"यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है..."; YJHD चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण, वाचा 'नैना'चे ४ फेमस डायलॉग
Saam TV May 31, 2025 10:45 PM

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. त्यातील 'ये जवानी है दीवानी' (Yeh Jawaani Hai Deewani) हा सर्वात गाजलेला सुपरहिट चित्रपट आहे. आजही या चित्रपटाची गाणी आणि डायलॉग चाहत्यांना पाठांतर आहेत. आज दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'ये जवानी है दीवानी' चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.

'ये है दीवानी' मैत्री, प्रेम, आत्मशोध आणि स्वप्नांच्या मागे धावण्याची ही कथा आजही प्रेक्षकांच्या मनावर तितक्याच प्रभावीपणे अधिराज्य गाजवते. या प्रवासात 'नैना' आणि 'बनी' या पात्रांशी आपली ओळख झाली. 'नैना' ही भूमिका दीपिका पदुकोणने साकारली तर रणबीर कपूरने 'बनी' हे पात्र साकारले. शांत, संवेदनशील, समजूतदार आणि मनाने निरागस असलेली 'नैना' (पदुकोण) चाहत्यांचा मनात घर करून गेली. 'ये जवानी है दीवानी' चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे 'नैना' चे चित्रपटातील खास संवाद पाहूया.

"यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है। एक बार खुला तो सिर्फ़ एक टुकड़ा नहीं खा पाओगे"

या ओळींमधून गोडी आणि नात्यांमधील भावनिक गुंतवणूक किती खोल आहे, हे स्पष्ट होतं. एकदा का आपण जुन्या आठवणींमध्ये डोकावू लागलो की सगळ्या भावना परत जाग्या होतात.

"कभी-कभी कुछ बातें हमारे यादों के कमरे की इतनी खिड़कियां खोल देती हैं कि हम दंग रह जाते हैं"

अतिशय काव्यात्म शैलीत, भूतकाळाची अचानक जाणीव होण्याचं यात सुरेख वर्णन केले आहे . दीपिकाच्या भावस्पर्शी अभिनयामुळे हा संवाद अजून परिणामकारक वाटतो.

"जितना भी ट्राय करो जिंदगी में कुछ ना कुछ तो छूटेगा ही, तो जहां है वही का मजा लेते हैं"

आयुष्याचा एक अत्यंत साधा पण खोल अर्थ सांगणारा हा डायलॉग आहे. नैना आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षण जगा, परिपूर्णतेच्या मागे धावू नका.

"कुछ वक्त दो सब ठीक हो जाएगा..."

कठीण प्रसंगी दिलासा देणारी, आपल्याला शांत करणारी आणि आधार देणारी ओळ आहे. नैनाच्या समजूतदार स्वभावाची झलक यातून आपल्याला पाहायला मिळते.

12 वर्षांनंतरही हे संवाद आजही तितकेच ताजे आणि हृदयाला स्पर्श करणारे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.