हिल्यानगर जिल्हयात मान्सुनपूर्व पावसाने मागिल आठवड्यात हाहाकार माजवला होता..
मुसळधार पावसामुळे शेतशिवार जलमय झाले होते मात्र तिन ते चार दिवसांपासुन पावसाने उसंत घेतल्याने खरीपाच्या मशागतीला वेग आलाय..
ट्रक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने रान तयार केले जात आहे..
तसेच बी - बीयाणे, खते, औषधे खरेदीसाठीची तयारी देखील बळीराजा करत आहे..
पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांचा निघाला पंढरपूरला पायी पालखी सोहळा,15 वारकरी, 400 किलोमीटर करणार पायी प्रवासआषाढी एकादशी म्हटलं की वेध लागतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, हजारो नाहीतर लाखो वारकरी पालखी घेऊन पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपुरात दाखल होत असतात, असेच पहिल्यांदा वाशिम येथील दिव्यांग वारकरी संत सूरदास महाराज दिव्यांग वारकऱ्यांचा पायी पालखी सोहळा घेऊन पंढरपूरसाठी निघाले आहेत,15 दिव्यांग वारकरी 35 दिवसात 400 किलोमीटर पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरपूरला दाखल होणार आहे.
बांधकामासाठी मुक्कामी असलेल्या कामगारांचा प्रताप, भाविकांमधून व्यक्त केला जातोय संतापपरळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात विकास कामे सुरू आहेत.
या ठिकाणी बांधकामावर असलेल्या कामगारांनी याच परिसरात मांसाहारी जेवण बनवले असल्याचे समोर आले..
या परिसरातील काही भाविकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जात याचा व्हिडिओ देखील चित्रित केला असून आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे..
या प्रकरणात कारवाई करावी व यापुढे असे प्रकार होणार नाहीत अशी दक्षता घेण्याची मागणी आता भाविकांमधून केली जात आहे.
डॉ. महाजन हत्याकांडातील दोषी लीना देवस्थळीची सुटकाकडे करून कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आले होते
पुणे पोलिसांच्या तपासात लीना देवस्थळी व दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले
देवस्थळी मायलेकींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात या मायलेकींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
१९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर देवस्थळी यांची सुटका करण्यात आली
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साठ वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारा
सेवानिवृत्ती नंतरही शिक्षकाला न्याय मिळाला नाही आजपासून प्राणांतिक उपोषण सुरूपुण्यातील बहुचर्चित डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात जन्मठेप झालेल्या लीना अनिल देवस्थळी (वय ६५) यांची सुटका
१९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर देवस्थळी यांची सुटका करण्यात आली
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या साठ वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका
पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणाऱ्या डॉ. दीपक महाजन यांचे जुलै २००६ मध्ये अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती
त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या शरीराचे आठ तुकडे करून कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आले होते
पुणे पोलिसांच्या तपासात लीना देवस्थळी व दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले
देवस्थळी मायलेकींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात या मायलेकींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती
अमरावती शहरात थातूरमातूर नालेसफाई, अमरावतीत नालेसफाईचे तीन तेरापावसाळ्यापूर्वी नाल्या तुडुंब भरू नये व नाल्याचे पाणी रस्त्यावर किंवा कोणाच्या घरात शिरू नये यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाल्यांची साफसफाई करण्याची मोहीम सुरू आहे,
मात्र अमरावती शहरात नालेसफाईचे पूर्णपणे तीन तेरा वाजले आहेत,अमरावती शहरातील अर्जुन नगर मधील शिवशक्ती अपार्टमेंटला लागून असलेला नाला व इतर नाले अत्यंत थातूरमातूर पद्धतीने साफ करण्याचा केवळ दिखावा करण्यात आला,
नाल्यातील गाळ काढण्यात आला नाही..
नाल्यातील झाडे झुडपे तसेच आहे त्यामुळे कागदोपत्रीच अमरावती शहरातील नाले सफाईच अभियान सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे...
