नारंगी बायपास रस्त्यावर मालवाहू गाडीचा बिघाड झाल्याने रस्त्यातच गाडी बंद
किलोमीटर पर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक
शाळेच्या वेळेत टेम्पो बंद पडल्यामुळे किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी
दोन तासाच्या वाहतूक कोंडीचा फटका बसला शाळकरी मुलांना
मुख्य वर्दळीच्या रस्त्यात टेम्पो बंद पडल्यामुळे झाली वाहतूक कोंडी.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे पुराचे पाणी रस्त्यावर० आंबा नदीने धोका पातळी ओलांडली
० आंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी नागोठणे बाजार पेठ, ST स्टँड परिसरात घुसले
० पुराचे पाणी शिरल्याने नागोठणे ST स्टँड रिकामे करण्यात आले
० बाजार पेठेत पुर पहाण्यासाठी त्याच बरोबर जिवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी नागरीकांची गर्दी
शेतीच्या बांधावरून होणाऱ्या वादासाठी पोलिस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम...!बीड जिल्ह्यात शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाला आळा बसण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलिस आपल्या बांधावर हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाला आता हा बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे याविषयी काय म्हणतात पोलीस अधीक्षक नवनीत कावत आपण पाहूया...
बीड जिल्ह्यात आता शेतातील वादांना आळा बसणार आहे. कारण पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलिस आपल्या बांधावरचा अभिनय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून शेतातील तंटे सोडविले जाणार आहेत.
नाफेडच्या कांदा खरेदीचा यंदा पुन्हा खेळखंडोबा?- अर्धा जून महिना संपला तरी अद्याप नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात नाही
- नाफेड आणि NCCF कडून यंदा करण्यात येणार आहे ३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी
- नाफेडकडून एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ४५ टक्के तर जूनमध्ये उर्वरित ४५ टक्के कांदा खरेदीचं ठेवण्यात आलं होतं उद्दिष्टं
- मात्र जून महिना संपत आला, तरी अद्याप नाफेडकडून कांदा खरेदीला मुहूर्त नाही
- मागील वर्षी देखील बॅक डेटेड कांदा खरेदी दाखवून नाफेडच्या कांदा खरेदीत समोर आला होता कोट्यवधींचा गैरव्यवहार
फडतरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ – महिन्यात तीन हल्ले, सीसीटीव्हीत बिबट्या कैदफडतरवाडीत कृष्णा जाधव यांच्या वस्तीवर बिबट्याने महिन्यात सलग तीन वेळा हल्ला करत दोन कुत्रे आणि एका वासराचा बळी घेतला आहे.पहिल्या दोन घटनांनंतर जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि अखेर रात्री बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे.या घटनेनंतर वनविभागाला माहिती देण्यात आली असून त्यांनी ठसे तपासले आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात न आल्याने जाधव कुटुंबीयांसह गावकरी भीतीच्या छायेत असून, बिबट्याला कधी पकडणार? असा सवाल उपस्थित करत आहेत.
Pandharpur: पंढरपुरात आज उद्या पाणी पुरवठा बंद राहणार..आषाढी यात्रेच्या निमित्ताने वीज दुरुस्तीची कामे सुरू...
वीज पुरवठा बंद राहणार असल्याने शहरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार...
आज आणि उद्या सकाळी आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही....
नागरिकांनी पाणी जपून वापरावे...
नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन...
Vikhroli Bridge: विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर मोठी वाहतूक कोंडीउड्डाणपूला खालील चौकात ही मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याकारणाने उड्डाण पुलावर देखील आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत
मात्र विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलामुळे काहीशी वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र ही वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे
माऊलींच्या पालखी प्रस्थान वेळेत बदल, रात्री ८ वाजता होणार प्रस्थानसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला असुन रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान ठेवण्यात येणार आहे
माऊलींच्या पालखीची प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आल्याने माऊलींची विवथ गुरुवारची पालखी प्रदक्षिणा झाल्यानेच आषाढी वारीचे पालखी सोहळा संजीवन समाधी मंदिरात रंगणार असुन रात्री ८ वाजता माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवेल..
अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पावसाची दांडीभर पावसाळ्याच्या ऋतूत शेतकऱ्यांची पीक जगवण्यासाठी तुषार सिंचन लावून धडपड...
अनेक ठिकाणी पावसानं खंड दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याचे चित्र....
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी सिंचनाच्या माध्यमातून जगवताय आपल्या शेतातील पीक..
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता..
समृद्धी महामार्गावर प्रवाशी बसवर दगडफेकखाजगी प्रवासी ट्रॅव्हलवर लुटारुंची दगडफेक
समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने वारंवार वाहनांवर आणि प्रवाशांवर हल्ले
दगडफेकी मध्ये वाहन चालक जखमी, यापूर्वी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर आले होते
समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना चोरट्यांची भीती
पुणे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणीपुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यावर पाणी
सकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी
धायरी सिंहगड रोडवर झाली वाहतूक कोंडी
पुण्यात सिंहगड रोड परिसरात पाणी साचलंपुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पुण्यातला सिंहगड रोड परिसरात हिंगणे खुर्द मध्ये टेकडीवरून येणार पाणी येत आहे. धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. या भागात काही घर आहेत त्या घरांची पाणी शिरल्याची माहिती आहे.शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली.
हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले; परिसरात शोकाकुल वातावरणअहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिचे पार्थिव आज तिच्या डोंबिवलीतील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
न्यू अमिया सोसायटी, डोंबिवली (पूर्व) येथे मृतदेह आणण्यात आला.
परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीय व नातेवाईकाना अश्रू अनावर
तिचे मित्र-मैत्रिणी, शेजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
ही दुर्दैवी घटना 12 जून रोजी घडली होती. आठवड्यानंतर तिचे पार्थिव काल तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते
रायगडमध्ये शाळांना सुट्ट्या० रायगडमध्ये जोरदार पाऊस
० हवामान खात्याच्या आतीवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शाळा कॉलेजला जाहिर केली सुट्टी
० जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी
० उत्तर रायगडमधील खोपोली, पेण, रोहा परिसरात जोरदार पाऊस
० कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
० नदी किनारी रहाणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा
Nashik: नाशिक शहरात शनिवारी पाणीबाणी- येत्या शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद, तर रविवारी सकाळीही कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
- महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरूस्तीसह नवीन वॉल्व्ह, फ्लो मीटर बसवण्याच्या कामासाठी शनिवारी शट डाऊन
- स्मार्ट सिटी कंपनीकडून केली जाणार जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरूस्ती आणि विकास कामं
- शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन
रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारामध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसाने झोडपले
वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी
किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात सरींवर पाऊस.. रात्रीच्या वेळी जोरदार सरी
रत्नागिरीत पावसामुळे 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान...जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालय.अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. 130 कच्च्या व पक्क्या घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान झाले, तर सार्वजनिक मालमत्तांचे जवळपास एक कोटीहून अधिक असे एकूण दीड कोटीचे नुकसान जिल्ह्यात झालेय. या पावसामध्ये पाण्यात बुडून तसेच वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर संरक्षक भिंत कोसळून व अन्य घटनांनी पाच जण जखमी झालेत.
