Maharashtra Today Live Updates: लातूरच्या उदगीरमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा कहर
Saam TV May 16, 2025 06:45 PM
जळगावच्या गुरुदत्त नगरात घरफोडीचा प्रकार: अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल केली चोरी

जळगाव च्या कजगाव जवळील रिलायन्स टॉवर परिसरात रात्री एक भीषण अपघात घडला असून ओमनी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना कजगाव येथील अविनाश हॉटेलच्या पुढे घडली..पाचोऱ्याकडे जाणारी ओमनी कार आणि कजगावकडे येणारी दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली.

या अपघातात दुचाकीस्वार दोघे व ओमनी कारमधील दोघे असे एकूण चार जण गंभीर जखमी झाले.

अपघात इतका जोरदार होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एक जखमी व्यक्तीची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

जखमींना तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातातील दुचाकीस्वार हे मजूर असून, ओमनी कार चालक पाचोरा शहरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Ratnagiri: गव्हाच्या पिठ पिशवीमध्ये सापडल्या अळ्या, रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार

उद्यमनगर मधील एक किराणा दुकानातून विकत घेण्यात आली होती ही पिठाची पिशवी

संबंधीत किराणा मालकाला हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बदलून दिली गेली पिशवी

आनंद पेडणेकर यांनी ही विकत घेतली होती पिठाची पिशवी

श्री महलक्ष्मी फुड प्राँटक्ट्स कंपनीची ही पिठाचे पिशवी

आनंद पेडणेकर यांनी संबंधीत विभागाकडे केली आहे तक्रार दाखल

तुळजापूर तालुक्यातील होनाळा येथील तरुणाचा झोपेतच हृदयविकाराने मृत्यू

सोमनाथ प्रकाश कोरे असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव

रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून प्रकाश झोपला मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

झोपेत असताना प्रकाश ओरडला, आई-वडिलांनी धाव घेतली मात्र तो उठलाच नाही

तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले

एकुलत्या एक मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुसळधार पावसाने भुईमूगाच नुकसान, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतातील भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. सध्या हळद आणि भुईमूग काढणीचा हंगाम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतात राबत असताना काल आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकावर झाकण्यासाठी वेळ सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. वाशिम तालुक्यातील सुदी शेतशिवारातील हि विदारक दृश्य..

सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सोसायटीच्या आवारात घाणीचं साम्राज्य

बदलापुरातील मांजर्ली भागात असलेल्या शिव पार्वती कृपा सोसायटीच्या रहिवाशांना दररोज गुडघाभर साचलेल्या सांडपाण्यातून वाट काढावी लागतेय. या सोसायटीच्या आवारातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेला नैसर्गिक नाला खाजगी जमीन मालकाने बंद केल्यानं सोसायटीच्या आवारात घाणीचं साम्राज्य आणि दुर्गधी पसरलीय.

त्यामुळे डासांची संख्या वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून इमारतीतील अनेक रहिवासी आजारी पडत आहेत.

आमदार नरेंद्र भोंडेकरांनी तूर्तास थांबविला ठिय्या आंदोलन, दुपारी 1 पर्यंत बँक प्रशासनाला दिली मुदत

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली असून त्यात भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

त्याचा सह अजून 5 सदस्याची वगळण्यात आल्याने आमदार भोंडेकर यांनी आज दुपारी 1 वाजे पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

भोंडेकर यांच्यासह बलुतेदार मतदार संघातील अन्य पाच सदस्यांची नावं यातून वगळण्यात आल्यानं भोंडेकर यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रशासकीय अधिकाऱ्याला धारेवर धरत ठिय्या आंदोलन केलं.

कर्ज घेतलेल्या बलुतेदार संस्थांना शासनानं २०१९ मध्येचं कर्ज परतफेड केल्याचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं.

मात्र, बँक प्रशासनानं जिल्ह्यातील पाच बलुतेदार संस्थांवर १ कोटी ३१ लाखांचं कर्ज असल्याचं पुढे करून त्यांचं नावं मतदार यादीतून वगळण्यात आलेल्याचा आरोप आमदार नरेंद्र भोंडेकरांनी करून जोपर्यंत निवडणूक मतदार यादीत नाव समाविष्ट होणार नाही तोपर्यंत बँकेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आमदार भोंडेकर यांनी घेतला होता.

मात्र, बँक प्रशासनानं आज दुपारी 1 पर्यंत यावर योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांचं ठिय्या आंदोलन तूर्तास थांबविला आहे. योग्य निर्णय नं झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोंडेकर यांनी दिलाय.

अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकाचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी भुईमूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दारव्हा तालुक्यात बोथ, बिजोरा, दत्तापूर, मांगकिन्ही,हातणी या गावातील शेतकऱ्यांनी

उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. मात्र जिल्ह्यात काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये काढून ठेवलेला या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

आशिष देशमुखसंजय राऊत यांना मीडियात बोंलण्याचं पगार मिळत असतो.. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असतात सेनचे मनोबल वाढविण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून एक भव्य तिरंगा यात्रा आयोजन

आज जळगाव शहरातील तिरंगा रॅलीला सुरवात करण्यात आली यावेळेस राज्याचे मंत्री गिरीश महाजन व खासदार स्मिता वाघ व आमदार सह नागरिक या तिरंगा रॅलीत सहभागी शहरातून प्रमुख मार्गाने राहिलेला सुरुवात

संकष्ठी चतुर्थी निमित्ताने महागणपतीला गणपती अथर्वशीर्ष पठण

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र महागणपती मंदिर, रांजणगाव येथे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.

पुणे, नगर, नाशिकसह विविध भागांतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

सामूहिक पठणाचा प्रारंभ मंगलमय वातावरणात करण्यात आलामहागणपती भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती.

या निमित्ताने मंदिरातील गाभाऱ्यात महागणपतींच्या मूर्तीची विविध फुलमाळांनी अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आली होती.

फुलांच्या सुगंधित साजशृंगारामुळे महागणपतींचं रुप अक्षरशः फुलून निघालं होतं. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शनाचा लाभ घेतला.

अवकाळी पावसामुळे रायगडमध्ये आंबा पीक धोक्यात

रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुढे अजून दोन दिवस कोकण किनारपट्टीवरील अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सध्या कोकणात शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला असून या अवकाळी पावसाचा फटका शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला बसतो आहे.

पावसामुळे फळगळती बरोबरच आता आंबा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फळावर देठकुजवा किंवा फळामध्ये साकेची भीती असून यामुळे आंब्याचा दर उतरून शेतकऱ्याच्या नफ्यावर परिणाम होणार आहे.

खराब होण्या पूर्वी आंबा काढणे गरजेचं असल्यामुळे तयार झालेला आंबा लवकरात लवकर काढण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई

वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे विनापरवाना व अवैध,अनाधिकृत पणे साठवुन ठेवलेला ४५७ बॅग २० मेट्रिक टन खतसाठा जप्त

कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुका स्तरीय भरारी पथकाची संयुक्त कारवाई

एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये आढळला खताचा साठा, एकुण ४ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा खतसाठा केला जप्त

दोघांविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांची माहीती

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान ७० टक्के सराफा बाजाराची उलाढाल बंद

अकोला, परतवाडा येथील एकता ज्वेलर्सच्या दुकानावर १४ मे रोजी आयकर विभागाने धाडी टाकल्याचे सराफा बाजार वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.. गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधितांचे घरासह ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे... विशेष म्हणजे गुरुवारला एकता ज्वेलर्समध्ये अधिकाऱ्यांनी संगणक तसेच कागदपत्रांची,वहिखात्याची तपासणी केली.. दरम्यान गुरुवार १५ मे रोजी नागपुर शहरातील काही सराफा ज्वेलर्समध्ये आयकर विभागाने घाड टाकल्याने विदर्भासह अमरावती विभागातील सराफा बाजार हादरला आहे. व्यापाऱ्यांना तर एवढी धडकी बसली आहे की, बहुतांश सराफा व्यापाऱ्यांनी आपले दुकान व मोबाइल बंद केला आहे.. सध्याघडीला विभागातील पाचही जिल्ह्यातील किमान ७० टक्के सराफा बाजाराची उलाढाल बंद आहे.आयकर विभागाने एका ज्वेलर्सच्या अमरावती, परतवाडा, यवतमाळ, अकोला येथील ज्वेलर्सवर एकाचवेळी धाड टाकली. यासह तिन्ही शहरातीलइतर ज्वेलर्सवरदेखील धाडी घालण्यात आल्या. यासह आयकर विभागाने अकोला शहरातील पूनम ज्वेलर्स, अग्रवाल ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. मुंबई, नागपुर, औरगांबाद आयकर विभागातील १४७ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश असलेल्या विविध पथकांची अद्यापही ज्वेलर्समध्ये तपासणी सुरू आहे. सर्व ज्वेलर्समधील रक्कम, डिजिटल डेटा, खरेदी-विक्रीचे बिल, बॅकींगसह इतर सर्व प्रकारच्या व्यवहाराची कागदपत्रे तपासणे सुरू आहे.

जालन्यात पाच लाखांची लाच घेताना महसूल सहायकाला एसीबीने पकडले

जालन्यात पाच लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे. राजेंद्र शिंदे अस या लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव आहे.तक्रारदाराचा दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी महसूल सहायकाने पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्यासाठी या महसूल सहायकाने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल आहे . याप्रकरणी या लाचखोर महसूल सहाय्यकाविरोधात जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

शिवसेना उबाठा गटाचे शाखा अध्यक्ष यांचा मनसेत भव्य पक्षप्रवेश

शिवसेना उबाठा गटाचे शाखा अध्यक्ष मा. किशोर दुर्भे यांनीशेकडो कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत भव्य पक्षप्रवेश केला.

सदर कार्यक्रम अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या निवास स्थानी "राज महाल" येथे झाला.