हीच परिस्थिती शहरातील अनेक भागात आहे कारण नाल्यातील गाळ नाल्याच्या काठावरच टाकला जातो आहे...
संजय राऊतएकनाथ शिंदेचा काचारा केला आहे, लवकरच ते कचऱ्याच्या डब्यात जाणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे विधान प्रकरणविरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा सातत्यिकी सावरकर यांच्या आईकडील वंशावळ तपासण्याचा अर्ज फेटाळला
खटला हा सावरकरांच्या बदनामी विषयी आहे त्यामुळे हेमांगी सावरकरांची वंशावळची गरज नसल्याचे कोर्टाचे मत
सात्यकी सावरकर यांचा ही अर्ज न्यायालयाने फेटाळला
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती
हा अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील गणेश कला रंग मंच या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग घेतला
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली
ज्ञानेश्वरी म्हणताना चंद्रकांत पाटील हे भक्तीरसात तल्लीन झालेलं पाहायला मिळालं
अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायमअक्कलकोट तालुक्यातील बोरगाव,घोळसगाव,किरनाळी गावांना पावसाने झोडपले
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे - नाले तुडुंब भरून लागले वाहू
अक्कलकोट तालुक्यात सुरु असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारात ही शिरलं पाणी
Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावरजिजाऊ सामाजिक संस्था संचालित भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उदघाटनास उपस्थिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण भागासाठी घंटागाडी लोकार्पण
माहिती कार्यालयच्या कोकणविभागीय पत्रकार कार्यशाळेस सदिच्छ भेट
Mumbai-Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कंटेनरला लागली आगमुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोंडये येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली.
मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता.
मध्यरात्री अडीच वाजता या कंटेनरला कोंडये येथे अचानक आग लागली..
दरम्यान आगीची घटना समजताच राजापूर नगर परिषदेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला.
त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली..
या घटनेत कंटेनरचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे, मात्र 70 टक्के माल वाचविण्यात यश आलं..
Maharashtra Politics News Live: शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र येणारवसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार
शिवाजीनगर येथील साखर संकुल याठिकाणी बैठकीच्या आयोजन
बैठकीला जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार
आज दुपारी दोन वाजता साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन
Maharashtra Politics: मनसेचे १०० कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये करणार प्रवेशमनसे कार्यकर्ते सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आज प्रवेशासाठी मोदी बागेत दाखल
मनसे चे रोहन गायकवाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह मोदी बागेत
शरद पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश
अवकाळी पावसाने, येलदरी, सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यात वाढहिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात सातत्याने कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नदी व नाल्यांना पूर आला होता
यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर येलदरी व ईसापुर धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे, उन्हाळ्यात तापमानामुळे तिन्ही धरणातील
पाणीसाठा मृत अवस्थेत असताना या अवकाळी पावसामुळे आता तब्बल 23 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा धरणक्षेत्रात जमा झाल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे दरम्यान मागील दशकभरात पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या मे महिन्यात धरणात पाणी साठवण्याची आवक झाली आहे
समस्यांच्या जाळ्यात सापडलेली मासेमारी आजपासून बंदआजपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी राहणार बंद
यावर्षीचा माच्छिमारी हंगाम संपल्यानंतर मच्छिमारी नौका बंदरात
मत्स्य विभागाने या बाबतचे आदेश केले जारी
बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
जुन जुलै माशांचा प्रजननाचा काळ, १ जून ते ३१ जुलै पर्यत मासेमारीवर बंदी
वादळी वारे आणि अवकाळी पावसाने या हंगामात मच्छिमारांचे नुकसान
Ratnagiri Rain News: रत्नागिरीत सकाळी अचानक पावसाची हजेरीगेले काही दिवसांपासून अचानक दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीत सकाळीच दमदार हजेरी लावलीय.
सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे,मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
गेले काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अचानक पावसाने दडी मारल्यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक देखील हैराण देखील झाले होते.
