दरवर्षी 7 जून हा दिवस वर्ल्ड फूड सेफ्टी डे अर्थात जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकांमध्ये अन्नाच्या सुरक्षिततेविषयी जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. खाण्यापिण्यामुळे होणाऱ्या कोणत्याही समस्येला कमी करण्यासाठी, त्याने निर्माण झालेला धोका कमी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा हेतू म्हणजे प्रत्येकाला स्वच्छ, सुरक्षित ,पौष्टिक आणि योग्य प्रमाणात अन्न मिळावे. जगभरात पसरलेली भूक, उपासमार आणि गरीबी पाहता या दिवसाचे महत्त्व अधिक आहे.
युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्यासह मिळून 18 डिसेंबरला ठराव पास केली. आणि 7 जून 2019 या दिवशी पहिल्यांदाच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे आरोग्य, भूक, शेतीशी संबंधित असलेली धोरणे अंमलात आणणे यासोबतच अन्नसुरक्षिततेच्या गरजांकडे लक्ष पुरवणे हा आहे.
सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार आहे. अस्वच्छ आणि असुरक्षित अन्न खाल्ल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो. असुरक्षित अन्नामुळे धोकादायक बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट आणि केमिकल्स असतात. जे जवळपास 200 आजारांना आमंत्रण देतात. ज्यामध्ये डायरिया पासून ते कॅन्सर पर्यंत सर्व आजार अंतर्भूत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार जवळपास 60 लाख लोक प्रदूषित अन्न खाल्ल्याने आजारी पडतात. तर अस्वच्छ आणि प्रदूषित अन्न खाल्ल्याने 4 लाख 20 हजार जणांचा मृत्यूही झाला आहे.
अन्नामुळे होणारे आजार बहुतेक जणांवर परिणाम करत असतात. ज्यात लहान मुलांपासून ते गरोदर महिला, वयोवद्ध आणि अशक्त शरीरयष्टी असलेल्या सर्वांचा समावेश आहे.
जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा उद्देश नागरिकांमध्ये जागरूकता पसरवणे हा आहे. ज्यामुळे सर्वजण ते काय खात आहेत, त्यांच्या दृष्टीने ते खात असलेले अन्न सुरक्षित आहे की नाही याबाबत विचार करू लागतील.
याच बरोबरीने, हा दिवस साजरा करण्याचा उद्देश सरकार, बिझनेस आणि ग्राहकांनी अन्न असुरक्षिततेविरूद्ध आवाज उठवावा हाही आहे.
हेही वाचा : Weight Loss : डिलिव्हरीनंतर वेट लॉससाठी टिप्स
संपादित – तनवी गुडे