धनकवडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती
बसमध्ये लाईट बंद होती
बसमध्ये सुमारे 55 ते 60 प्रवासी गुराढोरासारखा प्रवास करत आहेत
या अशा प्रवासासाठी प्रवाशांनी जास्त पैसे मोजायचे का? पीएमपी प्रशासन नक्की कुणासाठी काम करतात?
याचे उत्तर सीएमडी पुणेकरांना देणार आहेत का?
त्यांचा संवाद अशा गर्दीच्या बसमध्ये होणार आहे का ?
असे प्रश्न उपस्थित करुन पीएमपी प्रवास तिकीट दर वाढीचा निर्णय़ मागे घेण्याची मागणी करत आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकींना सुरुवातबैठकीत कोविड, वारी, पुण्यातील पाऊस, पुणे शहरात गेले काही दिवसात झालेली अपघात यासह इतर विषयावर बैठक
पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यासह बैठकीला उपस्थितीत
Solapur: पावसामुळे अरळीचा पूल वाहून गेला; गावकऱ्यांचे वाहत्या पाण्यात आंदोलनसर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे.यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला आहे.येथील अरळी-दर्शनाळ-मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने गावच्या सरपंच, उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यात उतरून आंदोलन केलय.
रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने ही घटना घडली.गेल्या अनेक वर्षापासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून आजतागायत याबाबत कोणीही दखल घेतलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भिमाशंकर आणि भोरगिरी परिसरात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरुयभिमाशंकर भोरगिरी परिसरातील आदिवासी शेतकरी भात रोपे टाकण्याच्या कामात गुंतले असून, शेतात दिवसरात्र मेहनत सुरू आहे.डोंगरमाथ्यावर शेतशिवारात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतीकामांना चांगले बळ मिळत आहे. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून, भातशेतीसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेतीकामात मग्न झाले आहेत.
लोहारा तालुक्यातील जेवळीसह परिसरातील साठवण तलाव ओव्हरफ्लोधाराशिव च्या लोहारा तालुक्यातील जेवळीसह परीसरात मेघगर्जनेसह झालेल्या धुवाधार पावसामुळे परीसरातील नदी नाले दुथडी भरुन वाहिल्याने जेवळीसह परिसरातील गावातील साठवण तलाव पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.अनेक वर्षानंतर मृग नक्षत्रातच तलाव ओसांडून वाहत असुन ठिकठिकाणच्या गावातील पाणीप्रश्न सुटण्यासाठी मदत झाल्याने नागरीकात समाधान व्यक्त केल जात आहे.
मनसेचा रत्नागिरी नगरपरिषदेवर धडक मोर्चारत्नागिरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा रत्नागिरी नगर परिषदेवरती धडक मोर्चा काढलाय.रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात या आशाखाली मोर्चा काढण्यात आला.यावेळी नगरपरिषदेसमोर मनसे कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते
Pune: पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल..वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा.
वाढत्या कोरोना रुग्णावर आरोग्य अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवली बैठक..
बैठकीला विभागीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त पुणे मनपा आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित..
Ajit Pawar Visit Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातसकाळी 8 वाजता विधानभवन येथे अधिकारी बैठक आणि गाठीभेटी
तर 10 वाजता जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रम शुभारंभ कार्यक्रमाला गणेश कला क्रीडा येथे उपस्थितीत राहणार
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थितीत राहणार
जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी वाजणार बिगुलनिवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग
२०११ च्या जनगणनेनुसार गट-गण.
मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील भंडारा व गोंदिया हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सर्व पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर यांसह ३२ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट-गण रचना तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात गट आणि गणांची रचना करण्यासाठी २०११ जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे.
Maharashtra Live News: पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा फडकला दक्षिण आफ्रिकेतपुणे शहर पोलीस दलाचे सहायक पोलीस आयुक्त (ACP) साईनाथ ठोंबरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेली ९० किमीची कॉम्रेड मॅरेथॉन सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि तेही फक्त ११ तास २१ मिनिटांत
ही मॅरेथॉन जगातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठेच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. साईनाथ ठोंबरे हे पुणे शहरातून अशी कामगिरी करणारे एकमेव पोलीस अधिकारी आहेत.