पावसाच्या आगमनामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा मिळाला आहे.
Pune Rain News: पुण्यात पावसाला सुरुवातपुण्यातील मध्यवर्ती भागात जोरदार पावसाच्या सरी
सकाळी कडक उन्हानंतर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिर्डोशी खोऱ्यात, भात पेरणीला सुरुवातशेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीने भात पेरणीची लगबग सुरू
मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांकडून भात पेरणी
पावसाच्या भिती पोटी शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग
पावसात खाचरात पाणी साचून ओलावा टिकून राहिल्याने कुदळीने करावी लागतायेत पेरणीची कामे
कोरड्या ठिकाणी बैलांच्या औताच्या सहाय्याने केली जातेय पेरणी
दरवर्षी धूळ वाफेवर ट्रॅक्टर किंवा औताच्या साहाय्याने भात पेरणी केली जाते. मात्र यंदा पंधरा दिवस अगोदरच पावसाने सुरुवात केल्याने, या पावसाने चांगलेच अडचणीत आणले आहे
पेरणी आणि मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत
पाऊस उघडल्याने खाचरात ओलावा असतानाही, जमीनीचा वापसा न पाहताच महिलांना घेऊन कुदळीने पेरणी केली आहे
Pune News: पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरण, तीन डॉक्टरांवर कारवाईबी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टर ६ महिन्यांसाठी निलंबित
निलंबित डॉक्टर यांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी
शैक्षणिक व परिषदांतील सुद्धा या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणि प्रत्येकी १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे
२८ एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने ४ दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली
डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले
PMPML: पुण्यात आजपासून पीएमपी प्रवास महागलाआजपासून नव्या दरांची अंमलबजावणी
पीएमपी प्रशासनाने प्रवासी भाड्यांमध्ये वाढ केली आहे
आज १ जूनपासून ती लागू झाली आहे
किमान तिकीट ५ रुपयांऐवजी आता १० रुपये झाले आहे
१ ते ५ किमी अंतरासाठी नव्या दरानुसार १० रुपये मोजावे लागतील
दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ झाली असून, एकत्रित दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १५०० रुपये इतका झाला आहे
मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सवलती पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत
शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्या, दोघांना सहा महिन्याचा करावासलातूरच्या मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता...
दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 5हजार रुपये दंड, आणि सहा महिन्याचा कारावास सुनावला आहे...
या खटल्यात पीडित मुलीचा जवाब आणि इतरांची साक्ष महत्वपूर्ण ठरली, त्यामुळे दोषींना ही शिक्षा देण्यात आली आहे.
Ulhasnagar Crime: मोबाईल दुकानावर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाणनीरज यादव असं मोबाईल रिपेरिंग करणाऱ्या दुकानदाराचं नाव आहे,नीरज याच्याकडे मोबाईल डिस्प्ले बनविण्यासाठी तीन तरुण आले ,त्यांना 1500 रू खर्च लागेल असं सांगितलं, पुन्हा ते 5 ते 10 मिनिटाने दुकानात येऊन वाढीव किंमत का सांगितले यावरून वाद घातला,यावेळी त्या तीन तरुणांनी थेट कंबरेला लावलेला पट्ट्या ने नीरज याला बेदम मारहाण केली
उल्हासनगरमध्ये रफिक पार्सलवाल्याच्या गुंडगिरीचा कहर, युवकावर लाकडी बांबूने हल्ला, हात फ्रॅक्चरउल्हासनगर कॅम्प 5 मधील बसंत बहार परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका युवकावर बांबूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अतिक खान (वय अंदाजे २८) या युवकावर रफिक पार्सलवाले गटाच्या ५ ते ६ जणांनी लाकडी बांबूने मारहाण केली.
या हल्ल्यात अतिकचा एक हात फ्रॅक्चर झाला असून दोन्ही पायांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
तीन दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मिटलावर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी..
