घोडा पाण्यात अडकला अन्... नाहीतर शंभुराजांनी गोवा महाराष्ट्राला जोडला असता
esakal May 14, 2025 04:45 PM
Sambhaji Maharaj Goa Campaign शंभुराजांचा स्वराज्यविस्तार

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या.

Sambhaji Maharaj Goa Campaign समुद्रावर नियंत्रणाची दूरदृष्टी

“सागरावर ज्यांचे वर्चस्व, त्यांच्या सीमा यमुना पार जातात.” – शिवाजी महाराज. हेच विचार शंभुराजांच्या डोळ्यासमोर होते.

Sambhaji Maharaj Goa Campaign जहाजबांधणी केंद्रांचे निरीक्षण

शंभुराजांनी बाणकोट, जैतापूर, राजापूर, डिचोली येथे जहाजबांधणी केंद्रे सुरू केली. सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.

Sambhaji Maharaj Goa Campaign गोव्यावर स्वारीचा निर्णय

औरंगजेबाच्या स्वारीदरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले. त्यांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली.

Sambhaji Maharaj Goa Campaign मर्दनगडावर हल्ला

पोर्तुगीजांनी मर्दनगड (सेंट स्टिफनचा किल्ला) वेढला. ४० मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला. शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले.

Sambhaji Maharaj Goa Campaign मराठ्यांची कुमक

३०० मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले. गोळीबार सुरू झाला.

Sambhaji Maharaj Goa Campaign पळणारा व्हाईसरॉय

व्हाईसरॉय अलव्होर पळून गेला. शंभूराजांनी त्याचा पाठलाग केला, पण पावसामुळे घोडा वाहून गेला. खंडो बल्लालांनी घोडा वाचवला.

Sambhaji Maharaj Goa Campaign वीरगती आणि सन्मान

या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले. शंभूराजांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली.

Sambhaji Maharaj Goa Campaign गोवा महाराष्ट्रात असता?

ही स्वारी यशस्वी झाली असती तर, गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता, असं अनेक इतिहासकार मानतात.

Sofia Qureshi Love Story खूप खास आहे सोफिया कुरेशी यांची लव्ह स्टोरी; 'अशी' झाली होती पहिली भेट
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.