महाराष्ट्र गुजरातमधून राज्यात येणाऱ्या बनावट बियाणांवर कृषी विभागाची कारवाई करण्यास सुरवात केली आहे. बनावट बियाणांबाबत धुळे येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. 30 लाखांपर्यंत बनावट बियाणे व मुद्देमाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. गुजरातकडून महाराष्ट्रामध्ये ही बनावट बियाणे आणण्यात येत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.