मुंबई : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.
आठवडाभर राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच निघा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्यापपासून राज्यात पावसाच्या धारा कोसळणार असून १२ जून ते १५ जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवर पावसाळी गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात तीव्र हवामान आणि खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील रहिवाशांना हवामान विभागने सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुंबईत कसे असेल हवामान?मुंबई हवामान खात्याच्या ताज्या अपडेट्सनुसार, मुंबईत दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरात हलका पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाळी परिस्थिती हळूहळू वाढत असल्याने त्या ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असल्याची माहिती मिळत आहे.
मान्सूनचा अलर्टरेड अलर्ट - कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी (पूर येण्याची शक्यता)
ऑरेंज अलर्ट - रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव
यलो अलर्ट - उर्वरित मराठवाडा, खान्देश, विदर्भ
कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधारेचा इशारा?हवामान विभागाने आठवडाभर सांगली, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, सिंधुदुर्ग, सातारा, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ अशा १३ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर विदर्भातील ११ जिल्ह्यात माध्यम सरींच्या पावसाचा अंदाज दिला आहे.
मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होणारमान्सून उर्जीतवस्था येण्यासाठी सध्या कोणतीही बळकट प्रणाली सध्या पूरक ठरण्याची शक्यता जाणवत नाही. मात्र त्यानंतर म्हणजे गुरुवारपासून मान्सूनची सक्रियता व वाटचाली साठी वातावरण अनुकूल होण्याची शक्यता जाणवते. महाराष्ट्रात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे.