९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला होता.
सरपंच संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीला मागीतलेली खंडणी आणि पवनचक्कीवरील दलित वॉचमनला मारहाण ही सगळी प्रकरणं एकमेकांवर आधारलेली आहेत.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेली होती.
शासनाने ता.२६ फेब्रुवारीला निकम यांची विशेष सरकारी वकिल तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सहाय्यक सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली.
शासनाने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना शुल्क निश्चित केले आहे.
या खटल्यातील प्रत्येक सुनावणीसाठी निकम यांना दीड लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तसेच विचारविनिमय शुल्क म्हणून त्यांना प्रति तास ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने याने कोर्टात अर्ज दाखल केला असून मकोका खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होणार आहेत. त्यानंतर कोर्ट योग्य तो निर्णय घेणार आहे.