Shambhuraj Desai On Sanjay Raut :संजय राऊत बोललेलं कधीच खरं होत नाही, शंभूराज देसाईंची टीका
एकनाथ शिंदे यांनी आपल्यालाही पक्ष सोडण्याची विनंती केली होती असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होतं, यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांनी बोललेलं कधीही खरं नसतं…दोन अडीच वर्षे आधीची संजय राऊत यांची वक्तव्य तुम्ही काढली त्यातील किती वक्तव्य खरी झाली ते दाखवा त्यामुळे संजय राऊत बोललेलं कधीही खरं होत नाही असं देसाई म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक लेख लिहीत सरकारवर टीका केली होती… महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत निवडणूक आयुक्त लपवाछपवी करत असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या लेखात म्हंटलं होतं…एकूणच महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच विरोधी पक्षनेते राहुल गांधीं यांनी आरोप केला आहे… यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय… जिथे काँग्रेसची बोटावर मोजण्याइतकी सरकार आली तिथे फिक्सिंग झाली नाही का..? स्वतःला लोकांनी नाकारलं की फिक्सिंग म्हणायचं आणि जिथे निवडणूक जिंकली तिथर फिक्सिंग झाली नाही म्हणायच…त्यामुळे राहुल गांधी यांनी जनमताचा आदर केला पाहिजे असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास शिवसेना शिंदे गटाला आव्हान वाटतं का ? असा प्रश्न मंत्री शंभूराजे यांना विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो आणि 61 जागा जिंकून आणल्या…याउलट शिवसेना ठाकरे गटाने 100 जागा लढून 13-14 जागा जिंकले त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कुणाचा हे लोकांनीच दाखवून दिलंय त्यामुळे आम्हाला कुणाचंही आव्हान वाटत नाही असं देसाई म्हणाले. मनसे आणि युबीटी एकत्र येण्याबाबत त्या दोन्ही पक्षांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचा मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटल आहे… जोपर्यंत पक्षाचे नेते अधिकृतपणे बोलत नाहीत तोपर्यंत त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाहीत अस देखील देसाई यांनी स्पष्ट केलं तर आगामी काही महिन्यातच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत एकत्रितपणे लढवाव्यात अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली, यावर बोलताना देसाई यांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक होते… त्यामुळे आगामी काळातील निवडणुका ही एकत्रितपणे लढवाव्या असं पवारांना वाटत असेल असे म्हटले आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना शिंदे गट महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार असं मंत्री शंभूराज देसाई यांना विचारले असता आमच्या राज्य समन्वय समितीची बैठक पार पडली, तेव्हा आमची प्राथमिक चर्चा झाल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे… स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीकडून लढायची आहे… यासंदर्भात चर्चा झाली असून अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असं शंभूराजे यांनी म्हटले आहे.