प्रत्येक वृत्तपत्रा पावने दोन रुपये दहा पैसे कमिशन देण्याची वृत्तपत्र विक्रेत्यांची मागे
काल नागपूरला वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये तोडगा निघाल्याने अमरावती अमरावती शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे
अमरावती शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू
वृत्तपत्र विक्रेते संपावर गेल्यामुळे जवळपास 60 हजार पेक्षा अधिक वृत्तपत्र वाचकांना बसला होता फटका.
आज अमरावती शहरात घरोघरी पोहोचत आहे वृत्तपत्र
सिहोरा येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अत्याचार करणाऱ्या युवकास अटकलग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची घटना सिहोरा येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
मंगेश रहांगडाले (२५) रा. सिहोरा, असे आरोपीचे नाव आहे.यातील आरोपी मंगेशने पिडीताच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचेवर अत्याचार केला.
आरोपी हा इतकेवरच थांबला नाही तर आरोपीने 'या बद्दल कोणालाही काहीही सांगितल्यास तुझी बदनामी करीन', अशी धमकी दिली.
पिडीतेसोबत घडलेला प्रकार पिडीतेच्या वडिलास माहिती झाल्यावर त्यांनी आरोपीस याबद्दल बोलले असता आरोपीने पिडीतेच्या वडिलाला सुद्धा बदनामीची धमकी दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध सिहोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
परंडा तालुक्यात निसर्गाचा चमत्कार, दुधी गावात विना पंपाचे बोअरवेलमधुन मोठ्या दाबाने वाहु लागले पाणीधाराशिवच्या परंडा तालुक्यातील दुधी येथे निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत असुन शेतकरी उमेश जाधव यांच्या बोअरवेल मधुन विना पंपाचे मोठ्या दाबाने पाणी वाहु लागल आहे.
उमेश जाधव यांनी त्याच्या शेतात उन्हाळ्यात 250 फुट बोअर घेतला होता, गेल्या 10 दिवसापासून या बोअर मधुन विना पंपाचे तिन ते चार इंज पाणी मोठ्या दाबाने वाहत आहे.
तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने बोअरमधून पाणी वाहत असल्याचा अंदाज आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कारने 12 जणांना उडवलंया प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे.
त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काल झालेल्या अपघातात ९ जणं जखमी झाले होते तर यातील २ जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.
Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बस आणि आयसर टेम्पोमध्ये भीषण अपघाततलासरीच्या धुंदलवाडी येथील घटना.
मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघात.
अपघातात खाजगी बस मधील वाहकाचा जागीच मृत्यू तर तीन प्रवासी जखमी.
रियाज असं मृत वाहकाचं नाव.
अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी.
सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
लता आणि करिष्मा हगवणेचा मोबाईल अखेर पोलिसांनी निलेश चव्हाण यांच्या घरातून केला जप्तवैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी तीन मोबाईल फोन आणि एक बंदूक असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त केलेल्या मोबाईल मध्ये करिष्मा आणि लता हगवणे यांचा मोबाईलचा देखील समावेश आहे आणि ज्या बंदुकीच्या राखावर निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं होत.
ती बंदूक देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर काल बावधन पोलिसांनी त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घराची झळती घेतली होती, त्यावेळी पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे
तुळजापुर ड्रग्स प्रकरणातील सेवन गटातील आरोपी विनोद गंगणे यांना जामीन मंजुरतुळजापुर येथील बहुचर्चित ड्रग्स प्रकरणात विनोद गंगणे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
विनोद गंगणे मागील दीड महीन्यापासुन फरार असुन धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. व्ही व्ही टुशिंग व अॅड. अंगद पवार यांनी गंगणे यांची बाजु मांडली गंगणे यांनीच पोलिसांना टिप दिली असल्याने ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्याचा युक्तीवाद यावेळी गंगणे यांच्या वकिलांनी केला.
दरम्यान अंतिम सुनावणीला गंगणे यांना कोर्टात उपस्थित रहावे लागणार आहे.
