टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाने टाकले असे फासे, 20 दिवसात खेळणार 8 सामने
GH News June 12, 2025 09:19 PM

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून सलग दुसऱ्या जेतेपदाची अपेक्षा आहे. भारताने वेस्ट इंडिज अमेरिकेत भरवलेल्या 2024 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. आता तशीच अपेक्षा 2026 टी20 वर्ल्डकपमध्ये आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारताने एक खास रणनिती आखल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया व्हाइट बॉल मालिका खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध व्हाइट बॉल मालिका खेळणार असल्याचं बोललं जात आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. ही मालिका 11 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. यात तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका असणार आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप आधीच असल्याने फायदेशीर ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंड संघालाही स्पर्धेपूर्वी भारतीय खेळपट्ट्यांचा अंदाज घेण्याची संधी मिळेल. न्यूझीलंड संघाच्या खेळाडू मालिकेनंतर थेट टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी उतरतील. सध्या भारतीय टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवली आहे. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म जबरदस्त आहे. असं असताना सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. पहिल्यांदाच 20 संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्यामुळे 55 सामने होण्याची शक्यता आहे. लढाई आणखी चुरशीची होणार यात काही शंका नाही.

आयपीएल 2025 स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे काही खेळाडूंना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संधी मिळू शकते. दरम्यान, भारतीय क्रीडारसिक न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेची वाट पाहात आहे. कारण या मालिकेत अनुभवी आणि युवा खेळाडूंचा तालमेल पाहायला मिळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वनडे संघातून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.