनला हवेतच नष्ट करुन टाकत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरीकांना उन्हाच्या झळा व उकाड्यापासून दिलासाधाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांच्या तापमानात तब्बल 5.7 अंश सेल्सियसची घट झाल्याने उन्हाच्या तिव्रतेत कमालीची घट झाली आहे.
याशिवाय राञी च्या वेळी किमान तापमान देखील 2.1 अंश सेल्सिअसने घटले आहे त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या उन्हाची ताप व रात्रीच्या उखड्यात कमालीची घट झाली आहे.अधून-मधून ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने हवेत गारवा जाणू लागला आहे.
त्यामुळे काही दिवसांपासून हवेच्या उष्ण झळांनी बेजार झालेल्या नागरिकांचा त्रास कमी झाला असून अवकाळीच्या वातावरणामुळे दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा चार ते साडेपाच डिग्रीने घट झाली आहे.
ऊन कमी झाल्याने दुपारी घराबाहेर पडणे शक्य झाले आहे.त्यामुळे दुपारी रस्ते,बाजार पेठेमध्ये जाणवणारा शुकशुकाट दूर झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
India Pakistan War: काल रात्री फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्लाकाल रात्री फिरोजपूरमधील एका निवासी भागात एका पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला आणि एका कुटुंबाला जखमी केले. कुटुंबाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी कुटुंबाच्या घराबाहेरील दृश्ये समोर आली आहेत.
Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस सतर्क सागरी गस्तीला प्राधान्यअवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान
रत्नागिरीत आजपासून कृषी महोत्सव , तीन दिवस असणार हा कृषी महोत्सव
रत्नागिरी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द , देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील पोलीस दल अलर्ट मोडवर
Unseasonal Rain: राज्यातील वादळी पावसाचे वातावरण कायममागील ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पाऊस काही ठिकाणी हजेरी त्यामुळे उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान
पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.
Pune International Airport: पुणे विमानतळावरील सलग तिसऱ्या दिवशी उड्डाण तात्पुरती स्थगितआज इंडिगो आणि स्पाइस जेट या कंपन्यांचे 9 उड्डाण रद्द
याबाबत संबंधित प्रवाशांना विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांकडून वेळेवर माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
रद्द झालेली उड्डाणे
इंडिगो एअरलाइन्स : अमृतसर- पुणे, चंडीगड- पुणे, पुणे- चंडीगड, पुणे- अमृतसर, नागपूर-पुणे, पुणे- जोधपूर, जोधपूर- पुणे.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद, अलर्ट जारीदेशात निर्माण झालेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे जायकवाडी धरणावरील पर्यटन पुढील चार दिवस बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पुढील चार दिवस जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
तर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी धरणावर सायनाचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे.
आशिया खंडातील मातीचे धरण म्हणून जायकवाडी धरण हे ओळखलं जातं, मागील चार दिवसांपूर्वी या ठिकाणी एसटीआयच्या पथकाने देखील भेट दिली होती.
जायकवाडी धरणावरती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, उप जिल्हाधिकारी निलम बाफना,तहसीलदार दिनेश झांपले यांनी धरण सुरक्षेबाबत आढावा घेऊन काही महत्त्वपूर्ण सुचना दिल्या.
Konkan Rain: कोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरुकोकणात सध्या अवकाळी पावसाचा खेळ सुरु आहे..
या अवकाळी पावसामुळे उष्याने हैराण झालेल्या नागरीकांना थोडा गारवा मिळालाय मात्र या पावसामुळे सर्वाधिक आनंद झालाय तो मोराला....
साखरप्यातील पुर्ये गावात मोर दिसलाय हा मोर पावसाचा आनंद घेत पिसारा फुलवून नाचताना दिसतोय..
मोरांचा थवाच या गावात पहायला मिळाला...
राष्ट्रीय पक्षी असेला हा मोर कोकणात दुर्मिळच पहायला मिळतो.
त्याच पावसात पिसारा फुलवून मोराच नृत्य आणखीनत दुर्मिळ...हा अद्भूत नजारा मोबाईल मध्ये कैद झालाय...
Shirpur: शिरपूर येथे दोन ठिकाणी वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकांचा छापावाशिमच्या शिरपूर येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केलीये. या कारवाईत २६ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, २ लाख ९७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन ठिकाणी मारलेल्या छाप्यात ३१,२८० रुपयांच्या रोख रकमेसह १७ मोबाइल फोन्स (किंमत १.७१ लाख), दुचाकी वाहने असा एकूण २.९७लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित, कर्जमाफीसाठी निघणार होता मोर्चाशेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या भारत पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय भावनेतून शिवसेना ठाकरे पक्षाने मोर्चा स्थगित केल्याची जाहीर केले असून हा ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार होता.
मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला होते.
प्रशासनावर ताण येऊ नये या दृष्टिकोनातून ट्रॅक्टर मोर्चा रद्द केल्याचे शिवसेना ठाकरे च्या वतीने जाहीर करण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्राची तपासणीखरीप हंगामाच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण पथकाने ॲक्शन प्लॅन तयार केला असून यवतमाळ जिल्ह्यातील चार हजार कृषी सेवा केंद्राचे परवाने व इतर नोंदणी केलेले बियाणे, कीटकनाशक खताची तपासणी केली जाणार आहे. खरीप हंगामापूर्वी गुणवत्ता विभागाने तपासणी मोहिमेचा निर्णय घेतलाय त्या अनुषंगाने येत्या काही दिवसात ही मोहीम यवतमाळ जिल्हाभरात राबवली जाणार असून प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ढोकी येथुन गावठी कट्ट्यासह एकाला ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईधाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखाना समोरील पारधी पिढी येथुन एकाला गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मिळालेल्या माहितीनुसार एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी करुन विचारणा केली असता सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली
माञ अधिक विश्वासात घेवुन विचारणा केली असता गावठी कट्टा घरात लपवुन ठेवण्याची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त जप्त केला आहे.