Manish Gupta: प्रसिद्ध दिग्दर्शक मनीष गुप्ता यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. दिग्दर्शकाने त्यांच्या चालकावर चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर, चित्रपट निर्मात्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथालेखक मनीष गुप्तावर त्यांच्या ड्रायव्हरवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी ५ जून २०२५ रोजी रात्री घडला. ड्रायव्हर राजिबुल इस्लाम लष्कर ३८ वर्षांचा असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील तीन वर्षे मनीष गुप्ता यांच्यासोबत त्याने काम केले आहे. त्याला वेळेवर पगार मिळत नव्हता. एप्रिल महिन्याचा २३,००० पगार थकित असल्यामुळे त्यांनी ३० मे रोजी नोकरीवरून काढून टाकण्यात आले .
राजिबुल इस्लाम लष्करने ३ जून रोजी मनीष गुप्ता यांच्याशी संपर्क साधून थकित पगाराची मागणी केली असता, गुप्ता यांनी पुन्हा कामावर रुजू झाल्यासच पगार देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राजिबुल इस्लाम लष्कर ४ जून रोजी पुन्हा कामावर रुजू झाला, परंतु त्याला पगार मिळाला नाही. ५ जून रोजी रात्री ८:३० वाजता, पगाराची मागणी करताना दोघांमध्ये वाद झाला. गुप्ता यांनी रागाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू घेऊन राजिबुल इस्लाम लष्करच्या उजव्या हाताला वार केला .
जखमी अवस्थेत राजिबुल इस्लाम लष्करने तात्काळ बाहेर जाऊन सुरक्षा रक्षक आणि इतरांना माहिती दिली आणि रिक्षाद्वारे विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात उपचारासाठी गेला. उपचारानंतर त्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११८(२), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस तपास सुरू असून, आरोपी अद्याप अटकपूर्व आहे .
हे 'द स्टोनमॅन मर्डर्स', '४२० IPC', 'सेक्शन ३७५' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक असून, त्यांनी यांच्या 'सरकार' आणि 'D' या चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. गुप्ता यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले असून, ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे .