इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले झाल्यानंतर सगळ्या जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी आहे. इस्रायलने गुरुवारी रात्रा आणि शुक्रवारी सकाळी इराणमधील विविध अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले केले. इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखणं या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इरणच्या अणवस्त्र प्रकल्पांच नुकसान झाल आहेच. पण आता चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या अणवस्त्र प्रकल्पातून रेडीएशन लीक होत असल्याचा इन्कार केला होता. पण आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सीने यूएनला दिलेली माहिती हादरवून टाकणारी आहे.
इराणच्या नतांज अणवस्त्र प्रकल्पावर एकदिवसापूर्वी इस्रायलने हल्ला केला होता. इराणने म्हटलेलं की, हा हल्ला वर पुष्ठभागावर झालाय. त्यातून न्यूक्लियर रेडीएशन लीक होण्याची शक्यता नाहीय. पण आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सी IAEA चे प्रमुख रॉफेल ग्रॉसी यांनी इराणने दिलेल्या खोटया माहितीचा पदार्फाश केलाय. इस्रायली हल्ल्यानंतर इराणी अणूभट्टीवर बाहेरुन नाही, पण अंतर्गत रेडिएशन सुरु झालय, असं रॉफेल ग्रॉसी म्हणाले.
कशामुळे न्यूक्लियर रेडिएशन लीक?
IAEA चीफ ग्रॉसी यांनी सांगितलं की, इराणच्या नतांज अण्विक तळावर हल्ला करुन त्याच्या वरच्या भागाला नष्ट करण्यात आलय. या हल्ल्यामुळे जमिनीच्या आत साठवून ठेवलेल्या यूरेनियम संवर्धनाच कुठलही नुकसान झाल्याची शक्यता नाहीय. पण तरी सुद्धा साइटवर न्यूक्लियर रेडिएशन सुरु झालय. हल्ल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे सेंट्रीफ्यूज प्रभावित होऊ शकतात. त्यामुळेच न्यूक्लियर रेडिएशनच लीकेज सुरु झालय.
कुठपर्यंत पोहोचलय रेडिएशन लीक?
नतांज अण्विक तळाच्या आसपास बाहेर अजूनपर्यंत हे रेडिएशन पोहोचलेलं नाही. पण अंतर्गत सतत त्यामध्ये वाढ होत आहे, असं IAEA ने म्हटलं आहे. ग्रॉसी म्हणाले की, “आत्ताच योग्य व्यवस्था केली, काळजी घेतली तर हा धोका टाळता येऊ शकतो. त्यांनी सर्वच पक्षांना संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे” इस्रायलकडून अशीच कारवाई सुरु राहिली, तर इराणवर त्याचे गंभीर परिणाम होतील.
इराणचा दावा काय?
इराणच्या अणूऊर्जा संस्थेने दावा केलाय की, कुठलीही गळती झालेली नाही. इराणचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी सर्वकाही ठीक असल्याचा दावा केला. लवकरच पुन्हा संचालन सुरु होईल. ग्रॉसी यांनी सांगितलं की, इराणी अधिकाऱ्यांनी अण्विक प्रकल्प प्रभावित झाल्याची माहिती दिली. ग्रॉसी म्हणाले की, “हा घटनाक्रम चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही देशाच्या अण्विक तळांना लक्ष्य करु नये”