Pankaja Munde was emotional while speaking at a program at Gopinath Fort on the 11th death anniversary of Gopinath Munde
Marathi June 04, 2025 05:25 AM


आज (3 मे) गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा नेत्या पंकजा आपल्या कुटुंबासह गोपीनाथ गडावर उपस्थित होत्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज (3 मे) गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा नेत्या पंकजा आपल्या कुटुंबासह गोपीनाथ गडावर उपस्थित होत्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Pankaja Munde was emotional while speaking at a program at Gopinath Fort on the 11th death anniversary of Gopinath Munde)

पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ गडावरील आयोजित कार्यक्रमातून गोपीनाथ मुंडे यांना जिवंत ठेवण्याचा आणि त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. अपघाताने माणसे दुरावतात आणि एकत्रही येतात. त्यामुळे मी वाईट काळाला शिकण्याची संधी म्हणून पाहते. आपल्याला जी भूमिका दिली ती मी पुढे नेत आहे. कारण भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आज जर गोपीनाथ मुंडे असते तर ते देशातील फार मोठ्या पदावर नक्कीच असते. त्यांच्या सहकार्यांसोबत ते आपल्याला रोज दिसले असते. तुम्ही त्यांना कुठे शोधता हे माहिती नाही, पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते, असे म्हणत पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – MVA : मविआच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्या या मागण्या, रोहिणी खडसेंनी दिली माहिती

पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांना जाऊन आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. गावागावात आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी होते, हे आमचे आणि आमच्या परिवाराचे भाग्य आहे. मी आज जिजांचा म्हणजेच दिवंगत आमदार आर. टी देशमुख यांचा फोटो गोपीनाथ गडावर लावला असून सुतक देखील पाळले आहे. मला ब्राह्मणांने सांगितले की, जिजासाठी ताई तुम्ही एखादा पदार्थ सोडा. ब्राह्मणाचं ऐकून मी पदार्थ सोडला आहे, तसेच मी लेक म्हणून इथे तीन दिवस थांबून आहे. हे ऋणानुबंध आहेत, इथे ना जात आहे ना धर्म… कारण कठीण यातनेतूनच मोठं होता येतं. रावणाला आणि कोरवांना कुठे वनवास झाला. नेहमी चांगल्याच माणसांना त्रास होत असतो. त्यामुळे तुम्ही जर आमच्यासोबत असाल तर आम्ही यातना भोगायलाही तयार आहोत.

हेही वाचा – Thackeray Group : निवदेन की अजून काही, मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे बडगुजर ठाकरे गटाला करणार जय महाराष्ट्र?



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.