आयपीएल २०२५ चा अंतिम सामना मंगळवारी, ३ जून रोजी अहमदाबादमध्ये खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पंजाब किंग्सला रोमांचक सामन्यात पराभूत करून विजेतेपद पटकावले.
विजयानंतर दुसऱ्याच दिवशी, ४ जून रोजी बंगळूरुमध्ये विजयाचा जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे, आरसीबीचा १८ हंगामांतील हा पहिला आयपीएल विजय होता, मात्र त्याला गालबोट लागले ते चेंगराचेंगरीचे
आनंदमय प्रसंग दुःखद घटनेत बदलला. विजयोत्सवाच्या वेळी मोठ्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.
चेंगराचेंगरीच्या संदर्भात आरसीबी, इव्हेंट मॅनेजर डीएनए एन्टरटेनमेंट ,कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध निष्काळजीपणाचा आरोप करत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.
BCCI कडून सेलिब्रेशन करण्यासाठी लवकरच प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता आहे.
"बीसीसीआयला काहीतरी करावे लागेल" अशा घटनांकडे BCCI दुर्लक्ष करणार नाही. भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याच्यासाठी नवीन उपाययोजना तयार करू
भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रस्त्यांवरचे रोडशो बंद करण्याची मागणी केली. "लोकांचे प्राण महत्त्वाचे, सेलिब्रेशन नियंत्रित जागेतच व्हावे,"
सध्या BCCI कडून बंदीचा थेट निर्णय आलेला नाही, पण RCB वर कारवाई किंवा दंड आकारण्याची शक्यता आहे.
१०० वर्षांपूर्वी कसं होतं बडोद्याचं गायकवाड राजघराणं? फोटो बघून अभिमान वाटेल