किडनी स्टोन असा आजार आहे ज्याचे निदान लवकर होत नाही. किडनी स्टोन झाल्यावर पोटात दुखतं आणि लघवी करतानाही त्रास होतो. काहीवेळा ओषधांनी तर काही वेळा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. किडनी स्टोनच्या वेदना असह्य असतात. त्यामुळे किडनी स्टोन रुग्णांना आहाराच्याबाबतीत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण बऱ्याचवेळा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्टोनची समस्या उद्भवते. त्यामुळे तज्ज्ञमंडळीकडून असा सल्ला देण्यात येतो की, साखर, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांनी समृद्ध पदार्थ खाऊ नयेत. काही फळांमध्ये हे घटक असल्याने अशी फळे किडनी स्टोन रुग्णांनी खाणे टाळले पाहिजे.
केळी आरोग्यदायी आणि बाराही महिने उपलब्ध असणारे फळ आहे. पण, किडनी स्टोन आणि डायबिटीस असलेल्या रुग्णांनी त्याचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे. कारण यात साखर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असेल तर केळी खाणे टाळा.
एवाकॅडो हे फॉस्फरस किंवा सोडियमचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. याशिवाय यात पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. एका रिपोर्टनुसार, पोटॅशियमयुक्त पदार्थ खाल्लाने किडनीवर प्रेशर येते, जे किडनीसाठी योग्य नाही.
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीने चुकूनही जर्दाळू खाऊ नये. खरंतर, जर्दाळू हे पोटॅशियम असलेले अन्न आहे, जे किडनीसाठी हानिकारक आहे.
संत्र्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीसाठी योग्य नाही. तुम्ही संत्रीऐवजी द्राक्षे, सफरचंद खाऊ शकता.
किवी फळामध्ये भरपूर ऑक्सलेट आणि पोटॅशियम असते, जे किडनी स्टोनसाठी धोकादायक ठरू शकते.
किडनी स्टोन रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे भरपूर पाणी असलेली फळे तुम्ही खायला हवीत. कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, टरबूजसारखी फळे तुम्ही खाऊ शकता. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
हेही पाहा –