इराण इस्त्राईल युद्ध: इस्रायल आणि इराणमध्ये सध्या युद्ध (Iran Israel war) सुरु आहे. दोन्ही देशांकडून ऐकमेकांवर हवाई हल्ले सुरु आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांचं नुकसान होत आहे. दोन्ही देशातील तणाव सतत वाढत आहे. याचा मोठा परिणाम इतर देशांवरही होताना दिसत आहे. या युद्धाचा थेट परिणाम आता कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत आहे. जर हा तणाव कायम राहिला तर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 150 डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतात. याचा मोठा फटका भारत देशालाही बसण्याची शक्यता आहे.
इस्रायली क्षेपणास्त्र इराणवर पडताच, शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे 7 ते 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 78.5 डॉलर्सवर आली आहे. त्यानंतर ती सुमारे 75 डॉलर्सवर आली आहे. प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतार सारखे देश समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत, जर इराण आणि इस्रायलमधील तणाव संपला नाही, तर होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर ज्या मार्गाने रिफाइंड उत्पादने किंवा एलएनजी पुरवले जाते त्या मार्गाने तेलाचा पुरवठा थांबू शकतो. भारत या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. अशा परिस्थितीत जर या देशांकडून तेलाचा पुरवठा थांबला तर मोठे संकट उद्भवू शकते. एकीकडे देशात तेलाच्या किमती वाढतील, महागाई वाढेल, तर दुसरीकडे भारताला पर्याय शोधावा लागेल.
यापूर्वीही जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली होती. रशियाने सुमारे 15 लाख बॅरल तेलाचा दररोजचा पुरवठा थांबवल्यामुळे ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरवर आली होती. या लढाईमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीसह शेअर बाजारातही चढ-उतार होऊ शकतो.या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपयाचे मूल्य ही घसरू शकते. जहाजांनी माल पाठवण्याचा खर्च वाढू शकतो .या सगळ्या गोष्टींचा भारतावर काय परिणाम होईल हे आत्ताच सांगणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थ मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था बाजारपेठांवर लक्ष ठेवून आहेत .आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडत आहे हे ते पाहतील. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्यामुळे भारत अशा कोणत्याही समस्येला सहजपणे तोंड देऊ शकतो .भारताचे जास्त नुकसान होणार नाही या युद्धाचा फटका इतर गोष्टींच्या किमतीवर फार काळ टिकणार नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा