Maharashtra News Live Updates : मुंब्रा दुर्घटनेविरोधात मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा
Saam TV June 10, 2025 04:45 PM
मुंब्रा दुर्घटनेविरोधात मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा

मुंब्रा दुर्घटनेविरोधात मनसेनं ठाण्यात धडक मोर्चा काढला आहे. रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारत त्यांनी ठाण्यातील गावदेवी मैदातून मोर्चाला सुरूवात केली. या मोर्चाचं नेतृत्व अविनाश जाधव करीत असून, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन.

बालेवाडी स्टेडियममध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यायला सुरुवात.

थोड्याच वेळात बालेवाडीमध्ये होणार ध्वजारोहण.

राष्ट्रवाद चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते १० वाजून १० मिनिटांनी होणार ध्वजारोहण.

Nanded: नांदेड जिल्ह्यात वादळी वारा आणि पावसाचे थैमान

अर्धापूर,मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान.

वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीन उध्वस्त.

हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल.

अँकर:- नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने थैमान घातला आहे. नांदेडच्या अर्धापूर,मुदखेड तालुक्यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने केळी बागा आडव्या झाल्या आहेत. या सोबतच अनेक घरांवरची पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली आहेत. केळी सोबतच फळबागांचा देखील या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीया वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण होणार आहे.

तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ध्वजारोहण समारंभास उपस्थितीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे...

हिंगोलीत कळमनुरी शहरात वादळी वाऱ्याने झाड कोसळले

हिंगोलीत रात्री चक्रीवादळाने थैमान घातले आहे कळमनुरी शहरात मुख्य रस्त्यावर या चक्रीवादळाने रस्त्यावर एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे मुख्य मार्गावर हे झाड आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाली होती दरम्यान प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने हे झाड बाजूला करत पुन्हा एकदा ही वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती तर अनेक भागात वादळी वाऱ्याने शेतीचे देखील नुकसान झाले आहे

सातारा जिल्ह्यात 35 हजार शिधापत्रिका रद्द

शिधापत्रिका (रेशन कार्ड ) ई केवायसी करण्याची सूचना शासनाने पुरवठा विभागाला केली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ८२ टक्के इ केवायसी पूर्ण झाली असून अद्याप 3 लाख 20 हजार 634 शिधापत्रिका धारकांची ही प्रक्रिया प्रलंबित आहे. 35 हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आले असून कराड तालुक्याने दोन लाख 92 हजार 925 शिधापत्रिकांची ई-केवायसी करत आघाडी केल्याची स्थिती आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुदानित धान्य आणि इतर अन्नपदार्थ मिळवण्यासाठी शिधापत्रिका केवायसी करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये आधारकार्ड, रेशन कार्डशी जोडणे आणि तपशीलांची पडताळणी करणे हे यामध्ये समाविष्ट केले आहे. फक्त पात्र लाभार्थींकडेच शिधापत्रिका आहेत याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने शिधापत्रिका ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी आज होणार पंढरपूरकडे रवाना, विठ्ठलाच्या दर्शनाला लागणार 26 दिवस

आषाढी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांना पालखी या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघत असतात त्यानुसार आज पासून त्रंबकेश्वराच्या निवृत्तीनाथ महाराज पालखीचे ही प्रस्थान होत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मुंडे ज्ञानेश्वरांचे गुरु बंधू.. तसंच वारकरी संप्रदायाचे संस्थापक त्यामुळे या त्यांच्या समाधी पालखीच्या वारीला आषाढी वारीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ही पालखी निघणार असून 26 दिवसाच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचेल जवळपास 28 दिंड्या यामध्ये सहभागी होणार आहेत

नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकाच दिवशी सर्वाधिक १३३४ प्रवाशांच्या विमान प्रवास

- 7 जूनला 5 फ्लाईट्समधून सर्वाधिक 1334 प्रवाशांनी केला एकाच दिवशी प्रवास

- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 40 टक्क्यांनी प्रवाशांची संख्या वाढली

- गेले काही दिवसांपासून विमान प्रवासाला नाशिककर देत आहेत पसंती

- अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, बंगळुरु दिल्ली, उदयपूर, इंदूर या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा

- तसेच जवळपास देशातील 34 वेगवेगळ्या शहरांसाठी नाशिकमधून कनेक्टिंग विमान सेवा देखील सुरू असल्याने नाशिककरांचा विमान प्रवासाला पसंती

धाराशिव येथील शिवसेना शिंदे गटात अंतर्गत धुसफूस

धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजप मधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर आता शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे. जिल्हाप्रमुख बदलावा अशी मागणी जोर धरतीय.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा बदल गरज असल्याचे मत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी व्यक्त केल.जिल्हाप्रमुख बदलला नाही तर पदाधिकारी सामूहिक राजीनामाच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तुळजापूर येथील शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, सुशील हगवणे कोथरूड पोलिसांच्या ताब्यात

सुशील हगवणे कोथरूड पोलिसांच्या ताब्यात,बनावट कागदपत्रांवर मिळवला शस्त्र परवाना

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दीर सुशील हगवणे याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वास्तव्यास आहेत.

सुशील, शशांक हगवणे आणि त्यांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडे अर्ज केला होता.परंतु चौकशीत त्यांनी वास्तव्याचा खोटा पुरावा देत बनावट भाडेकरार सादर केल्याचे उघडकीस आले.

त्यांनी कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यांत सदनिकेचा बनावट पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवला होता. याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

कोरोना रुग्णांमधील स्ट्रेन सौम्य एनआयव्हीची महापालिकेला माहिती

सध्याचा कोरोना चा जो बदल झालेला विषाणू (स्ट्रेन) आहे तो खूपच सौम्य आहे अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी महापालिकेला दिली आहे.

त्यापासून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना काही लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, ‘एनआयव्ही’ व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) चे प्रतिनिधी, कोरोना कृतिदल सदस्य उपस्थित होते. यावेळी, ‘एनआयव्ही’ च्या प्रतिनिधींनी सध्याचा विषाणू सौम्य असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारणाद्वारे समोर आल्याचे सांगितले. यानुसार आयुक्तांनी वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या रुग्णांबाबत योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

पुणे आरटीओकडून पालखीत तील वारकऱ्यांच्या वाहनाच्या तपासणीची विशेष मोहीम सुरू

दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून आरटीओने ही विशेष व्यवस्था पालखीतील वाहनासाठी केली आहे.

वारकरी मोठ्या संख्येने पालखीत सहभागी होताना वाहन घेऊन येतात त्यांच्या वाहनाची सुरक्षितता आणि नियमाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओने ही मोहीम चालू केली आहे

या वाहनाची तपासणी दिवेघाटामध्ये 9 ते 19 जून पर्यंत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करता येणार आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्यावर ही जबाबदारी आहे

आळंदी रोड आरटीओ कार्यालयात 9 ते 19 जून पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी अमर देसाई यांच्यावर वाहने तपासण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

घुसखोरी थांबवण्यासाठी दर्शन बारीला जाळी गार्ड

विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार्या भाविकांना जलद आणि सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर आता दर्शन बारीला जाळी गार्ड बसविण्यात आले आहे. यामुळे वारीकाळात दर्शन बारीत होणार्या घुसखोरीला आळा बसणार आहे.

आषाढी यात्रेचा सोहळा तोंडावर आला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या दररोज एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे दर्शनाची रांग पत्रशेड पर्यंत गेली आहे. येणार्या भाविकांना जलद गतीने आणि सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने काही नव्याने उपाय योजना हाती घेतल्या आहेत.

दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी विणे गल्ली ते पत्राशेड दरम्यानच्या दर्शन बारीला जाळी गार्ड बसविण्यात आले आहेत. साधारण सहा ते सात फूट उंचीचे हे जाळी गार्ड बसवले आहेत. यामुळे दर्शन रांगेतील घुसखोरीला शंभर टक्के आळा बसेल असा दावा मंदिर समितीने केला आहे.

