बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या 11 चाहत्यांचा दुर्देवी अंत झाला. कर्नाटक सरकारने या 11 मृतांच्या कुटुंबियांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे.राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आणखी 15 लाख देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एएनआयने दिलेल्या वृ्त्तानुसार, मृतांच्या कुटुंबियांना आता प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.
कर्नाटक सरकराने चेंगराचेंगरीनंतर 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही पेटारा उघाडला. आरसीबी फ्रँचायजीकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आणि आरसीबी या दोघांची मदत मिळून एकूण प्रत्येकी 35 लाख रुपये मिळणार आहेत.