मधुमेह हा जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. पूर्वी हा आजार वृद्धापकाळातील आजार मानला जात होता, परंतु गेल्या 10 वर्षांत मुले आणि तरुणांनाही या आजाराची लागण होत आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांना या आजाराची लक्षणे माहित नाहीत. हा आजार गंभीर झाल्यावरच कळतो. यूएस सीडीसीच्या राष्ट्रीय मधुमेह स्थिती अहवालात असे म्हटले आहे की 38 दशलक्ष अमेरिकन लोकांना (सुमारे 11.6%) मधुमेह आहे; यापैकी 20% लोकांना स्वतःला हे माहित नाही की त्यांना हा आजार आहे. कारण लोकांना त्याची लक्षणे माहित नाहीत.
मधुमेहाचा शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो. मधुमेहामागील मुख्य कारणे म्हणजे अनुवंशिक असतो किंवा वाईट जीवनशैलीमुळे तरी आहेत. मधुमेह झाल्यावर शरीरात इन्सुलिनचे उत्पादन आणि वापर प्रभावित होतो. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. मधुमेह कोणत्याही वयात होऊ शकतो. जर कुटुंबातील एखाद्याला मधुमेह असेल तर तो होण्याची शक्यता खूप जास्त असते. या आजारापासून बचाव करण्यासाठी, त्याच्या लक्षणांबद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे.
बहुतेक रुग्णांमध्ये मधुमेहाची कोणती तीन लक्षणे दिसून येतात?
दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे युनिट प्रमुख डॉ. सुभाष गिरी म्हणतात की,
1) मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये थकवा, वारंवार लघवी होणे आणि जास्त तहान लागणे यांचा समावेश आहे.
2) रात्री लघवीची समस्या जास्त असते आणि रात्री जास्त तहान लागते. दिवसाही दर अर्ध्या तासाने लघवी करण्याची इच्छा असते.तथापि, ते व्यक्तीपरत्वे अवलंबून असते.
3) काही लोक दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळा आणि रात्री अनेक वेळा लघवी करतात. तर काही लोक दिवसा जास्त वेळा लघवी करतात.
परंतु मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे सामान्य आहेत. अशा परिस्थितीत, त्यांना दुर्लक्षित करू नये.
मधुमेह टाळण्यासाठी काय करावे
डॉ. सुभाष म्हणतात की जर तुम्हाला मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे जाणवली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी तपासण्यासाठी एक चाचणी लिहून देतील. ही चाचणी करून घ्या आणि जर साखरेची पातळी जास्त असेल तर तुम्ही तुमची दिनचर्या आणि आहार बदलला पाहिजे. तुम्ही साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. यासोबतच, तुम्ही नक्कीच चालायला हवे. दिवसातून किमान 15 मिनिटे चालावे.तेही वेगाने. किंवा तुम्हाला जसं शक्य आहे त्या वेगाने चाला.
शिवाय तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचा आहार आणि दैनंदिन दिनचर्या बदलणे देखील महत्त्वाचे आहे आणि जर औषधांची आवश्यकता असेल तर ते सुरू करा.