मान्सूनचा नियमित पाऊस नाही,हळद पिकाला स्प्रिंकलरने सिंचन

वाशिम जिल्ह्यात यंदा मानसूनपूर्व काही प्रमाणात पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद बेण्यांची लागवड पावसाळा सुरू होण्यापूर्वीच केली. मात्र अजूनही मुख्य मान्सूनचा नियमित पाऊस सुरु झालेला नाही. परिणामी हळद पिकाची वाढ थांबू नये म्हणून शेतकऱ्यांना आता स्प्रिंकलरने सिंचन करण्यास सुरुवात केलीये. हळद हे पीक सतत माफक पाण्याची मागणी करते. पाऊस वेळेवर न झाल्यास किंवा खंडित पावसामुळे हळद पिकाचे नुकसान होऊ शकते. हे ओळखून शेतकऱ्यांनी वेळीच सिंचनाची तयारी केली असून, स्प्रिंकलरचा वापर करून पिकांना पाणी दिले जात आहे.

लातूर शहराला पुन्हा वादळी वाऱ्याचा फटका

लातूर शहरात मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्याने रौद्ररूप धारण केल्याने,शहरात 10 ते 12 ठिकाणी झाडे पडली ... काही भागात दोन ते अडीच तास तर काही भागात रात्रभर अंधार पडला होता.. औसा रोड, जिल्हा क्रीडा संकुल, पाच नंबर चौक, श्रीनगर, देशपांडे नगर या भागात रात्रभर वीजगुल झाली होती...

वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पावसाने देखील हजेरी लावली होती... तर लातूर मनपाचे आपत्ती व्यवस्थापन देखील उलमडलेली झाडे आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होते..

जालन्यातील भोकरदनमध्ये झाडावर चढून तरुणाचे अनोखे आंदोलन

भोकरदन तालुक्यातील करंजगाव येथील तरुण आनंदा कानडे यांनी विविध मागण्यासाठी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पंचायत समिती भोकरदन जिल्हा परिषद कार्यालय जालना आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने अखेर या तरुणाने पंचायत समिती समोर एका झाडावर जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन गट विकास अधिकारी, भोकरदन विस्तार अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, सरपंच करंजगाव यांनी शंकर बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करंजगाव या नावाने जो निधी काढला त्याची चौकशी करण्याची मागणी या तरुणाने केली आहे. यासह विविध मागण्या तरुणाने केल्या आहेत. मात्र शासनाने त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या तरुणांने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला...

तुळजाभवानी मंदीर संस्थानला मिळणार 23 कोटी 52 लाखांचे अधिकचे उत्पन्न

तुळजाभवानी मंदीर संस्थानला विविध उत्पन्नाच्या बाबींच्या लिलावातून 23 कोटी 52 लाख मिळणार आहेत.विशेष म्हणजे यंदा लिलावात 52 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असुन 8 कोटी 26 लाख 11 हजार रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.मंदीरातील विविध उत्पन्नाच्या बाबींचा तीन वर्षासाठी लिलाव करण्यात आला.तुळजाभवानी मंदीरातील वाहीक वस्ञ,होम शाळा,गणेश मंदिर,चिंतामणी यमाई,नंदादीप तेल,शिधा साहित्य, आधारवाडी येथील मंदिर संस्थानचे दोन्ही वाहनतळ आदी विविध सात बाबींची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली मागील काही वर्षांपासून मंदिर संस्थान तीन वर्षासाठी लिलाव करत आहे.या लिलाव प्रक्रियेत मंदिर संस्थांना यापूर्वीच्या लिलावाच्या तुलनेत 8 कोटी 26 लाख 11 हजार रुपये अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थांच्या उत्पन्नात 23 कोटी 52 लाख 44 हजार रुपयांची भर पडली आहे.

अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान. घरांसह केळी बागेचे प्रचंड नुकसान

नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे.या वादळी वाऱ्याने केळीच्या बागा अडव्या झाल्या आहेत. त्या सोबतच फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबियांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नुकसान झालेल्या केळीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

नागपुरात तापमानाचा पारा 44.2 अंशावर पोहचला आहे

- नागपुरात तापमानाचा पारा 44.2 अंशावर पोहचला आहे रवविवारी 43 अंश तापमानाची नोंद असतांना पारा 1.2 अंशांनी वाढला...

- विदर्भात नागपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरलं, अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे उकाड्यात मोठया प्रमाणात वाढ, सतत वाढत असलेल्या उष्णतेने नागरिक हैराण

- बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भात घेऊन येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे...

- जिथे नागपुरात मे महिन्यात तापमान ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसानं तापमान सरासरी पेक्षा 4 ते 5 अंशाने घटले होते..

- पुढील तीन ते चार दिवस अश्याच पद्धतीने तुरळक पावसासह तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोहिणी हिची तीन दिवसांपासून चौकशी सुरू

छत्रपती संभाजी नगर मधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात चोरीला गेलेल्या ३२ किलो चांदीपैकी ३०.३४१ किलो चांदी गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. एन्काउंटर झालेला अमोल खोतकर याची बहीण रोहिणी हिची तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीत तिने सांगितलेल्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या फोक्सवॅगन कारच्या डिकीत चांदीचे दागिने सापडले. छत्रपती संभाजी नगर शहरातील पडेगाव येथे हिंदुस्थान गॅरेजसमोर काही कार उभ्या होत्या. त्यात अमोलची कारही मागील १० दिवसांपासून उभी असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता गाडीच्या डिकीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेले चांदीचे ताट, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा ३० किलोचा ऐवज सापडला.

पुण्यात आज पार पडणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून पुण्यात आज साजरा करण्यात येणार २६ वा वर्धापन दिन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सकाळी १० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात पार पडणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन

तर दुपारी तीन वाजता महाळुंगे बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून पुण्यात वर्धापन दिनाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाला स्वतः शरद पवार, जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि इतर नेते राहणार हजर

तर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि नेत्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्याला हजेरी

पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी

पोलीस अधिकाऱ्यांसह पालखी मार्गावर जात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवस असणार पुण्यात मुक्कामी

याच पालखी मुक्कामी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज

पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी देखील आयुक्तांकडून पाहणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

"तुम्ही तयारीला लागा पुढच्या बैठकीत अधिकचे काय ते ठरवू",.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या शहर पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काल बैठक घेतली यात महापालिका निवडणुकीचे प्राथमिक नियोजनाची चर्चा झाली.

दोन्ही ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा सुरू असताना तुम्ही तयारीला लागा पुढचे काय ते आपण नंतर ठरवू असं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले.

रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक

कामावरून घरी जात असतांना समोरील येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला अमोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकल चालक गंभीर जखमीझाल्याची घटना देव्हाडी उड्डाणपुलावर घडली. सदर जखमी मोटारसायकल चालक प्रशांत मधुकर सोनवणे (२८) रा. मुंडीकोटाता. तिरोडा, हा गंभीर जखमी झाला असून त्याला गावकऱ्यांच्या मदतीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रीच्या नावाने रायगडमध्ये शाळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या नावाने माणगाव मध्ये CBSC शाळा सुरू झाली आहे. या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकमेकांची उणीदुणी काढणारे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले

बाभुळगांवात बोगस बियाणे जप्त,12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळच्या बाभुळगांव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाणावर पोलीस व कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला 400 बियाणे पाकिटांसह चार चाकी वाहन जप्त करून आरोपींवार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले या कारवाईमुळे बोगस बियाणांचा पडदा पास झाला आहे.पोलिस आणि कृषी विभागाच्या पथकांनी बारा लाख 16 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

राजुर घाटात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्री संत मुक्ताबाईचे दर्शन ...

आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी निघालेली संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूराकडे मार्गस्थ होत आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजुरच्या घाटात श्री संत मुक्ताबाई च्या पालखीचे दर्शन घेतले व वारकऱ्यांना अभिवादन केले ...

जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाई ची पालखी ही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. पालखीचे हे ३१५ वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीतील वारकऱ्यांना अभिवादन करत श्री संत मुक्ताबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तर वारीचे नेतृत्व करत असलेले हरणे महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवसेना पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते

निवडणूक आयोगाने मागितली ईव्हीएम स्ट्रॉंगरूमची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनात धावपळ सुरू झाली आहे. आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने पुढील दोन आठवड्यात मार्गदर्शक सूचना काढल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने आता यवतमाळ जिल्हा प्रशासनाला ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमची माहिती मागितली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची संख्या व इतर माहिती आयोगाला पाठविण्यात आली होती त्यात दोन हजार 578 मतदान केंद्राचा समावेश होता.मात्र आयोगाने सदर माहिती तपावत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठविले विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची यादी तपासून माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

बुलढाणा : भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एकाच्या पायाला गंभीर इजा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळ असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 6 वर असलेल्या शेलोडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोर जाणाऱ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने जोरदार धडक दिल्याची घटना पहाटेच्या 4 वाजेच्या दरम्यान घडली आहे. इंदोर येथून हैदराबाद येथे हंस कंपनीची ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन जात होती. अशातच खामगाव अकोला नॅशनल हायवे क्रमांक 6 वर शेलोडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स ची धडक ही समोर असलेल्या ट्रकला लागली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये राधेश्याम रामलाल परमार वय 50 रा. बडनगर जिल्हा उज्जैन याचा जागेवरच मृत्यू झाला. तर राजा परमार, बुखार सिंग बच्छाव, दीपक चव्हाण सर्व राहणार बडनगर जिल्हा उज्जैन हे जखमी झाले आहेत. सोबतच ट्रॅव्हल्स मधील अन्य 30 प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हायवे पोलीस व खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तात्काळ पोलिसांनी ॲम्बुलन्स मध्ये जखमी असलेल्या प्रवाशांना तात्काळ उपचारा साठी खामगाव येथील सामान्य रुग्णाल्यात भरती केले आहे.

शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन

भारतीय किसान युनियनचे नेते व ज्यांच्या मार्गदर्शनात तब्बल 13 महिने दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्या आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राकेश टिकेत हे नुकतेच बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथे आले होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर पुष्प वाहत दर्शन घेतले. यावेळी राजेश तिकेत यांच्यासोबत प्रहार चे नेते जितू दुधाने व बंटी रामटेके व भारतीय किसान युनियनचे राज्यातील नेते उपस्थित होते. बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांवर सरसकट कर्जमाफी मिळावी व दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे या मागणी साठी अन्न त्याग आंदोलनला सुरुवात केली आहे.

पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहिम

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढली आहेत. अतिक्रमणा विरोधात नगरपालिकेने थेट जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली आहे.

अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढा असा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, नगरपालिका रोड, पश्चिम द्वार, महाद्वारासह प्रदक्षिणा मार्गावर कारवाई करण्यात आली.

वाशिम नगरपालिकेच्या कचरा गाड्यांची चाक थांबली

वाशिम नगरपालिका अंतर्गत येणारे कचरा गाडीचे कंत्राटी गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगारानी आपल्या मागण्यांना घेऊन मागील सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारल आहे, किमान वेतन,पीएफ व एस.आय.सी. लागु करणे,कामगारांच्या पगारात पीएफ मध्ये व एस.आय.सी मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणे,मागील एक महिन्याचा पगार त्वरीत करणे व पगार नियमित करणे आणि कामावरुन काढलेल्या सर्व ट्रॅक्टर कामगारांना व इतर कामगारांना विना अट रुजु करणे, कंत्राटदाराची दडपशाही व अत्याचार त्वरीत बंद करणे या मागण्यांना घेऊन कंत्राटी कामगारांनी वाशिमच्या नगरपालिकेसमोर कामबंद आंदोलन पुकारल आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम थांबले आहे. या आंदोलनात कचरा गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगार असे एकूण 70 कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.