बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील ड्रॅगनफ्रुट बागेची मान्सूनच्या पावसाने केलं नुकसान
अति पावसामुळे ड्रॅगनफ्रुटच्या झाडाची पाने पडली पिवळी जरद
मान्सूनमुळे सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा आला अडचणीत
पाच एकर बागेतील साधारण 700 ड्रॅगनफ्रुटच्या झाडावर पावसाचा झाला परिणाम
निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगनफ्रुटचा दर्जा ढासाळला
कमी पाण्यात येणार पिक म्हणून ड्रॅगफ्रुट पिकाची आहे ख्याती,मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पावसाने ड्रॅगनफ्रुटचे भाव आले अर्ध्यावर
मागच्या दोन वर्षात निसर्गचक्र बदलल्यामुळे प्रत्येक वर्षी ड्रॅगनफ्रुट उत्पादक शेतकऱ्याला याचा बसत आहे फटका
त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पीएमपीएमएलची 18 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाईगेल्या वर्षात पीएमपीला 91 लाखाची उत्पन्न
पीएमपीने गेल्या आर्थिक वर्षात 18 हजार 170 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून 91 लाख दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीच्या पथकाकडून दररोज कारवाई केली जाते,तरी फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही.
पीएमपीकडून पुणे,पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत 160 बसच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा दिली जाते. यामधून दररोज दहा लाख नागरिक प्रवास करतात.त्यातून पीएमपीला दररोज दीड ते दोन कोटीचे उत्पन्न मिळते.
मात्र या प्रवासात दररोज विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रात तिकीट तपासणी पथक तैनात केली आहेत.
प्रवासादरम्यान तिकीट तपासणी केली जाते.त्यामध्ये दररोज 50 ते 60 फुकटे प्रवासी सापडत आहेत.पाच ते दहा रुपये तिकीट न करता विना तिकीट प्रवाशांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो तरीही प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून येत आहेत.
Corona Update: कोरोनाच्या रुग्णांना रेमडेसिव्हीर वापरण्याच्या सूचनापुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी
शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
सहव्याधी असलेल्या व रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना तीन ते पाच दिवस रेमडेसिव्हीर वापरण्याच्या सूचना
सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर राज्यातही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी महापालिकेमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती
खासगी रुग्णालयांना बाधित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणसाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत
ओबीसी नेते संग्राम माने भाजपात दाखल, गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेशसांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते आणि व्हिजीएनटी परिषदेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संग्रामनाना माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये विटा येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.. गेल्या काही दिवसांपासून संग्राम माने यांना विविध पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात येत होत्या.मात्र संग्राम माने यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.ओबीसी समाजातील एक लढवय्या नेतृत्व म्हणून संग्राम माने यांची सांगली जिल्ह्यामध्ये ओळख आहे.त्यांच्या भाजपाच्या पक्षप्रवेशामुळे विशेषतः विटा-खानापूर तालुक्यामध्ये भाजपाची ताकत अधिक वाढणार आहे.
जालन्यात फॉस्फोजिप्सम पाउडर नावाचं तब्बल 20 लाखांच 320 मॅट्रिक टन खत जप्तजालन्यात उत्पादनास परवानगी नसलेले विनापरवाना खत रेल्वे रेक द्वारे वाहतूक करून कंपनीच्या गोडाऊन मध्ये साठवल्याप्रकरणी खताच्या गोडाऊनवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे . जालन्यात गुंडेवाडी शिवारातील कृष्णा फस्केम कंपनीच्या गोडाऊनवर कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत फॉस्फोजिप्सम पाउडर नावाचं तब्बल 20 लाखांच 320 मॅट्रिक टन खत कृषी विभागाने जप्त केल आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जालना कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जालनाच्या चंदनझीरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuljapur: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका नव्या आरोपीचा समावेशतपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने तुळजापुरातून शुभम सुरेश नेपते या तरुणाला अटक
ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग , तर 19 आरोपी अटक
तामलवाडी पोलिसांकडून शुभमच्या अटकेची कारवाई
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 18 आरोपी अजूनही फरार, नोटीस बजावलेल्या अनेकांचा तपास सुरू
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण 100 टक्के भरलंरत्नागिरीकरांची पाणी टंचाईची समस्या सुटली
मे महिन्यातच शीळ धरण 100 टक्के भरले
कालपासून पावसाने उसंत घेतली जरी असली तरी गेल्या 8 दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झालीय
शीळ धरणातून रत्नागिरी शहरातील जवळपास 8 लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो
जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 6 धरणं ही 100 टक्के भरुन वाहताहेत तर 25 धरण ही 50 टक्के क्षमतेने भरुन वाहताहेत
रत्नागिरीतून शीळ धरणावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी....
अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा तीन दिवस जाहीर संपवर्तमानपत्राच्या मालकांनी वृत्तपत्रा मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी..
प्रत्येक वृत्तपत्रा मागे दोन रुपये दहा पैसे कमिशन देण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी.
29,30,आणि 31 मे पर्यत वृत्तपत्रे वाटप करणार नाही;संघटनेचा निर्णय..
वृत्तपत्र विक्रेते संपावर गेल्यामुळे जवळपास 60 हजार पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना फटका.
Washim: खुनासह दरोडा प्रकरणातील जेलमधून फरार आरोपीस अहमदाबाद येथून अटक...वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलिसांना तब्बल आठ महिने चकवा देणारा आणि खुनासह दरोड्याच्या गुन्ह्यातील अंडर ट्रायल आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अहमदाबाद येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनेश किसनभाई निरापुरे (वय 45, रा. चांदुलाल चाळ, विक्रम मिल जवळ, बापू नगर, अहमदाबाद, गुजरात) असं आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर 2021 साली मालेगाव पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. सन 2021 पासून आरोपी वाशिम जिल्हा कारागृहात होता. मात्र मागील वर्षी 12 ऑगस्ट रोजी तब्बेत बिघडल्याने उपचारासाठी नागपूरला नेत असताना त्याने पोलीस गार्डला चकमा दिला आणि फरार झाला होता.
पावसामुळे जालना जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरवैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश, औषधसाठा तपासण्याचे आदेश
यंदा जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र केंद्राने दिले आहेत. त्यात मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा जोरदार मारा सुरू आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय औषधांचा साठा तपासून आवश्यक असलेली औषधीची मागणी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत
Jalna Accident: जालन्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात, अपघातात कारचा झाला चुराडा....जालना -अंबड रोडवरील शेवगा शिवारातील घटना, सकाळी साडेपाच वाजेची घटना...
अपघातात कारचालक गंभीर जखमी तर दोन प्रवासी किरकोळ जखमी...
जालन्यात ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झालाय. जालन्यातील जालना अंबड रोडवरील शेवगा शिवारात सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाली आहे. जखमींवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात इतका भयंकर होता की या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे..
जोरदार पावसामुळे शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेला मका व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसानकाल अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेला मका व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, धुळे जिल्ह्यातील नेर परिसरामध्ये काल पावसाने अचानक हजेरी लावली, यावेळी शेतकऱ्यांने शेतात काढून ठेवलेला मका व कांदा पूर्णतः भिजल्याने या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे,
गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मका व कांदा काढून शेतात वाळण्यासाठी ठेवला होता, परंतु काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल पिक पूर्णतः भिजल्याने शेतकऱ्याचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, नुकसान झालेल्या शेती पिकाची नुकसान पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाने मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हेरावला, मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटकालातूर जिल्ह्याल्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला आहे... पावसामुळे जनजीवन पूर्त विस्कळीत झालय.. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय... तर काढणीला आलेल्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाल आहे.. विशेषता: कांदा टरबूज ,पिकांचं मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.. तर काढणीला आलेल्या ज्वारी पिक पूर्ण पाण्यात गेल आहे.. पावसात ज्वारी भिजल्याने संपूर्ण ज्वारीचे दाणे काळे पडले आहे...