त्यांच्या या यशामुळे पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर डौलाने फडकला आहे. ठोंबरे यांच्या जिद्द, शारीरिक क्षमतेचे आणि धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही कामगिरी फक्त पोलीस दलासाठी नव्हे, तर संपूर्ण पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरत आहे.
Pune news: पुण्यात क्वीन्स गार्डन परिसरात वीज कोसळण्याची घटनापुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता वीज कोसळण्याची घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
काल सायंकाळी सहा वाजून सुमारास शहरात जोरदार पाऊस झाला.
विजेच्या कडकडाटासह एक ते दीड तास पाऊस बरसला. दरम्यान, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन जवळील क्वीन्स गार्डन परिसरात वीज कोसळण्याची घटना घडली.
वीज कडाडताना मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली.जुने शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) व विभागीय आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरातच वीज कोसळली. याबाबत अग्निशामक दलाच्या लोहियानगर येथील नियंत्रण कक्षात नागरिकांनी खबर दिली. त्यानंतर नायडू अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोचले. त्याचवेळी महावितरण कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोचले.
वीज कोसळलेल्या ठिकाणी सुदैवाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
शहरात रात्री मुसळधार पाऊस, उपनगर भागांत अनेक ठिकाणी पाणीच पाणीक्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळापूर्व कामांची चालढकल उघड.
भारतीय हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
काल उपनगरीय भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
शहरात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर, सायंकाळी उशीरा उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या.
मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, आंबेगाव बु,, नन्हे, बिबवेवाडी, सिंहगडरस्ता, कोथरूड, बावधन,औंध, बोपोडी, पाषाण आणि सूस या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला.
उपनगरय भागात बहुतांशी ठिकाणी मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर पाण्याची तळी साचली होती.
क्षेत्रीय कार्यालयांकडून पावसाळापूर्व सफाइची कामे झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले, रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांची तारांबळ उडाली.
तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज 108 फुट मुर्ती चा मुद्दा, 17 तारखेला मुंबईत बैठकतुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देतानाची 108 फुट उंच मुर्ती तुळजापूर येथील रामदरा तलावात उभारण्यात येणार आहे.
या मुर्तीच्या स्वरुपासह तुळजाभवानी विकास आराखड्याबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी सर्व आमदार व जिल्हा स्तरीय समीतीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी माता भवानी तलवार देतानाची मुर्ती ही द्विभुजा असावी असावी अस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले
तर मंदिर संस्थानने जो आराखडा बनवला आहे त्यामध्ये मुर्ती अष्टभुजा दाखवली आहे.
दरम्यान या सर्व बाबीवर बैठकीत चर्चा होणार आहे
श्री विठ्ठल रूक्मिणीची चंदनउटी पुजेची सांगता; मंदिर समितीला 35 लाख रूपयाचे उत्पन्नविठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेची मोठ्या भक्तीभावाने सांगता करण्यात आली. चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चंदन उटी पूजा तब्बल 76 दिवस करण्यात आली. यासाठी 95 कीलो इतका चंदनाचा वापर करण्यात आला.
ग्रीष्मऋतूतील वाढत्या उन्हापासून श्रीविठुरायाला शीतलता मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे.
विठ्ठल व श्री रूक्मिणीमातेची चंदनउटी पुजा सदस्या ॲड माधवी निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. चंदन उटी पूजेच्या माध्यमांतून मंदिर समितीला सुमारे 35 लाख 13 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मेडशी ते मुंगळा रस्त्यावर खड्ड्याचा धोका; सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्षवाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी ते मुंगळा या रस्त्यावरील मार्गावर मेडशीजवळील एका मोठ्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलेला आहे.
या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असते.
