Maharashtra Live News Update : बदलापुरात ज्वेलर्स दुकानात चोरीचा प्रयत्न, चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद
Saam TV June 17, 2025 07:45 PM
वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने दोन युवक आक्रमक

महावितरणच्या वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी तेथील टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली तसेच सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. आमच्या भागात वीज व्यवस्थित राहत नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता नियमित वीज पुरवठा का होत नाही असा सवाल दोघांनी उपस्थित करत थेट कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सध्या दोघे आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहे.

बदलापुरात ज्वेलर्स दुकानात चोरीचा प्रयत्न, चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद

बदलापुरातल्या कात्रप परिसरात देवराज ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. रात्री तीनच्या सुमारास दोन ते तीन चोरटे गाडीतून आले. त्यांनी दुकानाचे शटर तोडलं आणि दुकानात प्रवेश केला. मात्र त्याचवेळी दुकानाचा सायरन वाजला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी लगेचच तिथून पळ काढला. दरम्यान दुकानाचे मालक त्या ठिकाणी पोहोचले मात्र त्यापूर्वीच चोरटे पसार झाले होते. चोरट्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणी पातळीत वाढ

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण तालुक्यात दाणादाण उडाली असून वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. धोकादायक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.

निवडणूक प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांच्या अर्जावर निर्णय राखून

- दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून जिंकलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध काँग्रेसचे प्रफुल गुडधे, मोहन मते यांच्या विरोधात गिरीश पांडव चंद्रपूरच्या चिमूर मधून जिंकलेले बंटी भांगडीया यांच्याविरुद्ध सतीश वारजूरकर

- बल्लारपूर मधून विजय झालेल्या सुधीर मनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोष सिंग रावत, राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे यांनी उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल केली आहे.

- "निवडणूक आयोगाने ईव्हीएम द्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही"

- त्यामुळे या विजयी उमेदवारांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

- या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पाच आमदारांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

- याप्रकरणी सोमवारी हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली आणि या अर्जांवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे, भाजप सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही.. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे.. त्यामुळे विरोधाची भावना असते.. आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे. सोलापूरकरांना गजानन महाराजांच्या पालखीचे वेध

सोलापूरकरांना संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वेध लागले आहेत. आषाढी सोहळ्यासाठी रविवार दिनांक 29 रोजी शहरात पालखी दाखल होईल. सोलापुरात येणाऱ्या मानाच्या दिंडीमध्ये संत गजानन महाराज पालखी सोहळा महत्त्वाचा मानला जातो. वर्षानुवर्षे सोलापूरकरांना पालखी सोहळ्याची कायम प्रतीक्षा असते. संत गजानन महाराजांच्या अध्यात्मिक कार्य प्रत्येक कुटुंब पर्यंत पोहोचलेले आहे. मात्र प्रत्यक्षात शेगाव हे संत गजानन महाराजांची स्थान सोलापूर पासून शेकडो कि.मी अंतरावर आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात संत गजानन महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाची संधी भक्तमंडळी सोडत नाही.

मानाची पालखी असलेल्या संत नामदेव महाराजांची पालखी निघाली

विठुरायाच्या पंढरी मध्ये मानाची पालखी असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून प्रस्थान झाले आहे आज सकाळी ही पालखी निघाली असून हजारोच्या संख्येने महिला पुरुष वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत दरम्यान आज हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे, श्रींचे अश्व या पालखीला प्रदक्षिणा घालत पुढे पालखी प्रस्थान होणार आहे हिंगोली पालिकेच्या वतीने या रिंगण सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून नागरिकांनी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या रिंगण सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.

वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती आज होणार बीडच्या विशेष न्यायालयासमोर वकिलांचा युक्तिवाद

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड यांच्या मालमत्ता चल उचल संपत्ती जप्त करण्यासंदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडनं अर्ज करण्यात आला आहे या अर्जावरती आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे यामध्ये सरकारी पक्षाचे वकील सहाय्यक बाळासाहेब कोल्हे युक्तिवाद करणार आहे तर आरोपी पक्षाकडून विकास खाडे हे न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार असून वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याचबरोबर आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सातवी सुनावणी होणार आहे या सुनावणीसाठी उज्वल निकम हे गैरहजर असणार असल्याची माहिती समोर आली आहे तर त्यांच्या जागी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे काम पाहणार आहेत. वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भाच्या अर्जावरती आज बीडच्या न्यायालयात कामकाज चालणार आहे.

मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वेत इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचा ढिगारा खचला

मातीचा ढिगारा खचल्यामुळे मातीखाली दोन कामगार अडकले

मातीखाली अडकलेल्या दोन कामगारांपैकी एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला एका कामगाराला अग्निशमन दलाचा जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे

दुसऱ्या जखमी कामगाराला विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित

मयत कामगाराचे नाव सोनेलाल प्रसाद वय 27 वर्ष आहे

संध्याकाळी चार कामगार काम करत असताना अचानक त्यांच्यावर माती खचली

बियाण्याच्या दराने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले

लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाला असून, काही शेतकऱ्यांनी अखेर पेरणीला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने ,ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. यंदा देखील जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन आणि तूर पिकाचा पेरा केला जाणार आहे... तर बाजारात 26 किलो वजनाच्या सोयाबीन देण्याचा दर 3 हजार ते 3 हजार 500 रुपये आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या सोयाबीन मलाला बाजारात 4 हजार 400 रुपयाचा प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे... त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव आणि बाजारात बियाण्यांचा भाव गगनाला भिल्याने, शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आले आहेत.

पंढरपूरला रेल्वेने दोन हजार भाविक रवाना

जळगाव महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव असलेल्या पंढरपूर यात्रेसाठी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार भाविकांना विशेष रेल्वेने -रवाना करण्यात आले. ही यात्रा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित झाली आहे.

१८ जून पंढरपूर मुक्कामानंतर ही रेल्वे १९ जून रोजी परत येणार आहे. मतदारसंघातील कोणताही भाविक विठ्ठल दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठीच हा उपक्रम राबवला आहे. कार्यकर्त्यांचे योगदान अंमूल्य असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात दरड कोसळण्याचा धोका

खेड घाटात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागमोडी वळणाचा डोंगरातुन बायपास तयार करण्यात आलाय मात्र या घाटात डोंगर कड्याचे काम अर्धवट अवस्थेत असून दरडींचे संरक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे पाऊसात डोंगरकड्यांवरून दरड थेट महामार्गावर कोसळण्याचा धोका निर्माण झालाय डोंगरकड्यांचे संरक्षणासाठी आवश्यक असलेले स्टील जाळी, काँक्रीट संरचना आणि सुरक्षात्मक उपाय केलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पावसाच्या सुरुवातीच्या सरींमध्येच दगड-माती महामार्गावर कोसळू लागल्याने अपघाताचा धोका वाढलाय या मार्गावरून सध्या अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा बायपास वापरण्यात येतो आहे.

Maharashtra Live News Update : पावसाळ्यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले

मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे... बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घातल्याने भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे... शेवगा, 100ते 80 रुपये प्रति किलो... मेथी 30ते 40 रुपये पेंडी, शिमला 80ते 70 रुपये प्रति किलो.. तर दोडका 70 रुपये प्रति किलोचा दराने भाव खात आहे., त्यामुळे सामान्य नागरिकांना वाढलेल्या भाजीपालांच्या दरामुळे चांगलाच फटका बसला आहे..

Maharashtra Live News Update : पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी पातळी वाढली

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस

पुण्याला पाणी देणाऱ्या धरणातील पाणी पातळी वाढली

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणे मिळून ९ टक्क्याने पाणी पातळीत वाढ

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

खडकवासला: ५६.२२ टक्के

पानशेत: १६.८१ टक्के

वरसगाव: २५.३४ टक्के

टेमघर: ३.४३ टक्के

चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: २१.५३ टक्के

मागील वर्षी (आजच्या तारखेला) चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: १२.०१ टक्के

रायगडमधील आंबा आणि कुंडलीका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या आंबा आणि कुंडलीका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

० रोहा परिसरात खाडीला मिळणाऱ्या आंबा आणि कुंडलीका या दोन्ही नद्या इशारा पातळी इतक्या पातळीवरून वाहत आहेत

० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या सवित्री, पाताळ, उल्हास आणि गाढी या मोठ्या नद्या इशारा पातळी खालून वाहत आहेत

० जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट असून पाऊस कमी अधीक प्रमाणात बरसत आहे

मांजरा धरण साठ्यात वाढ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात १८ टक्क्यांवर गेलेले पाणी आता २८ टक्क्यांपर्यंत आले आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासोबतच पावसाळ्यातही पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे... यामुळे शेतकऱ्यांतून देखील समाधान व्यक्त होत आहे.

लातूर शहर, एमआयडीसी, कळंब व अंबाजोगाई या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना धनेगाव येथील मांजरा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.. तर लातूर ,बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांची जलदायिनी म्हणून मांजरा धरणाची ओळख आहे... दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ होत, असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे..

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी सहा तहसीलदारांना बजावल्या नोटिसा

जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 तलाठी 5 ग्रामसेवक आणि 5 कृषीसहायकांनी तब्बल 40 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे . दरम्यान या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सध्याचे आणि बदली करून गेलेल्या अशा सहा तहसीलदारांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागितले आहेत.तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहायक आणि क्लर्क यांना देखील नोटिसा बजावून खुलासे मागितले आहे.त्यामुळ अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्यानंतर सहा तहसीलदारांसह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे..

