राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आले आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिले जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, विद्यार्थी जी मागणी करतील, ती तिसरी भाषा देऊ असे त्रिभाषीय सूत्रावर शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Ajit Pawar : तुकाराम महाराजांच्या पालखीचे होणार प्रस्थानदेहू येथील मंदिरात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी अजितदादांनी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आढावाही घेतला.
Raj thackeray : राज्यातील महायुती सरकारला दिला इशाराकेंद्रात मोदींची सत्ता तरी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. राज्य सरकार भाषा का लादत आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला केला आहे. दादरच्या शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
Raj Thackeray : हिंदी सक्ती मनसे खपवून घेणार नाही - राज ठाकरेमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरणावर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले आज मी शैक्षणिक धोरणाशिवाय कशावरही बोलणार नाही. मी जे बोलणार आहे ते सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये असा निर्णय घेतला आहे की पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा. मी पहिलं पत्र काढलं होतं एक उजळणी म्हणून पुन्हा एकदा ते पत्र वाचून दाखवतो, असं म्हणत त्यांनी आपलं जुन पत्र वाचून दाखवलं. यावेळी त्यांनी आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असं म्हणत जुनं पत्र वाचून दाखवलं आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Sudhakar Badgujar : भाजपच्या शंभराहून अधिक जागा निवडून येणार - सुधाकर बडगुजरकालच भाजपमध्ये प्रवेश केलेले ठाकरेंच्या शिसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी महापालिका निवडणुकीत भाजपच्या शंभराहून अधिक जागा निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आता भाजपचे वरिष्ठ सांगतील ते करणार. महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते आदेश देतील ते करणार. भाजपच्या शंभराहून अधिक जागा निवडून येणार."
Shivsena UBT Vs Narendra Modi : ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेतठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-3' या पुरस्कारावरून टीकास्त्र डागलं आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्यांच्या कपाळावरचे सिंदूर पुसले, त्या लाडक्या बहिणींचा बदला पूर्ण झाला काय हे सायप्रस मुक्कामी शांती राग आळवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करायला हवे. कश्मीरात भाजपने राजकीय विचका केला व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पचका केला. मोदी यांना सायप्रस देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. तो गळ्यात घालून ते भारतात परत येतील तेव्हा 26 लाडक्या बहिणींच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरची आठवण त्यांनी ठेवावी. सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला आहे
PM मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी देखील मोदींनी दिलेल्या निमंत्रण स्वीकारलं असून त्यांनी भारतात येण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. तर ट्रम्प यांनी देखील PM मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे.
kedarnath helicopter crash : केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबियांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणाररविवारी (15 जून) केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी जयस्वाल या तिघांवर आज वणीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Raj Thackeray : राज ठाकरेंची आज तातडीची पत्रकार परिषदमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे आज सकाळी 11.30 वाजता दादर येथील शिवतीर्थावर एका तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
MNS And Shivsena UBT : ठाकरेंची शिवसेना अन् मनसे आज एकत्र येणारआज मनसे आणि ठाकरेंची शिवसेना इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. आज11 वाजता प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे वरळी विभाग अध्यक्षांच्या उपस्थितीत हे आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्ही एकदा जोर आला आहे.
Ashadhi wari 2025: तुकाराम महाराजांच्या पालखी आज देहूतून प्रस्थान करणारजगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीआज बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra education policy : पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असणार तृतीय भाषाराज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य असेल असा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे आता इथून पुढे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे.