Samruddhi Mahamarg last phase Inauguration by CM Devendra Fadnavis, Deputy CM Devendra Fadnavis and Deputy CM Ajit Pawar
Marathi June 06, 2025 05:25 AM


हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता. 5 जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील इगतपुरी बोगद्याच्या उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य स्वीकारले.

इगतपुरी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता. 5 जून) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील इगतपुरी बोगद्याच्या उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारथ्य स्वीकारले. कारण आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्यावेळी समृद्धीचे लोकार्पण झाले, तेव्हा शिंदेंच्या गाडीचे सारथ्य त्यावेळी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले होते. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. एकूण 701 कि.मी पैकी 625 कि.मी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या उर्वरित म्हणजेच 76 कि.मी. लांबीच्या (इगतपुरी ते आमणे) मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा… Ajit Pawar Vs BJP : ठाकरे म्हणतात, अमित शहांनी भाजपा आमदारांना दिला हा आदर्श कानमंत्र

देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी ची लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोग‌द्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील इगतपपुरी येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरू झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासांत गाठता येणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.

बोगद्याची वैशिष्ट्ये काय?

  • इगतपपुरी येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे.
  • या बोग‌द्याची उंची 9.12 मीटर आहे.
  • अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोग‌द्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोग‌द्यामध्ये बसविण्यात आलेली आहे.
  • या बोग‌द्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतुक अधिक जलद होणार आहे.
  • या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे.
  • या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे.
  • या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खांबांची उंची 84 मीटरपर्यंत आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.