पुणे : भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) पदवी अभ्यासक्रम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘त्यांनी’ इयत्ता आठवीपासूनच प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. जेईई मेन, त्यानंतर जेईई ॲडव्हान्समध्ये देशपातळीवर चांगले स्थान पटकाविले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवत यश संपादन केले आहे.
पुण्यातील तनय गाडगीळ, सिद्धांत पाटणकर, ध्रुव नातू आणि अनुज पगार यांनी ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम गट) परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळविले आहेत. तनय याला जेईई मेनमध्ये १,१६८ क्रमांक, तर जेईई ॲडव्हान्समध्ये १,५४३ क्रमांक मिळाला आहे. तनय म्हणतो, ‘‘इयत्ता आठवी-नववीपासून मी प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे.
मागील दोन वर्षांपासून दररोज आठ ते नऊ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास केला आहे. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून मला रसायनशास्त्र अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे आहे. अभ्यासातील सातत्य आणि शिक्षणाबाबत मिळालेले योग्य मार्गदर्शन, यामुळे हे यश मिळाले आहे.’’
जेईई ॲडव्हान्समध्ये २९३ क्रमांक मिळालेला ध्रुव नातू याला सीईटी परीक्षेतही १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. तो म्हणतो, ‘‘लहानपणापासूनच गणित हा विषय पान १० वर