घाटनांदूर - शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपणात विजेचा प्रवाह सोडलेल्या विजेच्या तारांचा झटका लागून एक युवक मृत्यू पावल्याची घटना (ता. १३) शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली आहे.
येथील शिवारातील शेतात धनंजय राजाभाऊ जाधव (वय-२४) हा गेला असता शेतात जनावरांसाठी पेरण्यात आलेल्या कडोळाचे डुकरं हरणे व अन्य वन्यप्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कूपनास विजेचा प्रवाह रात्री सोडण्यात आला होता.
परंतु सकाळी हा विजेचा प्रवाह बंद करण्याचे वडिलांच्या लक्षात न राहिल्याने कुंपणाच्या तारा विजेचा प्रवाह सुरू होता. दरम्यान (ता. १३) शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान धनंजय जाधव हा शेतात गेला होता.
त्याला कूपनाच्या तारेत विजेचा प्रवाह सुरू असल्याचे माहिती नसल्याने विजेचा प्रवाह सोडलेल्या तारास चिकटून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, स्वामी रामानंद तीर्थ सरकारी ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छदसाठी दाखल करण्यात आले आहे.