श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामी यांचे निधन- बसवारूढ मठाच्या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक कार्य केलेय
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते गुरु होते
- महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात त्यांचा लाखोंचा भक्तगण आहे
- आप्पाजींचा अध्यात्मिक क्षेत्रातही मोठा वरचष्मा होता
- ईश्वरानंद महास्वामी यांना आप्पाजी या नावाने संबोधले जात होते
- काल रात्रीच्या सुमाराम त्यांची प्राणज्योत मालवली.
- आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
Nanded: आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये हाणामारीरांगेत उभा टाकण्याच्या कारणावरून दोन महिला एकमेकींना भिडल्या.
नांदेड शहरातील पोस्ट ऑफिस मधील आधार केंद्रासमोरील प्रकार.
आधार अपडेट करण्यासाठी दररोज पोस्ट ऑफिस समोर नागरिकांच्या लागत आहेत रांगा.
एका दिवसात 40 आधार अपडेट होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल.
नांदेड शहरातील इतर ठिकाणचे आधार केंद्र बंद पडल्याने पोस्ट ऑफिस मधल्या आधार केंद्रावर प्रचंड गर्दी
भाजपच्या माजी नगरसेवकाच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात उपहासात्मक आंदोलन- प्रणिती शिंदे यांचे सोलापूर ते गोवा प्रवासाचे विमानाचे तिकीट बुक करत केले अनोखे आंदोलन
- सोलापूर भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी स्वखर्चातून विमानाचे तिकीट काढत हे अनोखे आंदोलन
- सोलापूरची विमानसेवा सुरू होणार नाही असे विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी वारंवार केले होते
- त्यामुळे भाजपने ही विमानसेवा सुरू केली असून त्यावर विश्वास बसावा म्हणून सोलापूर ते गोवापर्यंत प्रणिती शिंदे यांच काढलं विमान तिकीट
- त्याचबरोबर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ''सांग सांग भोलानाथ, विमानसेवा सुरू होईल काय?" असे आंदोलन केले होते
- त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने हे आंदोलन केलय.
- काँग्रेसला एवढेच सांगणे आहे की आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो.
- मात्र,काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी किती लोकांना आमदार करण्याचा शब्द दिला आणि किती लोकांची माती केली ते देखील भोलानाथला विचारावे,असा उपहासत्मक टोला ही यावेळी अनंत जाधव यांनी लागवला
- या विमानप्रवासासाठी जवळपास 11 हजार रुपये खर्च आला असून यामध्ये एका विंडो सीटचा ही समावेश आहे.
आज हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थिती मध्ये शेतकरी महिला मेळाव्याचे आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत हिंगोलीत देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते साडेसातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार आहे तर हिंगोली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे यानंतर हिंगोलीच्या रामलीला मैदानावर फडवणीस यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यातून फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली तयारी अंतिम टप्प्यात आली असून रामलीला मैदानावर पावसाच्या दृष्टिकोनातून जापानी तंत्रज्ञान वापरत मंडपाची उभारणी करण्यात आली आहे
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पुणे विभागात ९७ हजार १७३ विद्यार्थ्यांनी केली नोंदणीपुणे विभागात बुधवारपर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज
पुणे जिल्ह्यातील ६० हजार २०४ विद्यार्थ्यांनी केली अकरावी प्रवेश प्रक्रियेची नोंदणी
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिला फेरी चे अर्ज भरण्यासाठी ३ जून पर्यंत मुदत
शिक्षण विभागाने अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया राबवली आहे
पुणे विभागात १ हजार ५३८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे
पुणे जिल्ह्याच्या पाठोपाठ अहिल्यानगर मधून २२ हजार ३६४, सोलापूर जिल्ह्यातून १४ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे
Pune News: पुणे शहरात झाडे कोसळण्याची भीती! २२९ तक्रारींकडे दुर्लक्षशहरात मोठा पाऊस झाल्यानंतर सुद्धा धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणी कडे पालिकेचे दुर्लक्ष
पुणे शहरात गेल्या ३ दिवसात झाड पडीच्या दोन घटनांमध्ये दोन जणांचा बळी
काल संध्याकाळी पुण्यातील निलायम टॉकीज जवळ एका रिक्षावर झाड कोसळल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू
२ दिवसांपूर्वी पुण्यातील कर्वेनगर परिसरात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर झाड पडल्याने जागीच मृत्यू
धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडण्यासाठी महापालिकेकडे १६११ तक्रारी आल्या होत्या
यापैकी १३८२ तक्रारींची दखल घेण्यात आली मात्र अजूनही २२९ तक्रारींवर महापालिकेने कारवाई का नाही केली असा प्रश्न
पुण्यात झालेल्या घटनांमुळे धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर
मे महिन्यात आत्तापर्यंत २५४ फांद्या आणि झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत
पावसाळ्यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्कपुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग करणार प्राण्यांचे लसीकरण
पावसाळ्यापूर्वी ५ लाखांपेक्षा अधिक प्राण्यांचे लसीकरण पूर्ण
संसर्गजन्य आजारापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात येणार लसीकरण
१५ जून पर्यंत पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार विशेष लसीकरण मोहीम
पावसाळ्यात डास, फर्या (ब्लॅक क्वार्टर – बीक्यू ), एन्टरोटॉक्सिमिया आणि लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) सारख्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी लसीकरण मोहीम
मोहिमेअंतर्गत मिळालेल्या ५,९७,२०० लसींचा साठा गावपातळीवर वितरित करण्यात आला आहे. मान्सूनपूर्व लसीकरणात ३,४७,३९६ गायी, ३६,८०८ म्हशी आणि २८,०७४ वासरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाची काल संध्याकाळपासून विश्रांतीकाल दुपारी अचानक पावसाची मोठी सर आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली
संध्याकाळ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे
पुढील ४ ते ५ दिवस पुण्यासह राज्यात मॉन्सून ब्रेक घेणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर दिशेला वळल्यामुळे राज्यातील होणारा पावसाचा वेग मंदावणार
पुढील ४ ते ५ दिवस राज्यात काही ठिकाणी वगळता पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज पुणे वेधशाळाने वर्तवला आहे
फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, नांदेड सिटी पोलिसांनी केला गुन्हा दाखल"फरार आरोपी नीलेश चव्हाणला पकडून ठेवलय" असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला
मात्र फोन करणाऱ्याने पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल
या हेतूने त्याने ११२ या क्रमांकावर पोलिसांना फोन केला
संतोष दत्तात्रय गायकवाड, (वय ३३) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
फोन करणाऱ्यांनी ‘आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण हा पकडून ठेवला आहे. त्याची जवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करून गाडीचे डिक्कीत ठेवले आहे.’ असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली
ती व्यक्ती किरकटवाडी, येथील पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे मिळून आला
त्याच्याकडे चौकशी केली. त्या व्यक्तीने खोटे कॉल करत असल्याचे आढळून आले
Pune News: पुणे शहरात बेशिस्त वाहन चालक आघाडीवरशहरात गेल्या वर्षभरात ६४ हजार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
नियम मोडणाऱ्या ६४ हजार बेशिस्त वाहन चालकांवर RTO कडून कारवाई
RTO च्या फ्लाइंग स्क्वॉड कडून शहरभरात करण्यात आल्या कारवाया
२०२४-२५ या आर्थिक वर्षात फ्लाइंग स्क्वॉडने नोंदवलेल्या वाहतूक गुन्ह्यांच्या नोंदी
हेल्मेट न घालणे – १९,६४५
वेगमर्यादा ओलांडणे (स्पीड गन) – १३,८१७
अवैध विमा (इनव्हॅलिड इन्शुरन्स) – ८,७४४
सीट बेल्ट न वापरणे- ५,०८७
सिग्नल तोडणे / लेन कटिंग – ३,२०४
फॅन्सी नंबर प्लेट (५०/१७७ अंतर्गत) – ३,५८०
रिफ्लेक्टरशिवाय वाहन -४,२८५
चुकीचे पार्किंग – १,७७७
गाडी चालवताना मोबाईलचा वापर२ – २४३
टेल लॅम्प / ब्रेक लाइट काम करत नसणे – १,४४४
जास्त भार असलेले मालवाहू वाहन – १,३९२
तीन जणांनी दुचाकीवर बसणे – १,४३५
कळंब शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे आ.कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरणधाराशिवच्या कळंब शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतुन कळंब मध्ये अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प उभारण्यात आले आहे.या अनावरण कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Washim: वादळी वाऱ्याचा कहर, शेतकऱ्यांचे सौर पॅनल उडाले, लाखोंचा फटकावाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी गावात काल सायंकाळी आलेल्या वादळवाऱ्याने गावातील पाच ते सहा शेतकऱ्यांचे सौर उर्जा पॅनल उडून गेले, काहींच्या पॅनलला मोठ्या प्रमाणावर तुटफुट झाली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानामुळे मोठा फटका बसला आहे. गणेश शिवदास माहूलकर, बबन कटूजी गायकवाड, महादेव रामजी भोंगळे, ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत आणि परशराम महादेवराव वाघ यांचे सोलर पॅनल पूर्णपणे क्षतीग्रस्त झाले आहेत.
शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली असून,शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Bhandara Unseasoanl Rain: भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी, शेकडो हेक्ट्ररमधील भातपीक धोक्यातमेघागर्जना आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली.
मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वेळोवेळी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं भात पिकासह पालेभाज्यांची शेतीही धोक्यात आली आहे.
काल झालेल्या पावसानं अनेक हेक्टर मधील भात पीक जमीनदोस्त झाला आहे
आज परत सलग दुसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला.
यामुळं हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
चोरट्याचा धुमाकूळ, वयोवृद्ध पती-पत्नीचा खून; पत्नीच्या डोक्यात कुकर, तर पतीला फेकले विहिरीतलातूरच्या गरसुळी इथ शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करून दागिने लंपास केल्याची धक्कादाय घटना घडली आहे...
तर या घटनेत चोरट्याने अत्यंत क्रूरपणे अर्धांगवायू झालेल्या वृद्ध व्यक्तीस खून करून जवळच असलेल्या विहिरीत फेकले आहे,तर वृद्ध महिलेचा डोक्यात कुकर घालून, दगडाने ठेचून तिचा खून केला. आणि चोरटा पसार झाला..
मात्र या घटनेची माहिती लागताच लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात आरोपीला गजाआड केले आहे...
दरम्यान आरोपी हा गावातीलच असल्याच पोलीस तपासात समोर आल आहे...
चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून केल्याच निष्पन्न झाल आहे.. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळे याला अटक करण्यात आली आहे..
मंगरुळपिर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर, वृद्धेच्या घराचे छत उडाले, एक जण जखमीवाशिम जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे मंगरुळपिर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चिखली झोलेबाबा या गावात चंद्रकला श्रीराम खंडारे (वय ७०) यांच्या घरावरचे छत वाऱ्याने उडून गेले.
त्यामुळे त्यांचा परिवार उघड्यावर आला असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर या घटनेत शेजारील नाना देवा खंडारे (वय ४०) यांच्या हातावर व डोक्यावर उडालेले टीन पत्रे पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चंद्रकला खंडारे या वयोवृद्ध महिलेने प्रशासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई तसेच मदत देण्याची मागणी केली जात आहे.
स्वस्तात मिळणाऱ्या टोमॅटोमागील भयानक वास्तव, सडलेला टोमॅटो पुन्हा विक्रीस ?आशिया खंडातील सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठेत एक धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे खराब झालेला टोमॅटो बाजारात फेकण्यात आला होता. मात्र, एक व्यक्ती हेच सडलेले टोमॅटो गोळा करताना साम टीव्ही च्या कॅमेरात कैद झाले आहेत.
गोळा केलेले हे टोमॅटो नंतर किरकोळ बाजारात स्वस्तात विकले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या प्रकाराकडे बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
सडलेले, नाशवंत टोमॅटो आणि भाजीपाला पुन्हा गोळा करून विक्रीस पाठवणे ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोकादायक बाब आहे.
ग्राहकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, विशेषतः अतिशय स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या भाजीपाल्याबाबत.
बाजार प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.
Akkalkot: अक्कलकोट तालुक्यात में महिन्यातच भरले साठवण तलावमें महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. घोळसगाव येथील साठवण तलाव ७५% भरला असून, येथील पाझर तलाव तब्बल १००% भरलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे.
मे महिन्यात नेहमी कोरडी असणारी ही जलसाठ्ये यंदा पावसामुळे भरून निघाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातील पाणीटंचाईसारख्या समस्या काही अंशी टळण्याची शक्यता असल्याने ही स्थिती सकारात्मक मानली जात आहे.
ताज्या पावसामुळे शेतीच्या पूर्वतयारीस गती मिळणार असून,खरीप हंगामासाठी लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा जोर आणखी काही दिवस राहिल्यास तालुक्यातील इतर जलसाठ्यांनाही लाभ होणार आह
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवेच्या तीन तेरानवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनातले डॉक्टर हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आयुक्तांकडे 4 डॉक्टर जणांनी अर्ज केला आहे
त्यात आरोग्य प्रशासनातले 5 डॉक्टर वॉर्ड ऑफिसर आणि उपायुक्त पदावर बसलेले आहेत
त्यामुळे आरोग्य सेवेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे तीन तेरा वाजले आहेत एकीकडे पावसाळा सुरू झालेला आहे त्यात कोरोनाची संख्या नवी मुंबईत वाढत आहे मात्र डॉक्टरांना उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर होण्यासाठी आणि मलाई खाण्यासाठी डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 11 जून पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेशहा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात.
अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते.
7 जून रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
Amravati: अमरावतीत 2 लाखांचा सुगंधित गुटखा जप्तनागपुरी पोलिस स्टेशन हद्दीत अमरावती गुन्हे शाखा 1 ची कारवाई..
गुटख्याचे 3528 पॅकेट केले जप्त..
दोन आरोपी विरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..एक आरोपी अटकेत..
या कारवाई मुळे अमरावतीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले..
Amravati: अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीज पुरवठा बंदवीज वितरण महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात...
दुरुस्ती साठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे
पाऊस व वादळामुळे वीजपुरवठा प्रभावित होते त्यामुळे पावसाळा लक्षात घेता देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने अमरावती शहरातील विज पुरवठा करण्यात येणार बंद..
वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण कंपनीकडून आवाहन
आजपासून सहा दिवस सकाळच्या दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना त्रास होण्याची शक्यता
कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 ची निविदा निघाली, बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून होणार सुटकामेट्रो 14 मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल.
खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल.
या मेट्रोवर 15 स्थानके त्यातील 13 उन्नत स्थानके असणार आहे.असणार आहेत.
बदलापूर, अंबरनाथ, निलजे, शिळफाटा, महापे, घणसोली या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग येथे मुंबईच्या हद्दीत पोहोचेल.
Panchvati Crime: पंचवटीमध्ये 19 वर्षीय मुलाचा टोळक्याने केलेल्या मारहाणीत खूनआठवडे बाजार मध्ये वडील सोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षीय मुलाचा चार जनाचे टोळक्याने चाकू ने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना बुधवारी संद्याकाळी पंचवटीतील भाजी पटांगण परिसरात पुला खाली घडला.
नंद लाल उर्फ सूरज जगत दास रा.सीता गुंफा पंचवटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
सूरज वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेला होता वडील भाजी खरेदी करण्यास गेला होते.
सूरज गाडगे महाराज पुल खाली सुलभ जवळ उभा असताना चार संशयित आले.
पैशांची मागणी केली.देण्यास नकार दिला असता संशयिताने डाव्या बाजुला पोटात चाकू मारला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हीलमध्ये नेले उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टर ने मृत घोषित केले.
या बाबत पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी एक संशयित ताब्यात घेतला असून इतरांचा शोध सुरू आहे. संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.