नवी दिल्ली आम्ही काही करण्याआधीच भारताच्या ब्रह्मोस या क्षेपणास्त्रानं पाकिस्तानची कशी अवस्था करुन ठेवली हे अखेर पाकिस्ताननं मान्य केलं आहे. या आशयाचं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एका जाहीर केलं. सुरुवातीला शरीफ यांनी सागंगित होतं की, भारताच्या हल्ल्याला पाकिस्ताननं जशास-तसं उत्तर दिपलं आहे. पण आता ऑपरेशन सिंदूरमुळं आमचं किती नुकसान झालंय ते दाखवताहेत. अझरबैझानमधील लाचिन इथं एका द्विपक्षिय शिखर संमेलनात ते बोलत होते.
शरीफ यांनी पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या हे कबूल केलं की, भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोससह अन्य क्षेपणास्त्रांनी रावळपिंडी एअरबेससहित पाकिस्तानच्या अंतर्गत ठिकाणांवर हल्ले केले. पाकिस्तान हल्ल्याबाबत काही विचार करण्याआधीच भारतानं पाकिस्तानातील टार्गेटला निशाणा बनवलं. ते पुढे म्हणाले की, आम्ही ९-१० मेच्या रात्री भारतीय सैन्याला धडा शिकवण्यासाठी हल्ला करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांमध्ये हल्ले केले.
भारतानं पाकिस्तानचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केलेभारताच्या अत्यंत कार्यक्षम ठरलेला एअऱ डिफेन्स सिस्टिमन पाकिस्तानातील ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. पाकिस्तानं ड्रोन्स आणि हवेतच ते निष्प्रभ्र केले. भारताय सैन्याचं हे शौर्य पाहून पाकिस्तानच्या डीजीएमओयांनी भारताना फोन करुन सीझफायर करण्यास सांगितलं. अशीही माहिती समोर येत आहे.