संभाजीनगरात तिघांवर चाकूहल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा येथे गुरुवारी तिघांवर चाकूहल्ला झाला होता. यानंतर एका टोळक्याने दुकानांचे शटर आणि घराचा दरवाजा तोडून साहित्याची नासधूस करत दुचाकी पेटवून दिली. या गंभीर घटनेनंतर भाजप आमदार संजय केणेकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर याप्रकरणी रात्री वैजापूर पोलिसांत ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अजूनहीआमदार संजय केणेकर यांनी सोमवारी दुकान आणि घरांची पाहणी केली. चाकूहल्ल्यातील संशयित आरोपी गौरव अनर्थे गोरक्षक आहे. त्याने गोरक्षणाचे स्टेटस ठेवल्यामुळे त्याला ५० जणांनी मारहाण केली. बचावावेळी ही घटना झाल्याचे केणेकर यांनी सांगितले. घटनेला मूळ कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या हल्ल्यामुळे नवनाथ पत्नी आणि मुलांना घेऊन घराच्या मागील दरवाजाने निघून गेले. टोळक्याने दरवाजा तोडून घर आणि दुकानातील फर्निचर पेटवून देत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच जमावाने विजय त्रिभुवन यांच्या पाण्याच्या मशीन आणि टाक्या फोडल्या. गौरव अनर्थे यांची दुकान फोडून दुचाकी पेटवून दिली. जमावाने तिघांचे दुकान आणि दुचाकी पेटवून सात लाखांचे नुकसान केले.

आदिवासी पट्ट्यातील घाटघर येथील फडके बंधारा ओव्हरफ्लो

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतल्या या बंधाऱ्यातून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार असुन पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतीच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळालाय यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर परिसरातील निसर्गसौंदर्य खुलल्याने आणि धबधबे, हिरवाई फुलल्याने पर्यटकही या भागाकडे आकर्षित होत आहेत. सध्या घाटघर परिसरात पर्यटकांची गर्दी होत असून, स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पंढरपुरात चंद्रभागा नदीवर समांतर पुल उभारण्यात येणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

मावळ येथील पुल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलाचा मुद्दा समोर आला आहे.

येथील जूना दगडी पुल हा धोकादायक असून या ठिकाणची जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथे नवीन पुल उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढच्या वर्षभरात येथे नवीन समांतर उभा राहिल . सोलापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिश कालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

त्रिशूलने केला पारुच्या बछड्याचा गेम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तथा लगतच्या बफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्यात अधिवास तथा मादीकरिता संघर्षही शिगेला पोहचला आहे. अशाच एका संघर्षात एका नवतरुण वाघाचा मृत्यू झाला. वाघिणीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तिच्या मुलाला ठार करण्यात आले. याच कारणावरून मागील महिन्यात ताडोबाचा किंग छोटा मटका व ब्रम्हा नावाच्या वाघाची झुंज झाली आणि त्यात ब्रम्हाचा मृत्यू झाला होता. तर आता ताज्या घटनेत चिमूर बिटातील नर वाघ त्रिशुल व पारू वाघिणीचा बछडा यांच्यात झुंज झाली. त्यात बछड्याचा मृत्यू झाला. चिमूर वनपरिक्षेत्राअतंर्गत येत असलेल्या शेडेगाव परिसरात पारू नावाची वाघीण आपल्या नऊ महिन्याच्या बछड्यासोबत वास्तव्यास आहे. इथे येऊन त्रिशुलने पारूच्या मुलावर हल्ला चढवला. ताकदवर त्रिशूलपुढे नऊ महिन्यांच्या नवयुवक वाघाचा निभाव लागू शकला नाही. आणि तो यात मारला गेला. बछड्याचे तोंड पूर्णपणे फुटल्या अवस्थेत तथा पाय व मानेला जखमा दिसून आल्या.

मुंबई गोवा महामार्गावर पीर लोटे येथे उड्डाण पुलावर तडे

मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ठ कामाचा आणखी एक नमुना समोर आलाय कळंबणी पाठोपाठ पीर लोटे येथे देखील पुलावर रस्त्याला तडा गेल्या आहेत.लोटे औद्योगिक वसाहत ते परशुराम घाट भागात पीर लोटे येथे असणा-या उड्डाण पुलावर रस्त्याला ही मोठी तडा गेलीय परशुराम घाटाच्या सुरुवातीला, गोव्याकडे जाणाऱ्या बाजूच्या पुलाता तडा गेल्या महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभं राहतय.

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड

सातार्यात ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे.मसाप, शाहूपुरी शाखा,मावळा फौंडेशन यांच्या मागणीनुसार साताऱ्यात संमेलन होणार आहे.मराठ्यांची चौथी राजधानी साताऱ्यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.