14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथुन ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते या प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग असुन 19 आरोपी अटक आहेत तर 18 आरोपी अजूनही फरार आहेत.
वणी जवळ आढळल्या प्राचीन निरगुडा गावाच्या पाऊलखुणासातवाहन आणि काकटक या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात आजच्या यवतमाळच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे निरगुडा असे होते
त्यांच्या पाऊलखुणा ही अस्तित्वात असल्याचा दावा अभ्यासात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे.
याच गावाच्या नावावरून वणीतून वाहणाऱ्या नदीला निर्गुडा हे नाव पडले
पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन या गावाचे नाव वणी पडले अशी माहिती प्राध्यापक चोपणे यांनी दिली
2025 मध्ये वणीचा इतिहास लिहिण्यासाठी चोपणे यांनी तालुक्याचे अभ्यासकार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे गाव वणी शहराजवळ दक्षिणेला होते त्याचे काही पुरावे हाती लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री राठोडयवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळपास 70 कोटी रुपयांची कामे सिमेंट रस्ते सुरू आहे
या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
महसूल येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ शहरात सुरू असलेली विकास कामे रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधाचा आढावा घेतला
त्यावेळी ते बैठकीत बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी विकास मिना, सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता यादी उपस्थित होते.
तुळजापुरात पावसाने पाझर तलाव फुटला, शेतकऱ्याची शेती आणि उभे पीक गेले वाहून, विहीर बुजलीधाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारातील तब्बल पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पाझर तलाव पावसाने ओव्हर फ्लो होऊन फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन व पिकं वाहून गेल्याने मोठं नुकसान झालय. तलावाचा भरावाचा मलबा शेतात गेल्याने उसाच्या उभ्या पिकात पाच ते सहा फुटांचा थर साचला आहे.त्याखाली पिक गाडलं गेलं असून शेतकऱ्यांची विहीर बुजली आहे,पाईपलाईन वाहून गेली.पेरणी तोंडावर असताना शेतातील माती वाहून गेल्याने सगळीकडे दगडगोटे पाहायला मिळत आहेत.
Ratnagiri: एकही रुपाया न भरता आता रत्नागिरीत उपचार होणारएकही रुपया न भरता पुर्णत: मोफत उपचार सुविधा असलेले रुग्णालय रत्नागिरीत आजपासून सुरु होतय.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालय सुरू होतय.
गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी याउद्देशाने आम्ही मोफत रूग्णालय सुरू करण्यात आलय.
या मोफत रूग्णालयात शस्त्रक्रिया, ह्रदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा, बालरोग विभाग, युरॉलॉजी विभाग, नेत्ररोग सुरू करण्यात येणार आहेत.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने महाराष्ट्रात सुरू केलेले तिसरे मोफत रूग्णालय आहे.
Maharashtra Politics: आगामी निवडणुका संदर्भात खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवादस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात धुळ्यात ठाकरे सेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या या संदर्भातील विचार जाणून घेतले आहेत,
उत्तर महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठीच मी आलो असल्याचे खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले आहे, यावेळी खासदार संजय राऊत यांनी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे कानमंत्र देखील दिले आहेत, यावेळी या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित असल्याचे बघावस मिळाले आहे.
Deccan Queen Express: डेक्कन क्वीन ला आज 96 वर्ष पूर्णदख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन या ट्रेनला सुरू होऊन आज ९६ वर्ष पूर्ण होतायत.
पुणे, मुंबई या २ मेट्रो शहराला जोडणारी भावनिक दुवा असलेली ही ट्रेन अनेक पिढ्यांच्या आठवणींची साक्षीदार आहे.
रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित व लोकप्रिय ट्रेन पैकी एक असलेल्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सेलिब्रेशन जोरदार केले गेले.
पुणे रेल्वे स्टेशन वर आज केक कापून उत्साहात डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या निमित्ताने गाडीच्या इंजिनला हार व फुलांनी सजविण्यात आले होते.
१ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे