तीन वेगवेगळ्या स्वादांनी भरलेली ही थाळी – झणझणीत डाळ, कुरकुरीत बाटी आणि गोडसर चुरमा – राजस्थानी लोकांचा अभिमान!
महाराणा बप्पा रावल यांच्या काळात राजपूत सैनिकांनी रणात खाऊ शकणारा अन्न म्हणून बाटी तयार केली. वाळवंटात वाळूत पुरून ती तयार होत असे.
संध्याकाळी रणावरून परतल्यावर सैनिक वाळूतून बाटी बाहेर काढून तुपात बुडवून खात असत.
गुप्त साम्राज्याच्या व्यापार्यांनी मेवाडमध्ये स्थायिक होताच ‘पंचमेल डाळ’चा समावेश झाला – पाच डाळी आणि मसाल्यांची अप्रतिम सांगड!
एकदा एका राणीच्या स्वयंपाक्याने बाटीमध्ये ऊसाचा रस घातला. त्यातूनच चुरमा तयार झाला – तूप, गूळ, वेलची आणि साजूक चव!
हळूहळू ही थाळी राजस्थानी राजघराण्यांमध्ये लोकप्रिय झाली. जोधाबाईच्या माध्यमातून ही थाळी मुघल दरबारात पोहोचली.
मुघल काळात बाटीचं सॉफ़्ट रूप 'बाफळा' तयार झालं – आधी उकडलेली, मग भाजलेली बाटी.
मराठवाड्यात दालबाटी तुपासोबत, लसूण चटणी आणि साध्या चवीनं खाल्ली जाते – एकदम खरी खुरी ग्रामीण चव!