माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.
एका वृद्ध महिलेसह उदय सामंताच्या हातून पाणी घेत हे उपोषण स्थगित केले गेले.
मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेटून राज्य शासनाच्या वतीने त्यांना आश्वासन दिले.
राज्य शासनाच्या आश्वासनानंतर काही अटींसह बच्चू कडूंनी उपोषण स्थिगत करत असल्याची घोषणा केली.
यावेळी मंत्री सामंत यांनी कडू यांच्या मुद्य्यांबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील असे आश्वासन त्यांनी दिले.
आमचे आंदोलन हे जात किंवा धर्म याच्याशी निगडित नसल्याने ते अतिशय अवघड होते. त्याला प्रतिसाद मिळणे अतिशय कठीण होते.
मात्र राज्यभरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला, असं कडू यांनी सांगितले.
मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही कडूंनी दिला.