PBKS vs RCB: विराट कोहलीचं रडणं सर्वांना दिसलं, पण विजयासाठी लढणाऱ्या 'त्या' खेळाडूच्या भावना कुणी समजूनच घेतल्या नाही, पाहा व्हिडिओ
esakal June 04, 2025 08:45 AM

मंगळवार, ३ जून रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून त्यांची पहिला आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पंजाबला जिंकण्यासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे फार कठीण नव्हते परंतु पंजाबचा संघ लक्ष्यापासून ७ धावांनी कमी पडला. शशांक सिंगने शेवटपर्यंत संघर्ष केला पण तो जिंकू शकला नाही.

पंजाब किंग्जची सलामी जोडी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने सुरुवात संथ केली. जरी असे वाटत होते की कर्णधार श्रेयस अय्यरसह मधल्या फळीतील फलंदाज ते कव्हर करतील. परंतु तसे झाले नाही. शशांक सिंगने ३० चेंडूत नाबाद ६१ धावा केल्या परंतु इतर कोणताही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही आणि संघ अंतिम सामन्यात ६ धावांनी पराभूत झाला.

यानंतर विराट कोहलीला भर मैदानात रडू कोसळले. तसेच आरसीबीचे अन्य खेळाडू आणि चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले आहेत. मात्र यात एक पंजाबचा खेळाडूही रडताना दिसला. मात्र त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. तो त्याच्या विजयासाठी लढत होता. पण शेवटी अपयशी ठरला. पव्हेलियनमध्ये जाताना त्याला रडू कोसळले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा खेळाडू होता शशांक सिंग...

सामन्यात प्रभसिमरन सिंगने प्रियांश आर्यसोबत ४३ धावांची आणि नंतर जोश इंग्लिससोबत २९ धावांची भागीदारी केली, पण त्याने खूप हळू केली. त्याने २६ धावा केल्या आणि यासाठी २२ चेंडू खेळले. तर त्याने २ षटकार मारले. म्हणजेच, जर आपण ते २ फटके काढून टाकले तर त्याने २० चेंडूत १४ धावा केल्या. पंजाब सामना हरण्यासाठी काही खेळाडूच कारणीभूत आहेत. त्यच्या खराब कामगिरीमुळे पंजाबने सामना गमावला आहे.

श्रेयस अय्यरची बॅट संपूर्ण हंगामात पूर्ण जोमात होती. तो टॉप ५ धावा करणाऱ्यांमध्ये आणि पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये आहे. पण अंतिम सामन्यातील पराभवासाठी तो दोषीही आहे. प्रभसिमरन बाद झाला तेव्हा पंजाबचा स्कोअर ८.३ षटकांत ७२ धावा होता. पंजाब चांगल्या स्थितीत होता पण तो फक्त १ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे संघावर दबाव वाढला.

तर मधल्या फळीत वधेराने बरेच चेंडू वाया घालवले. ज्यामुळे पंजाब संघ मागे पडत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या अंतिम सामन्यात वधेराने १८ चेंडूत १५ धावा केल्या. शेवटी स्टोइनिसकडून चांगली खेळी आवश्यक होती. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला पण पुढच्या चेंडूवर बेजबाबदार शॉट खेळून तो झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारचा स्लो बॉल तो वाचू शकला नाही आणि फक्त बॅटला लागला आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जकडून काइल जेमिसन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३ बळी घेतले पण १२ च्या इकॉनॉमीने धावाही दिल्या. त्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४८ धावा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.