प्रवाशीधारक व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी जागेची पाहणी केली खरी, मात्र खड्डा बुजविण्याची कोणतीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज 7 वा दिवसकाल महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला
बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर अद्यापही ठाम.. आज तोडगा निघणार का याकडे लक्ष?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू व या समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं
तर आज बच्चू कडू प्रहारचे प्रमुख पदाधिकारी व ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्याशी बोलून आंदोलन सोडायचं की पुढे करायचं यावर घेणार निर्णय
तर आज सकाळी 10 वाजता मंत्री उदय सामंत तर दुपारी 2 वाजता मंत्री पंकजा मुंडे देणार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट
अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडू करणारा आज सायंकाळी महत्त्वाची घोषणा
शेतकरी कर्जमाफी व बच्चू कडूच्या इतर मागण्या संदर्भात उद्या सत्ता पक्ष वगळता,विरोधी पक्ष,शेतकरी संघटना,सामाजिक संघटना यांनी दिला आहे राज्यभरात रास्ता रोकोचा इशारा
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळणार15 ऑगस्ट रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करायचं सध्या तरी नियोजन आहे
मात्र विमान सेवा ऑगस्ट शेवटी रोजी सुरू केली जाईल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 80 ते 85 काम पूर्ण झाला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलं जाणार आहे यादृष्टीने आमचे आणि सरकारचे प्रयत्न आहेत
याबाबत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याशी बातचीत केले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा बाबत
Sangli: विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाणसांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी येथे ग्रामपंचातीच्या विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जखमीकडून करण्यात आला आहे.
वडडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये गावाच्या विकास कामावरून प्रश्न उपस्थित केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये पाच ते सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Uday Samant: उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सोलापूर जिल्हा दौरा रद्दअपरिहार्य कारणामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दौरा करण्यात आला रद्द
आज दिवसभर उद्योग मंत्री उदय सामंत हे होते सोलापूर दौऱ्यावर
जिल्हा परिषद निवडणुकीचाही उडणार बार, शासनाचे पत्र धडकले, 18 ऑगस्टला होणार प्रभाग रचना अंतिमओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
मात्र न्यायालयाने निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यानंतर थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद व 16 पंचायत समितीच्या पारूप प्रभाग रचनेचे वेळपत्रक राज्य शासनाने जाहीर केले
त्यामुळे लवकरच जिल्ह्यातही नगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे
न्हावा गावातील हवाई सुंदरीच्या निधनानंतर प्रीतम म्हात्रेंची पाटील कुटुंबीयांना भेटअहमदाबाद विमान दुर्घटनेत न्हावा गावातील एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या निधनामुळे उरण तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांनी पाटील कुटुंबीयांच्या न्हावा येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दुःखात भरडलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले.
“आमच्या सात गावांपैकी एकुलती एक मुलगी एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. तिचा अपघाती मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.
पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी येथे आलो आहे.”
Panvel: शॉक लागल्याने तीन म्हशींचा मृत्यूमहावितरणच्या तुटलेल्या केबलचा शॉक लागल्याने आकुर्ली येथील रमेश म्हसकर यांच्या तीन म्हशींचा मृत्यू झाल्याची घडली.
म्हसकर यांनी आकुर्ली- चिपळे हद्दीत म्हशी चरण्यासाठी नेल्या होत्या. यावेळी महावितरणची केबल तुटलेली असल्याने तिचा शॉक लागून तीन म्हशी मृत्युमुखी पडल्या. म्हशींच्या मृत्यू प्रकरणी महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
वन खात्याकडून पर्यटनाला चालन, पाचशे रुपये कोटीची तरतूद मँग्रोजवर उभारणार बोर्डवॉकराज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करायला सुरुवात केली आहे त्यानुसार मॅग्रोजवर बोर्डवॉक करण्यात येणार आहे
एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची निर्मिती होणार आहे. हे उद्यान सर्वसामान्यांना आकर्षित आणि शिक्षित करेल, अशी रचना तयार करण्यात येत आहे
राज्यात दहा ठिकाणी मॅग्रोजवर बोर्डवॉक
रायगड नवी मुंबई ठाणे बोरिवली पालघर इत्यादी ठिकाणी केले जाणार आहे
साधारणपणे 500 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे
त्यामुळे पर्यटनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे याबाबत मंत्रालयात आढावा बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडले
नंदूरबार जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखावादळी वाऱ्याने शहादा तालुक्याला झोडपलं....
मध्यरात्री जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस.....
महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या जोडणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक एकवर झाडे पडल्याने वाहतुकीस अडचण....
चक्रीवादळामुळे मोठी मोठी झाडे उलमडून पडली....
विजेच्या खांबावर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित....
राज्य मार्ग क्रमांक एकवर कोसळली अनेक झाडे....
नंदुरबार जिल्ह्याला दुर्गम भागाला जोडणारे लहान रस्ते बंद....