नागपूर - ‘एकीकडे राज्यात लाखोचे कोटींचे प्रकल्प होत आहेत, मुंबईतील जमीन एका उद्योजकाला देण्यात येतात मग शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला दिसत नाही का? शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का?’ अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना यांनी केली.
ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन केले.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी काँग्रेसची देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या बच्चू कडू यांना आमचा पाठिंबा आहे. समिती नेमण्यापेक्षा सरकारने कर्जमाफी करावी.’