मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकत्र यावं ही महाराष्ट्रातील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा जोर धरते, पण एक होताना दिसत नाही. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन नेत्यांनी एकत्र यावे, अशी भावनिक साद घातली जात आहे. तर, दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये देखील अनुकूल दिसून येत आहेत. त्यातच, आता शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील नेते आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत काम केलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan kirtikar) यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची इच्छा होती, असे कीर्तीकर यांनी म्हटलं. तसेच, सध्याची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भाजप प्रणित बनल्याचंही त्यांनी म्हटलं.
शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना-मनसे यांच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी. कारण, सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप प्रणित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारी शिवसेना आता हवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची वाटत होती. मात्र, तसं होताना दिसत नाही, असे म्हणत गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालणाऱ्या शिवसेना पक्षावर घणाघाती टीका करत शिंदेंना घरचा अहेर दिलाय. बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं. राज ठाकरे हे शिवसेनेतून निघून गेल्यानंतर मोठे शिवसेनेचे नुकसान झालं. शिंदे यांची शिवसेना ही भाजप प्रणित यासाठी कारण ते सध्या एनडीए मध्ये आहेत.
1. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे.
2. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी.
3. सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप प्रणित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे.
4. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची वाटत होती. मात्र, तसं होताना दिसत नाही.
5. बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं. राज ठाकरे हे शिवसेनेतून निघून गेल्यानंतर मोठे शिवसेनेचे नुकसान झालं.
आणखी वाचा