Maharashtra News Live Updates: अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव
Saam TV May 30, 2025 04:45 PM
तरुण-तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विजय घायवटच्या पत्नीला तब्बल चार महिन्यानंतर अटक.

- तथाकथित कौन्सिलर बनवून तरुण-तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या विजय घायवटच्या पत्नीला तब्बल चार महिन्यानंतर अटक.

- पायल घायवट असं महिलेचा नाव आहे.

- विजय घायवट हा हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत समुपदेशन केंद्र चालवत होता. त्या ठिकाणी वस्तीगृह होते आणि तरुणी तिथे राहत होत्या. चार महिन्यांपूर्वी त्याचावर गुन्हा दाखल झाला होता.

- आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत, त्यांचा तरुणीची लैंगिक शोषण करत असल्याचा प्रकार चार महिन्यापूर्वी उघडकीस आला होता..

- या प्रकरणात विजय घायवटची पत्नी पायल ही सुद्धा कधीतरी त्याची विद्यार्थिनी होती. नंतर त्याने तिच्याशी विवाह केला होता. तिच्या माध्यमातून अनेक तरुणींना जाळ्यात ओढल.

- विशेष म्हणजे विजय घायवटला या सगळ्यांमध्ये त्याची पत्नीची ही मदत असल्याचा आरोप पोलीस तपासात करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज पुण्यात दोन कार्यक्रम

दुपारी ४ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे 'युवा प्रेरणा संवाद या कार्यक्रमाला फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

संध्याकाळी ५.३० वाजता खजिन्यांची शोधयात्रा या पुस्तकाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट

शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.

कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांची मागणी.

अकोल्यातल्या महागावमध्ये माणसं पूर्व झालेल्या पावसामुळे केळी बागा अक्षरशः उध्वस्त झाले.. जोराच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागाच मोठं नुकसान झालं.. अद्यापही महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली नाही, असा आरोप शेतकरी करतायेत.. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची दखल घेत, कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर यावा आणि नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षा अर्थातच मागणी शेतकरी करतायेत.. कारण मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे केळी पपई यासह अन्य फळबागांना मोठा फटका बसला आहे

माजी मंत्री धनंजय मुंडे मनःशांती साठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात

- मंत्री मंडळात परतण्याची आशा मावळल्यानंतर धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात ध्यान साधनेत मग्न

- इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं विपश्यना केंद्र आत्मशांती आणि अंतर्मुखतेचं केंद्र म्हणून प्रसिद्ध

- मागील ८ दिवसांपासून धनंजय मुंडे विपश्यना केंद्राच्या १० दिवसांच्या शिबिरात सहभागी

- शनिवारी ३१ तारखेला मुंडेंची १० दिवसांची विपश्यना होणार पूर्ण

Maharashtra News Live Updates: अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव

अमरावती महापालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण...

अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ....

कोरोना पॉझिटिव्ह महिलेला श्वास घेण्यास त्रास झाल्याने केली तपासणी...

सध्या या महिलेवर गृहविलेगीकरणात उपचार सुरू....

आरोग्य विभाग व महानगरपालिकेचे पथक पॉझिटिव्ह रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांच्या संपर्कात..

कोरोनाच्या संभावित लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय...

दहा खाटांचा कोरोना वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलाय

काम न झालेल्या रस्त्याचं बिल अदा, अन रस्ता अर्धवट!

उल्हासनगर शहरातील वडोळ गावातील पुलापर्यंतच्या रस्त्याचं काम अर्धवट असतानाही ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलंय. यामुळं नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

सांगली.. मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर !

लाडका भाऊ असणाऱ्या मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतले कर्मचारी सध्या वाऱ्यावरच आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारया निर्णयाची अंमलबजावणी करून आडवणूक होणाऱ्या नियुक्त तातडीने करण्याबरोबर थकीत वेतन देण्यात यावं,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना कर्मचारी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.येत्या पाच जून पर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे याबाबतचे निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना देखील देण्यात आले आहे.

बिलो रेटने केलेल्या कामांचं VJTI कडून होणार ऑडिट!

अंबरनाथ पालिकेत गेल्या काही वर्षात टेंडरची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच स्पर्धेतून अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने, म्हणजेच बिलो रेटने काम करण्याचं प्रमाणही वाढलंय.अंबरनाथ पालिकेनं एखाद्या रस्त्याच्या काँक्रिटिकरणासाठी १ कोटी रुपयांचं टेंडर काढलं, तर ते काम करण्यासाठी साधारण ८ ते १० ठेकेदार अर्ज भरतात. यात सर्वात कमी दर ज्याने भरला असेल, त्याला हे काम दिलं जातं. पण हे काम आपल्याला मिळावं, यासाठी ठेकेदार चक्क २० ते ३० टक्के कमी दर भरतात. म्हणहेच १ कोटीचं काम ७० लाखात करून द्यायला तयार होतात. यात पालिकेचा पैसा वाचत असल्याने पालिका या ठेकेदाराला काम देते. पण १ कोटीचं काम ७० लाखात केल्यावर कामात दर्जा राखला जातो का? हा प्रश्न निर्माण होतो.याच प्रश्नाचं उत्तर म्हणून पालिकेनं आता अशा बिलो रेटने झालेल्या कामांचं VJTI सारख्या नामांकित संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. यात १० कामांची यादी VJTI ला पाठवण्यात आली असून या ऑडिटनंतर दूध का दूध आणि पानी का पानी होणार आहे.

सांगली.. लग्न कार्यालयातच रक्तदान शिबिर.. रक्तदान करूनचं नवरदेवाने बांधली लग्न गाठ..

रक्तदान हेच श्रेष्ठदान,असा सामाजिक संदेश देण्यासाठी एका नवरदेवाने थेट लग्नाच्या कार्यालयातच रक्तदान शिबिराचा आयोजन केलं.आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी स्वतः रक्तदान देखील केलं. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथे हा लग्नाबरोबर रक्तदान शिबिराबरोबरचा अनोखा सोहळा पार पडला.प्रवीण येवले,या तरुणाने आपला लग्नाच्या निमित्ताने रक्तदानाबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या लग्नाच्या दिवशीच लग्न कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केलं होते.या लग्नाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील उपस्थिती नवरदेवाला शुभेच्छा दिल्या..

ग्रामस्थांनी स्वखर्चातून केले गावातील रस्त्याचे खडीकरण...

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील निपाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत होते, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता, शिवाय रस्त्यावर साचलेल्या या गटारांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, या संदर्भात ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी पुढाकार घेत, गावातून जवळपास एक लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आणि या मुख्य रस्त्याची पायाभरणी खडीकरण काम पूर्ण केले आहे, यामध्ये प्रामुख्याने गावातील तरुणांनी मोठा पुढाकार घेतला, ग्रामपंचायतला गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे, मात्र मूलभूत सुविधा देण्यासाठी निपाना ग्रामपंचायत अपयशी होत असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे...

वादळाचा केळी पिकाला जबर फटका, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धुळे जिल्ह्यात एका आठवड्यापासून सातत्याने पाऊस, वादळ होत आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. वादळी पावसाने सेलू तालुक्यातील धोंडगाव शिवारात शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये धोंडगाव शिवारातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतात असलेले केळीचे पीक उद्ध्वस्त झाले.

मुंगाच्या शेंगांना कोंब येत असल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात चारल्या शेळ्या मेंढ्या

बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड करण्यात आली होती, मात्र या पावसामुळे मुगाच्या शेंगांना कोंब येत आहेत, त्यापासून कुठलेही उत्पन्न आता मिळणार नसल्याने दुधा येथील प्रेम सास्ते या शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे...

अकोल्यातला मुख्य भुयारी मार्ग पाण्यामुळे बंद

मान्सूनपूर्व पावसामूळ अकोल्यातला मुख्य भुयारी मार्ग अर्थातच अंडरपास पाण्यामूळ बंद पडलाये.. या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय.. साचलेल्या पाण्यात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन अडकून पडताहेत. अकोल्यातल्या टॉवर चौकापासुन गांधी मार्गावर निघणारा हा अंडरपास मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद आहेय.. कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा अंडरपास मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलाय..... जवळपास 3 फूट पाणी या अंडरपासमध्ये साचले

रायगड महसूल विभागात समुपदेशनाने बदल्या

रायगड महसूल प्रशासनातील संवर्ग 3 मधील तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आणि लिपीक अशा 177 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या समुदेशन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. रायगडच्या महसूल विभागात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात आला असून त्यामुळे कर्मचारी बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप आणि अन्य दबाव टाळण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. या अभिनव प्रक्रियेमुळे कर्मचारी समाधानी असल्याचा दावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केला आहे. कर्मचारी बदल्यांसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत पारदर्शक पद्धतीने ही बदली प्रक्रिया पार पडली. कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.