Maharashtra Weather Update Live Update : जालन्यात जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालांचे नुकसान
Saam TV May 21, 2025 06:45 PM
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा कहर.

कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून....शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं.

सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई

- सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई,अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह महिला अधिकाऱ्यावर कारवाई

- सोलापुरात सोलर सिस्टिम बनवण्यासाठी आठ हजार रुपयांची मागितली होती लाच

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता सह तिघा जणांनी विरोधात एसीबीची कारवाई

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने,सहाय्यक अभियंता स्वाती सदानंद सलगर आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी व्यक्ती योगीनाथ म्हेत्रे यांच्यावर करण्यात आली कारवाई

- सोलर व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराकडे सोलर सिस्टिम मंजुरीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी,मीटर बसवण्यासाठी व्हनमाने आणि सलगर यांनी केली होती पाहणी

- व्हनमाने यांनी पाच हजार रुपयांची तर सलगर यांनी तीन हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केल्याचं झालं निष्पन्न

एकीकडे मान्सून पूर्व पाऊस.. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला, तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला नाहीये.. मेळघाट परिसरात देखील पावसाची हजेरी लागली.. मात्र मेळघाट मधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.. विहिरीने अजूनही तळ गाठला आहे.. त्यामुळे टँकरने विहिरीमध्ये पाणी सोडले जाते.. त्यानंतर गावातील नागरिक विहिरीत दोर टाकून पाणी वर काढतात.. गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना या खडीमल गावाला करावा लागतोय.. दरवर्षी थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात.. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणीटंचाई संपवावी, अशीच मागणी अनेक वर्षापासून मेळघाटमधील आदिवासी करत आहेत.

Maharashtra Weather Update Live Update : शेगावमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

शेगाव शहरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान अनेक ठिकाणी घरांची पडझड होवून झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

अवकाळी पावसाचा बसला फटका व्यापाऱ्यांना

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला पडून आहे कारण पाऊस पडल्यामुळे गिर्हाईक व्यापारीआणि पाठ फिरवली आहे

त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक 469 इतकी झाली असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माळ आलेला आहे

Maharashtra Weather Update Live Update : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

- भिवापूर तालुक्यातील चिखलापार महालगाव मांडवा बंजारा या गावांमध्ये काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक घराचं नुकसान झाले... तेच मौदा तालुक्यातील काही भागात झाड कोसळले.

- यात चिखलापार येथील निलेश खोडे, डोमाजी राऊत, रमेश गजबे महेश सोळंके, शोभा शंभरकर यांच्या घरावरील कौवलाचे छत शतीग्रस्त झाले, तेच काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले..

- यामुळे घरात ठेवलेले अन्न धान्य सहित्याच नुकसान झालं,

- सायंकाळी नुकसान पाहणीसाठी भिवापूर सरपंच अतुल सहारे, यांनी तहसीलदार यांना माहिती दिली असता त्यांनीही महालगाव भागात पाहणी केली..

Maharashtra Weather Update Live Update : मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन

मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे.. चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती. या पावसामुळे नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. शेतजमीन फळणी रोटरने पेरणी करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. सात जून म्हणजेच मिरगाच्या नंतर पेरणीला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे बळीराजा आनंदीत आहे. तर अचान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे...

Maharashtra Weather Update Live Update : नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार आहे.. जिल्ह्यातील महसुल यंत्रणेसाठी १२ तर पोलिस प्रशासनासाठी १२ फोन आले आहेत. या सॅटेलाईट फोनचा वापर सर्व तहसील कार्यालय आणि पोलिस स्थानकात केला जाणार आहे. इमर सॅट असं याचं नाव असून, हे बीएसएनएल कंपनीचे सॅटेलाईट फोन आहेत. मोकळ्या जागेवरून काही क्षणात यावरून संपर्क करता येणार आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची हायटेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

Maharashtra Weather Update Live Update : ठाण्यात ढगाळ वातावरण

ठाणे..काल संध्याकाळी पासून कोसळणार्या पावसाने आज सकाळी विश्रांती. घेतली आहे. पण आज दिवसभर पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळी पासूनच ढगाळ वातावरण आहे.

Maharashtra Weather Update Live Update : दापोलीत शहरात सखल भागात साचल पाणी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरु आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच पावसात शहरातील आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाण्याचा विळखा बसला. तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. शिवसृष्टी जवळील गटार या पावसात तुंबल्याने पावसाचे पाणी चक्क रस्त्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवकाळी पावसातच दापोलीची बिकट परिस्थिती निर्माण झाली. नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जातेय.

Maharashtra Weather Update Live Update :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रीपरीप

रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सकाळपासून पुन्हा रीपरीप सुरू

जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची रीपरीप

तर काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित

काल संध्याकाळपासून विज गायब असल्याने नागरीकांची गैरसोय

तर पावसाच्या रीपरीपीमुळे शेतकऱ्यांची मान्सून पुर्व कामे खोळंबली

पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

यवतमाळ जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदली प्रक्रिया सुरू असून पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यात कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच सामान्य प्रशासन विभागाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाही, यामुळे बदली पात्र कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बदलांचे वेळ पत्रक तयार केले.पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी,सांख्यिकी तीन,15 वरिष्ठ सहाय्यकांची बदली करण्यात आली.

Maharashtra Weather Update Live Update : जालन्यात जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालांचे नुकसान

जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पाहायला मिळतो . आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालाच नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतमालाच नुकसान जालना जिल्ह्यात झाल आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यात सात नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत तर जिल्ह्यात 87 जनावर देखील दगावली आहे. जालना जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.