इराण इस्त्राईल संघर्ष: इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला असून शुक्रवारी रात्री (13 जून 2025) उशिरा शेकडो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इजरायल ने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने हा हल्ला केला आहे. वऑपरेशन टरू प्रॉमिस 3 ‘ असे या कारवाईला नाव देण्यात आले आहे. इज्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का ?आणखी संघर्ष वाढला तर भारताला नुकसान सहन करावे लागू शकते का ? पाहूया… (Israel Iran War)
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम नसला तरी जर हा संघर्ष आणखी वाढला तर भारताला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .दोन्ही देशांमधील परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात येत आहे.
इकॉनोमिक टाइम्सच्या वृत्तानुसार,या लढाईमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात.शेअर बाजारातही चढ-उतार होऊ शकतो.या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपयाचे मूल्य ही घसरू शकते. जहाजांनी माल पाठवण्याचा खर्च वाढू शकतो .या सगळ्या गोष्टींचा भारतावर काय परिणाम होईल हे आत्ताच सांगणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .अर्थ मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था बाजारपेठांवर लक्ष ठेवून आहेत .आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडत आहे हे ते पाहतील.
भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे त्यामुळे भारत अशा कोणत्याही समस्येला सहजपणे तोंड देऊ शकतो .भारताचे जास्त नुकसान होणार नाही या युद्धाचा फटका इतर गोष्टींच्या किमतीवर फार काळ टिकणार नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
दरम्यान इराण आणि इजरायल च्या या तणावात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार कोसळला होता .जगभरातील शेअर बाजार कोसळत असल्याने इस्रायल आणि इराण मधील तणावामुळे गुंतवणूकदार घाबरले होते .त्यामुळे अनेकांनी पैसे काढून घेतले . सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 0.7 टक्क्यांनी घसरले होते . डॉलरच्या तुलनेत रुपये आहे कमकुवत झाला आहे .रुपयाचे मूल्य 0.6 % ने घसरून 86.09% वर पोहोचले .डॉलरची किंमत अधिक होत असल्याने असं घडल्याचं सांगण्यात येत आहे .
इज्रायलच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 12 टक्क्यांनी वाढवून प्रति बॅरल 78.5 डॉलर्स एवढा झाल्या .पण नंतर किमती कमी होऊन 75 डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली आल्या . इजरायल आणि इराणच्या तेल प्रतिष्ठान वर हल्ला केला नसल्याने हे घडल्याचे सांगण्यात येते .
इज्रायल आणि इराणच्या या हल्ल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊ शकते अशी भीती आहे . हा जगातला अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे ज्या मार्गावरून जगातील सुमारे 20% तेल जाते .जर इराणने असं केले तर जहाजांनी वस्तू पाठवण्याचा आणि विमा मिळवण्याचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढू शकतो .याचा परिणाम भारतावरही दिसतो .त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे .याच्यासोबत इतर देशांमधून भारतात येणाऱ्या वस्तूंच्या किमतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे .
हेही वाचा
आणखी वाचा