Maharashtra News Live Updates : आदिवासी संघटनाच्यावतीने आज शहादा तालुक्यात बंदची हाक
Saam TV June 12, 2025 04:45 PM
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी मनसैनिक यांनी लावले एकत्र बॅनर

नाशिक गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी महाराष्ट्राकडून सात घालण्यात येत असताना नाशिकमध्ये लागलेले बॅनर चर्चेचा विषय ठरतो आहे निमित्त ठरले आहे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचा वाढदिवस या दोघांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्रित येऊन शुभेच्छा फलक लावले आहे यातून महाराष्ट्रात नव्या पर्वाची सुरुवात असा आशय या माध्यमातून देण्यात आला आहे...

पाटोदा गाव बंद ठेवत बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा

दिव्यांगांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या येवला तालुक्यातील पाटोदा गाव बंद ठेवत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे.

दिव्यांग बांधवांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी देखील त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली आहेत.

पालखी विसाव्यासाठी यंदा जर्मन हंगर मंडप

पालखी सोहळ्यात पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय

पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी पंढरपूरला जातात पावसाळ्यामुळे विसाव्याच्या ठिकाणी गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने यंदा पहिल्यांदा जर्मन हँगर पद्धतीने बारा ठिकाणी मंडप उभारले जाणार आहेत.

वारा पावसातही वारकरी सुरक्षित राहू शकणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जात पडताळणी समित्यांकडे 45 हजार प्रकरणे प्रलंबित

राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितांकडे सध्या 45 हजार प्रकरणे प्रलंबित आहे

शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने समित्यांना तातडीने प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी निकाली काढण्याच्या आदेश देण्यात आले आहेत

संत गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन हिंगोलीत जल्लोषात स्वागत

संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज मराठवाड्यात आगमन झाले आहे ,हिंगोलीच्या सेनगाव शहरात या पालखीचा आज पहिला मुक्काम असणार आहे दरम्यान मराठवाड्यात ही पालखी दाखल होताच आज हिंगोलीकरांनी ढोलताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत संत गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत केले आहे, यावेळी हिंगोलीकरांनी गण गण गणात बोतेचा जयघोष करत उत्सव साजरा केला आहे, उद्या या पालखीचा दिग्रस गावात दुसरा मुक्काम असून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दिग्रस मध्ये दाखल होणार आहेत.

आदिवासी संघटनाच्यावतीने आज शहादा तालुका बंदची हाक

बिरसा फायटर या आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंद नंतर सकाळ पासूनच शहादा शहरातील सर्व दुकाने बंद....

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहादा शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त....

शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटनांनी पुकारला आहे बंद....

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांबद्दल अपशब्द वापरला असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला असून त्यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती गुन्हा दाखल होत असल्याने अखेर आदिवासी संघटनांनी शहादा बंदीची हाक देण्यात आली आहे...

बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप

गुरुकुंज मोझरी मध्ये बच्चू कडू यांचं पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू

डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांच अर्ध दफन आंदोलन सुरू

प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला घेतलं जमिनीत अर्ध घेतलं गाळून

मागण्या संदर्भात फलक हातात घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी

बच्चू कडू यांच अन्नत्याग आंदोलन पेटलं

डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांचं जोरदार अर्धदफन आपण आंदोलन

जो पर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाहीं तो पर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहिल आंदोलन कर्ते ठाम

खामगाव येथील काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेणार प्रवेश

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या सोबतच अजित पवार हे खामगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा सुद्धा घेत आहे. अजित पवारांच्या या मेळाव्याला राज्याचे राष्ट्रवादीचे अनेक मंत्री व नेतेही उपस्थित राहणार आहेत आजच्या मेळाव्यात अजित पवार हे आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं असेल ....

देऊळगावमही व चिखली परिसरात दमदार पावसाची हजेरी

देऊळगावराजा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली तालुक्यातील देऊळगावमही, टाकारखेड, खडकपूर्णा या गाव परिसरात दमदार पाऊस कोसळला, शेतीच्या मशागतीचे कामे सुरु असताना पायस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत..तसेच चिमली तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळला आहे काही ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली असल्याची माहिती आहे

मध्य रेल्वे 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार

पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे 1 जुलै ते 10 जुलै या दरम्यान पंढरपूर व मिरज साठी 80 आषाढी विशेष ट्रेन चालवणार आहे.

