पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात चिवट बॉलिंग करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 200 धावा करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. आरसीबीला पंजाबच्या गोलंदाजांसमोर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्सच करता आल्या. त्यामुळे आता पंजाबसमोर आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी 191 धावांचं आव्हान आहे. आता पंजाब हे आव्हान पूर्ण करत 18 वर्षांची प्रतिक्षा संपवणार की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु इतिहास घडवणार? हे आता पुढील 20 ओव्हरनंतर स्पष्ट होणार आहे.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही अर्धशतक झळकावता आलं नाही. त्यामुळे पंजाब 200 पर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. आरसीबीने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 55 रन्स जोडल्या. त्यानंतर बंगळुरुने 7 ते 17 ओव्हरदरम्यान 4 विकेट्स गमावून 113 रन्स जोडल्या. तर अखेरच्या 2 षटकांमध्ये पंजाबने 22 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. त्यापैकी 3 विकेट्स या अर्शदीप सिंग याने 20 व्या ओव्हरध्ये घेतल्या. त्यामुळे आरसीबीला 190 रन्सवर रोखण्यात यश मिळवलं.