Indian Cricket Team : टीम इंडिया मुंबई विमानतळावरुन इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना
आयएनडी वि इंजिन टेस्ट मालिका: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर 25 वर्षीय शुभमन गिलकडे टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणारी पाच कसोटी सामन्यांची मालिका ही गिलची कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका आहे. त्यामुळे इंग्लंडला जाण्याआधी कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी (5 जून) मुंबईत पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की, संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) काही कसोटी सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. संघ व्यवस्थापनाने अद्याप त्याला कोणत्या सामन्यांमध्ये विश्रांती द्यायची याचा निर्णय घेतलेला नाही. गंभीर म्हणाला, “आम्ही अद्याप त्याला कोणत्या तीन सामन्यांमध्ये खेळवायचे हे ठरवलेले नाही.”