सांगलीत धर्मांतराला कंटाळून ऋतुजा राजगे यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरानंतर धर्मांतर विरोधी कायदा तातडीने आमला आणावा, अशी लोकांकडून केली जात आहे. ऋतुजाच्या आत्महत्यनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. धर्मांतरासाठी कोणी आलं तर ठोकून काढा,असं भाष्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिने ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तसेच यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही,असा इशारा दिला.
'धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा. ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडी शर्यतीप्रमाणे दोन लाख, तीन लाख,पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असं पडळकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?ऋतुजाचं २०२१ साली सुकुमार राजगे याच्याशी झालं. लग्नाआधी ऋतुजा ही हिंदू धनगर होती. परंतु लग्नानंतर धर्मांतर करण्याठी तिच्यावर दबाव होता, असा आरोप मृत ऋतुजाच्या आई-वडिलांनी केलाय. देवाच्या पाया पडायचं नाही, असा उल्लेख पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आहे. ऋतुजा राजगे ही ७ महिन्यांची गरोदर होती. ऋतुजाने गरोदर असताना तिने टोकाचे पाऊल उचललं. त्यानंतर पोलिसांनी राजगे कुटुंबाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड करत आहेत.