भारत सरकारने बहुप्रतिक्षित असलेल्या जनगणनेसंदर्भातील औपचारिक घोषणा केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे आता जनगणनेच्या तयारीला आता अंतिम रूप दिले जात आहे. यंदाची जनगणना अनेक बाबतीत विशेष ठरणार आहे.
गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जनगणनेची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, यंदा नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदवण्याची सुविधा मिळणार आहे. स्वगणनेच्या माध्यमातून नागरिक आपली वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती थेट सरकारच्या अधिकृत पोर्टलवर भरू शकणार आहेत. जनगणना प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि सुलभ बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.