रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीनंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या या त्रिकुटाने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्ससमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 228 रन्स केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मा याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही चौफेर फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. तर अखेरच्या क्षणी हार्दिकने मोठे फटके मारले.त्यामुळे मुंबईला 220 पार मजल मारता आली. मुंबईच्या फलंदाजानंतर आता गोलंदाज कशी कामगिरी करतात? याची उत्सकूता चाहत्यांना आहे.