रजत पाटीदार आता आरसीबीसाठी आयपीएल जेतेपद जिंकणारा आरसीबीचा पहिला कर्णधार बनला आहे. आरसीबीला पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी १८ वर्षे वाट पाहावी लागली. विशेष म्हणजे रजत पाटीदार पहिल्यांदाच आरसीबीचा कर्णधार बनला. पहिल्याच प्रयत्नात जेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. असे म्हणता येईल की, विराट कोहली त्याच्या कर्णधारपदात जे काम करू शकला नाही ते रजतने करून दाखवले आहे. या विजयासह रजत पाटीदारने रोहित शर्माचीही बरोबरी केली आहे.
आतापर्यंत रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वात कमी सामने खेळून विजेतेपद जिंकणारा कर्णधार होता. रोहित शर्माने २०१३ मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्या वर्षी जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा रिकी पॉन्टिंग संघाचा कर्णधार होता. परंतु आयपीएलच्या मध्यात रिकी पॉन्टिंगने कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहित शर्माला नवीन कर्णधार बनवण्यात आले. विशेष म्हणजे त्याच वर्षी त्याने आयपीएलचे विजेतेपदही जिंकले. तोपर्यंत रोहित शर्मा फक्त १३ सामने खेळला होता.
आता रजत पाटीदारनेही १३ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवून ट्रॉफी जिंकली आहे. आरसीबीने १६ सामने खेळले. पण त्यादरम्यान जितेश शर्माला तीन सामन्यांसाठी कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने फक्त १३ सामने खेळले आणि विजेतेपद जिंकले. म्हणजेच रजत पाटीदार आणि रोहित शर्मा आता बरोबरीत आहेत. यानंतर हार्दिक पंड्या येतो. त्याने २०२२ मध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आणि त्याच वर्षी विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले.
२००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळवण्यात आले तेव्हा राजस्थान रॉयल्सने विजेतेपद जिंकले. शेन वॉर्नने १५ संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपदही जिंकले. त्यानंतर २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने आयपीएल जिंकले आणि त्या संघाचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट होता. पण तोपर्यंत तो २४ सामने खेळला होता. आता रजत पाटीदारने असा विक्रम केला आहे जो कोणत्याही कर्णधारासाठी तोडणे सोपे जाणार नाही.
यानंतर रजत पाटीदारने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, माझ्यासाठी, विराट कोहलीसाठी आणि सर्व चाहत्यांसाठी हे खरोखरच खास आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे पाठिंबा दिला आहे. ते सर्वजण त्याचे पात्र आहेत. क्वालिफायरनंतर, आम्हाला वाटले की आपण त्यातून पुढे जाऊ शकतो. मला वाटते की या ट्रॅकवर १९० धावा हा चांगला स्कोअर होता कारण तो थोडा संथ होता.
गोलंदाजांनी त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणल्या हे पाहणे जबरदस्त होते. कृणाल हा विकेट घेणारा गोलंदाज आहे, जेव्हा जेव्हा आम्हाला विकेटची आवश्यकता असते तेव्हा मी त्याला शोधतो. सुयश आणि वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामात चांगले होते. शेफर्डने आज रात्री महत्त्वाची विकेट दिली. ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे आणि कर्णधार कोहलीसाठी माझ्यासाठी एक उत्तम धडा आहे, तो इतर कोणापेक्षाही याला अधिक पात्र आहे. मी सर्व चाहत्यांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो - ई साला कप नामदू , असं तो म्हणाला.