ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरेाधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. सडलेला मेंदू, बुरसाटलेली विचारसरणी आणि दिवसा चालतानाही तोल जाणारे लक्ष्मण हाके यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
Sharad Pawar : राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते; पण मतं मिळत नाहीत : शरद पवारमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अनौपचारिक चर्चेवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, आतापर्यंतच अनुभव असा आहे की, राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते; पण मतं मिळत नाहीत. पण, उद्धव ठाकरेंना गर्दीचे मतात रुपांतर करण्यात यश येतं. महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी एकत्र लढलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.
Ramdas Kadam : भविष्यात उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही : रामदास कदमउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे यांची भूमिका अवघ्या महाराष्ट्राला कळलेली आहे. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असते. विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आलेला आहे. आम्हाला बाहेर का जावं लागलं हेही सर्वांना कळलं आहे. भविष्यात उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही, तसेच आता उद्धव ठाकरेंनी मदतीसाठी हात पुढे केलेला आहे. पण राज ठाकरे उद्वव ठाकरेंना टाळी देतील, असं वाटत नाही, असे वक्तव्य माजी मंत्री रामदास कदत यांनी केले.
Nashik : कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकमधील पुरोहितांमध्ये वादाचा भडकानाशिकमधील पुरोहितांमध्ये कुंभमेळ्याच्या तोंडावर वादाचा भडका उडाला आहे. गेली ३८ वर्षे पुरोहित महासंघाचे अध्यक्ष असलेल्या सतीश शुक्ल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला आहे. मनमानी कारभार करत असल्यामुळे सतीश शुक्ल यांना पदावरून हटविण्यात आला आहे, असा दावा नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी केला आहे. नवीन अध्यक्षांची निवड ही बेकायदा असल्याचे सांगून शुक्ल यांनी बदनामी केल्याचा आरोप करत चंद्रशेखर पंचाक्षरी यांना नोटीस पाठविली आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे यांनी 2009 मधील वाढलेली आकडेवारीच मांडली
राहुल गांधी यांचा भाजपवर निवडणुकीचा चोरीचा आरोपाला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी बावनकुळे यांनी २००९ मधील आकडेवारी मांडली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर २००९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही ३० लाख मतदार वाढल्याचा दाखला दिला आहे.