नागपूर मिरज विशेष गाड्या 4,नवीन अमरावती पंढरपूर विशेष गाड्या 4, खामगाव पंढरपूर विशेष गाड्या 4, भुसावळ पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या 2,लातूर पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या 10,मिरज कलबुर्गी अनारक्षित विशेष गाड्या 20,कोल्हापूर कुर्डवाडी अनारक्षित विशेष गाड्या 20, पुणे मिरज अनारक्षित गाड्या 16 चालवण्यात येणार

राज्यात 17 जून पर्यंत पावसाचा अंदाज

14 जून पासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार

राज्यात मुंबईसह आसपासच्या भागात थांबलेला मान्सून 14 जून पासून सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे

दरम्यान 17 जून पर्यंत राज्यात वादळी वारे मेघगर्जनेसह विजांच्या कडगडाटासह कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्यमहाराष्ट्र मराठवाडा,विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे

जयगड - खंडाळा मार्गावर जांभारी येथे ट्रकने घेतला पेट

जयगड -खंडाळा मार्गावर जांभारी फाटा येथे चालत्या आयशअर ट्रकने अचानक पेट घेतला.

रात्रीच्या सुमारास ही घटना घडली, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलही तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणली..

त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही..

मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे.

Bhandara: भंडाऱ्याच्या पवनी मध्ये पावसाळ्यापूर्वी नालासफाईला आला वेग

मागील वर्षी पवनी जवळील आसगाव परिसरात अतिवृष्टीने महापुराची स्थिती निर्माण झाली होती आणि त्या स्थितीवर नियंत्रण करण्यासाठी पुन्हा भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संबंधित विभागाची आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्यात आली होती या बैठकीत पवनी तालुक्यातील नाले सफाई चा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर नाले सफाईच्या कामाला वेग आला असून आता टे अंतिम टप्यात आहे.

Dengue: राज्यात चिकुनगुनियाचे ७४१, डेंग्यूचे १५९० रुग्ण दक्षतेचे आवाहन

मे २०१४ च्या तुलनेत ३१ में अखेर चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असली तरी राज्यभरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाढीचा धोका पाहता आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिना अखेर राज्यातील चिकुनगुनियाच्या एकूण १३,८५८ तपासण्यांमधून चिकुनगुनियाचे ८३४ रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षी याच काळात चिकुनगुनियाचे ६०७ रुग्ण आढळले होते.

३१ मेअखेर डेंग्यूच्या ३०,०७७ तपासण्यांद्वारे १,८२० रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे.गेल्या वर्षी याच काळात डेंग्यूचे २,१२६ रुग्ण आढळले होते.

किल्ले शिवनेरी गडावर ७०० पर्यटकांची एकत्रित भेट देऊन शिवगर्जना

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनमधील ७०० पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. जय भवानी जय शिवाजी च्या घोषात गड दुमदुमला. भारत गौरव यात्रेअंतर्गत ही पहिलीच यात्रा असून डॉ. अच्युत सिंग यांच्या नेतृत्वात शिवकार्याचा जागर झाला. शिवनेरीवरील स्वच्छता, निसर्ग आणि शिवजन्मस्थळी भेटीने पर्यटक भारावून गेल्याचे पहायला मिळाले

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये क्यू आर कोड द्वारे होणार कर वसुली

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 263 ग्राम पंचायतीमध्ये प्रयोग

जिल्ह्यातील ग्रामपंचायती हायटेक आणि आधुनिक करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न

यामध्ये भोर तालुक्यातील सर्व 156 गाव व जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येपुढील 107 गावाचा समावेश आहे.

यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर शिंदेवाडी गावाच्या ग्रामपंचायतीत हा प्रकल्प राबवण्यात आला त्याच्या यशा नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे गावातील कर भरण्यासाठी आता नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. क्यू आर कोड वापरून ते आपला ग्रामपंचायत कर भरू शकणार आहेत.

बच्चू कडू यांचा मुलगा देवाही वडिलांसोबत अन्नत्याग उपोषणाला बसला

प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू हे सलग चार पंचवार्षिक आमदार होते, बच्चू कडू यांना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे,तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह 17 मागण्यासाठी बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे, तर वडील अन्नत्याग आंदोलनाला बसल्याने त्यांचा मुलगा देवा सुद्धा वडिलांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी, शेतमजूर अपंगांसोबत खाली बसून अन्यत्याग आंदोलन करीत आहे... कुठलाही बडेजाव न करता सर्वसामान्यप्रमाणे श्रीमंताचा आव न आणता बच्चू कडूचा मुलगा देवा अन्नत्याग आंदोलन करत आहे, गेल्या 24 तासापासून देवाने कणभर अण्ण सुद्धा खाल्लं नाही... देवा हा पुण्याला एमबीएचं शिक्षण घेतो

पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीकडून महापालिकेत आंदोलन

गंगाधाम चौकातील अपघातानंतर कार्यकर्ते संतप्त,अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

मार्केटयार्ड येथील गंगाधम चौकातील अपघातानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीच्यातीने महापालिकेत तीव्र आंदोलन करण्यात आले.

जखमी व्यक्तीची वेशभूषा करत व प्रातिनिधिक स्वरुपात खेळण्यातील ट्रक अधिकाऱ्यांना देत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चौकात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

कोंढव्यावरून आलेल्या ट्रकचे तीव्र उतारावर चालकाकडून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

कार्यकर्त्यांनी थेट पथ विभागामध्ये जाऊन पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले.

कार्यकर्त्याने डोक्याला पट्ट्या बांधून अपघातग्रस्त व्यक्तीची वेशभूषा करत या घटनेचा निषेध नोंदविला.

Maharashtra News Live Updates : आज विदर्भात ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

- महाराष्ट्रभरात अनेक जिल्ह्यात मान्सूनच आगमन यंदा मे महिन्याच्या शेवटी झाल्यानंतर विदर्भातील तापमान वाढलं...पण गडचिरोली जिल्ह्यातील दोन तालुके सोडताच मान्सून सक्रिय झाला नाही..

- त्यामुळे हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहेय.

- आज विदर्भात नागपूर, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

- तेच बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा येथे एलो अलर्ट देण्यात आलाय.

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकणे भोवले, 8 जणांना कारणे दाखवा नोटीस

तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून,तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे आढळून आले आहे.यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत,देऊळ कवायत कलम २४ व २५ अन्वये संबंधितांवर नोटीस बजावली आहे.तसेच नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा,मिळालेला खुलासा असमाधानकारक असल्यास तीन महिन्यांची मंदिरप्रवेश बंदी घालण्यात येईल,असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

भर पावसाळ्यात लातूरात पाणी टंचाई.. आठवडा भरापासून नळाला पाणीच नाही

लातूर शहरात मागच्या काही दिवसांपासून नळाला पाणी येणं बंद झाला आहे.. तर काही भागात दहा - बारा दिवस झाले तरी नळाला पाणी पुरवठा होत नाही,. भर पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. यामुळे नागरिक हतबल झाले आहेत., नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागणार आहेत. दरम्यान लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होणे अवघड झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.,पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असल्याचा देखील सांगण्यात येत आहे..

बच्चू कडू यांचे वजन चार किलोंनी घटलं

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस तर अद्याप अन्नत्याग आंदोलनावर तोडगा नाही

बच्चू कडू यांची प्रकृती खालावली...

अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या माध्यमातून सरकारशी बोलणं सुरू

मात्र अद्यापही सरकारचा एकही मंत्री बच्चू कडू यांना भेट देण्यासाठी उपोषणस्थळी आला नाही

बच्चू कडू यांचे वजन चार किलोंनी घटलं

वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडूंची 24 तासात दोन वेळा तपासणी

तोडगा न निघाल्याने बच्चू कडू हे अद्याप आंदोलनावर ठाम

आज बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी छत्रपती संभाजी राजे, शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आमदार रोहित पवार देणार भेट

तर तिवसा,धामणगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर व परतवाडा येथे रास्ता रोको आंदोलन तर डवरगाव गावात प्रहार कार्यकर्त्यांचा स्वतःला जिवंत जमिनीत गाळून घेण्याचा इशारा

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल ताशाच्या गजरात अनोखे अभिवादन

इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर दुबई स्थित असणारे प्रसिद्ध त्रिविक्रम ढोल पथकाने किल्ल्याच्या बुरुजावर सहा वादकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सप्ताहातील शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ढोल ताशाच्या गजरात अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.. रक्षक प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांना साताऱ्यातील प्रतापगडावर निमंत्रित करण्यात आले होते दुबई स्थित असणाऱ्या या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने संपूर्ण आखाती प्रदेशामधील मानाचे पहिले ढोल ताशा पथक होण्याचा लौकिक मिळवला आहे.. बाहेर देशातून प्रतापगडावर येऊन वादन करणारे हे पहिलेच ढोल ताशा पथक ठरले आहे..

उदगीर मध्ये अनधिकृत खताचा साठा जप्त. पोलिसात गुन्हा दाखल... कृषी विभागाची कारवाई...

लातूरच्या उदगीर येथे कृषी विभागाच्या पथकाने अनधिकृत खाताचा साठा जप्त करत, कारवाई केली आहे... दरम्यान या कारवाईत तब्बल 6 लाख रुपयांचा अनधिकृत खत जप्त केलाय... उदगीर येथे शेतकऱ्यांना खत विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.,कृषी विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत तब्बल 345 बोगस खताची पोते जप्त केला आहे... तर या प्रकरणी उदगीरच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..

दरम्यान पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरात बोगस खत बी बियाणे पडू नये याकरिता कृषी विभागाचे 11 पथक तैनात करण्यात आले आहेत..

अजित पवारांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच मतभिन्नता;

निधी वाटपावरून अनके मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली जात असतानाच शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच आता मतभिन्नता असल्याचं समोर आले आहे.

शिवसेनेचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत असा थेट आरोप करत त्यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र अजित पवार यांच्या सारखा अर्थ मंत्री सर्व राज्यांना लाभावा अशी स्तुती केली आहे. अजित पवार यांच्या विषयी शिवसेनेच्या दोन मंत्र्यांनी परस्पर विधाने केल्याने शिवसेना मंत्र्यांमधील अंतर्गत धुसफूस देखील या निमित्ताने पुढे आली आहे.

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा येथून हरिनामाच्या जयघोषात दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान...

पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत,राज्यभरातून पांडुरगाच्या भेटीसाठी पालख्या आणि दिंड्या आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.मराठवाड्यातील छोटे पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्यातील भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र अन्वा येथून मानाच्या दिंडीचे हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी पंढरपुढे प्रस्थान झाले आहे. 22 दिवसात ही दिंडी 450 किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहे.जवळपास 272 वर्षापासून ही दिंडी नित्यनेमाने सुरू असून दरवर्षी शेकडो भाविक या दिंडीत सहभागी होत असतात.

इमारत रिकामी करण्यासाठी अतिक्रमण विभागाची धमकी!'

अंबरनाथमध्ये पुनर्विकासासाठी गेलेली इमारत रिकामी करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही पत्रव्यवहार न करता रहिवाशांना थेट धमकी दिल्याचा आरोप नवरे नगर परिसरातील रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी शहरातील अतिक्रमणं हटवायची सोडून बिल्डरांचे एजंट म्हणून काम करू लागले आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दरवर्षी एक हजार नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पर्यावरणाच्या दृष्टीने आणि इंधन बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करणे ही एसटी महामंडळासाठी काळाची गरज आहे. त्यासाठी आता दरवर्षी किमान 1000 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे ,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपुरात दिली.

एका खाजगी कंपनीला 5150 इलेक्ट्रिक बस तयार करण्याचा ठेका दिला आहे .परंतु त्या पुरवठा कंपनीने आतापर्यंत फक्त 220 इलेक्ट्रिक बसेस परिवहन विभागाला दिल्या आहेत . इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दरवर्षी किमान 1000 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येतील. एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव देखील दिला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरात आषाढी यात्रा तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक बस गाड्या विषयी माहिती दिली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस...अनेक घरांचे नुकसान

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये अचानक आलेल्या वादळीवारासह मुसळधार पाऊस झाला यासह नांदरुण या भागामध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलेले होते.तर रामतीर्थ येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसडली व गोरगरीब जनतेच्या घराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने ढगफुटी ठिकाणी पाहणी केली आहे तर ज्या जनतेच्या घरांचे नुकसान झाले आहे त्या जनतेला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वारकऱ्यांच्या सुख सुविधांसाठी प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू

आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अठरा जूनला देहातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुख सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. स्वच्छतेची कामे युद्ध पातळीवर करण्यात येत असून वारकऱ्यांना अडचण होऊ नये यासाठी नगरपंचायत च्या वतीने, अतिक्रमण हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नगरपंचायत च्या वतीने सीसीटीव्ही सुद्धा लावण्यास सुरुवात केलेली आहे. भाविकांच्या स्वच्छतेसाठी बाराशे मोबाईल टॉयलेट शासनाच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे. इंद्रायणी घाट, देहूतील सर्व रस्त्यांची साफसफाई सुरू असून इंद्रायणी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची डाग डुगी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे.. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू मध्ये दाखल होत असताना त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून एस आर पी एफ, एन डी आर एफ, आर सी बी, आणि स्थानिक पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे महिलांची छेडछाड, सोन साखळी चोरीचा प्रकार होऊ नये यासाठी महिला दामिनी पथकाचीही एक तुकडी तयार करण्यात आलेली आहे. पालखी दरम्यान कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी साध्या वेशात पोलीसही तैनात करण्यात आलेली आहे

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची शक्कल

नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांमुळे अनाधिकृत इमारती मोठ्या प्रमाणात उभा राहत आहेत अशाच प्रकारे बेलापूर मधील शहाबाज गावातील निर्मल भवन

पाच मजली इमारत अनाधिकृत आहे मात्र महानगरपालिकेने नोटीस बजावून सुद्धा तसेच बिल्डरवर गुन्हा दाखल झाला असताना सुद्धा मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ नोटीस देण्याचा काम केलं जातं त्यामुळे अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याची शक्य लढवली आहे केवळ पालिकेकडून नोटीस बजावली जाते मात्र कारवाई केली जात नाहीये त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बिल्डिंग उभा राहत आहेत

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.