या पक्षप्रवेशामुळे मनसेची ताकद घोरपडी गाव, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात आणखी वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

किशोर यांनी मनसेत प्रवेश करताना सांगितले, राजसाहेबांच्या विचारांवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.

या कार्यक्रमात मनसेचे अनेक ज्येष्ठ इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशांत पडोळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडनी

भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना शहरातील वारंवार येत असलेल्या तक्रारीमुळे त्यांनी शहराचा दौरा केला, यावेळी रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, फुटलेल्या नाल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना होणारी पायपीट यावर खासदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आणि नाल्या दुरुस्ती करण्यास सांगितले

पुण्यात यावर्षी ढगफुटीसदृश्य,अतिवृष्टीची शक्यता

नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105% पाऊस पडण्याची शक्यता आहे

या काळात विशिष्ट कालावधीत ठराविक भागात ढगफुटी सदृश्य किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे

त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे.

आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगर शाखेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

आज सायंकाळी ४.३० वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर या मोर्चास सुरुवात होणार आहे.

पैठण गेट येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पुढे गुलमंडीपर्यंत हा हल्लाबोल महामोर्चा जाणार आहे.

गुलमंडी येथील संभाजीनगरचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर जाहीर सभा होणार आहे.

सभा संपन्न झाल्यांतर मनपा आयुक्त यांच्याशी शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार आहे.

शक्तीपीठ महामार्गा महामार्गाची संयुक्त मोजणी पूर्ण

पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली असून या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे.त्यापैकी या महामार्गाची 137 किलोमीटर एवढी लांबी यवतमाळ जिल्ह्यातून जाते त्यातच यवतमाळ तालुक्यातून 27 किलोमीटर व आर्णी तालुक्यातील 34 किलोमीटर एवढी लांबी आहे. यवतमाळ विभागातील आर्णी तालुक्यामध्ये एकूण 16 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग करिता भूसंपादन करण्यात येणार आहे.

माझ्यात आणि गणेश नाईक यांच्यात वैयक्तिक वैर नाही ; आमदार मंदा म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

वन मंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर आ. मंदा म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर आज भाजपच्या कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी "माझ्यात आणि गणेश नाईक यांच्यात कोणतंही वैयक्तिक वैर नसून, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे हे वैर निर्माण झाल्याचे" मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे आणि येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा पालिकेवर फडकवावा असे आवाहन मंदा म्हात्रे यांनी याप्रसंगी केले आहे.

रत्नागिरीला 10 जून पर्यंत पुरेल एवढाच शिळ धरणात पाणीसाठा

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 10 जून पर्यंत पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे त्यामुळे आठवड्यतून एकदाच पाणी कपात केली जातेय. दररोज शहराला 18 ते 19 दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दररोज रत्नागिरीकरांना दीड तास पाणी मिळतं मात्र मान्सून लांबल्यास 10 मिनिटांची पाणी कपात केली जाणार आहे गेल्या वर्षी एप्रिलपासूनच शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता.

बुलढाणा शहरात पावसाची दमदार हजेरी

दोन दिवसापासून विदर्भात हवामान अंदाजानुसार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवीला आहे .. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.. बुलढाणा शहरात सुद्धा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.. उकाड्याने जिल्हावासी त्र स्त झाले होते आता हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे ... तसे या पावसाने कांदा, मका, उन्हाळी भुईमूंग, मुंग व फलबाग या पिकांचे नुकसान झाले आहे ....

कोल्हापुरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

जोरदार वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात अवकाळी पाऊस

सर्वत्र ढगाळ वातावरण आणि ढगांचा गडगडाट सुरू

विजा पडण्याची शक्यता असल्याने घराबाहेर न पडण्याचं जिल्हा प्रशासनाच आवाहन

Pune : ऑनलाइन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांची पसंती

मेट्रोची प्रवासी संख्या वाढत असताना त्यांच्याकडून प्रवाशांकडून ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते मागील चार महिन्यात एनसीएमसी कार्डनंतर व्हाट्सअप वरून होत असलेल्या तिकीट विक्रीतून मेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे.

जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला सर्वाधिक 5 कोटी 66 लाख 58 हजारांचे उत्पन्न मिळाले

व्हाट्सअप वरून एक लाख 23 हजार 533 तिकीट विक्री झाली असून त्यातून मेट्रोला 5 कोटी 38 लाख 38 हजार 714 रुपये उत्पन्न मिळाले.

Maharashtra Today Live Updates: पूरस्थिती टाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून नवीन यंत्रणा

पावसाळ्यात पुण्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. गेल्या वर्षी धरणातून अचानक पाणी सोडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यंदा अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने आरटीडीएएस (रियल टाइम डाटा एक्युजेशन सिस्टम) प्रणाली लागू केली आहे.

या प्रणालीमुळे धरणातून पाणी विसर्गाची माहिती पुणे महापालिकेला तीन दिवस आधी मिळणार आहे.

त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळीच उपाययोजना करता येणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.