Covid-१ cases प्रकरणांवर प्रतप्राव जाधव: राज्यासह देशात काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग, आयुष विभाग यासाठी तयार आहे. लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने मोठं काम केलं आहे. आरोग्य विभागाने सर्व राज्याचे आरोग्यमंत्री, सचिव यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळी होऊ नये, यासाठी आमचं विभाग पूर्ण तयार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) 76 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 अॅक्टिव कोरोना रूग्णांची संख्या आहे. तर मुंबईत 27 पुण्यात 21, आणि ठाण्यात 12 अॅक्टिव रूग्णांची संख्या आहे. तर देशभराचा विचार केला तर, देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. याच विषयी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर सुप्रीम कोर्टाने देखील चिंता व्यक्त केली होती. कोर्टाने सरकारला यावर उपाययोजना करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही हे पोर्टल बनवण्याचा निर्णय घेतला. सरकारचा संकल्प आहे की देशात सुरू असलेल्या फसव्या जाहिराती रोखल्या जाव्यात. यासाठी राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. हे पोर्टल बनवल्यामुळे देशभरात कुठेही तक्रार आली तरी ती सोडवण्यासाठी फायदा होईल. यामुळं लोक देखील हुशार होतील आणि कोणी खोटं औषध विकत असेल तर त्यावर आम्ही आणि आमचा विभाग लक्ष ठेवून कारवाई करू, अशी माहिती ही मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अजब प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील जवळपास 20 ते 22 गावातील नागरिकांना अचानक केस गळतीचा व टक्कल पडण्याचा त्रास सुरू झाला. “एबीपी माझा”ने सर्वात प्रथम ही बातमी उजेडात आणल्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागं झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या आयसीएमआरच्या (ICMR) पथकाला या परिसरात संशोधन करण्यासाठी पाठवलं. लाखो रुपये खर्च करून आयसीएमआरच पथक या परिसरात आलंही. त्यांनी रुग्णांचे नमुने ही घेतले. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र आयसीएमआर च पथक फक्त पर्यटनासाठी तर नाही आलं नव्हतं ना…? असा सवाल उपस्थित राहत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रकार संपतो न संपतो तोच या परिसरात केस गळती झालेल्या रुग्णांची नख गळती सुद्धा झाली होती. त्याही वेळेस केंद्राने तात्काळ एक आपत्कालीन पथक या परिसरात अभ्यासासाठी पाठवलं होतं. मात्र या पथकाचाही अहवाल अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयसीएमआर चे पथक व केंद्राचा आकस्मित पथक या भागात पर्यटनासाठी तर नाही पाठवलं होतं…? जिल्हा व आरोग्य प्रशासन याबाबतीत उदासीन आहे. सरकारला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही का…? असे सवाल आता उपस्थित राहत आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..