आळंदीत मुसळधार पाऊसाला सुरुवातइंद्रायणी नदीला पाण्याचा वेग वाढल्याने प्रशासन एनडीआरएफ सज्ज झालय
आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना इंद्रायणी काठावर वारकरी पाऊसाचा आनंद घेत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी
२)
Anc :- इंद्रायणी काठी वरुणराजाचे महिलांनी स्वागत केलय
यावेळी माऊलींच्या पालखी सोहळ्याला अभंगवाणीतुन इंद्रायणी काठच्या आळंदीच महत्व अधोरेखित केलय
यावेळी महिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे
३)
Anc :- आळंदीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात उतरु नये असे करण्यात आले
माजी महापौर कमल व्यवहारे यांची घर वापसीकसबा विधानसभा मतदार संघावरून राजकीय रणकंदन माजले, धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पक्ष सोडला होता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती
माजी महिला महापौर म्हणून परिचित असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला त्या कमल व्यवहारे यांची कॉंग्रेस पक्षात घर वापसी झाली
प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ , पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे काही निर्णय चुकले असतील तरी त्यामुळे व्यथित झालेल्या कमल व्यवहार यांना पक्षाने पुन्हा योग्य जबाबदारी देण्याचा आश्वासन दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमल व्यवहारे यांची घरवापसी
सार्वजनिक ठिकाणी अंधारात दारू पिणाऱ्या तळीरामांना पोलिसांचा दणका. 23 जणांना घेतलं ताब्यात.सांगलीच्या मिरज शहरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी दणका दिला आहे.शहरातल्या मार्केट यार्ड मधील जनावरांच्या बाजारामध्ये अंधारात मध्ये प्राशन करणाऱ्या जवळपास 24 जणांना धडक कारवाई करत दारूसह ताब्यात घेण्यात आले आहे.महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत शहरातील अनेक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या तक्रारी नागरिकाकडून करण्यात येत होत्या,त्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लाखांदूर येथील BSNL कार्यालयाच्या आवारात ट्रान्सफॉर्मरला आगलाखांदूर-पिंपळगाव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीचे ठीनगे ट्रांसफार्मर खाली असलेल्या वाढलेल्या पाला पाचोळ्यावर पडल्याने क्षणातच आगीचा वणवा उडाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.धुराचे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ लाखांदूर नगर पंचायतच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या वाहनाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळीच मिळालेली मदत आणि नागरिकांची तत्परता यामुळे मोठे नुकसान टळले.
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने मारली दडीमान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याने पेरणी केली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 16 टक्के इतकी पेरणी झाली आहे. परंतु मागील सात ते आठ दिवसापासून पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात दडी मारली आहे. पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी तुषारच्या साह्याने पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. दरम्यान अजून चार ते पाच दिवस पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागली आहे.
दरोड्याच्या तयारीतील तीन आरोपी अटक तर दोघे फरार, धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईदरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव विमानतळ परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडील एक गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुस,कोयता कार व दो दुचाकी कसा ५ लाख ५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्या आहे.पोलिसांना पाहताच दोन आरोपी दुचाकीवरून पसार झाले या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रास्त गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ही कारवाई केली आहे.
जालन्यात कंटेनरमधून 28 जनावरांची सुटका, सदर बाजार पोलिसांची कारवाईभोकरदनहून जालन्याकडे येणाऱ्या एका कंटेनरमधून पोलिसांनी 28 बैलांची सुटका केली आहे. सदर बाजार पोलिसांनी हि कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे..गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली आहे.पोलिसांनी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे. शेख सलीम शेख सुलतान,शेख अमीर शेख बशीर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून तिसरा आरोपी शेख मुज्जू शेख अयुब पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळं पोलिस आता फरार आरोपीचा शोध घेत आहे
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर बच्चू कडू हे राहणार की नाही राहणार आज फैसला...??बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र केल्याचे प्रकरण...
बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव...
बच्चू कडू यांच्या अपात्रतेवर आज दुपारी न्यायालयात सुनावणी..
बच्चू कडू यांच्या विरोधात दिलेल्या निर्णया विरोधात बच्चू कडूंनी दाखल केली याचिका...
बच्चू कडू यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष..
नाशिक मधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती त्याचाच आधार घेऊन विभागीय सहनिबंधक यांनी बच्चू कडूंना केलं अपात्र.
खडकवासला धरण साखळीतील 7.40 टीएमसी पाणीसाठाखडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता.
म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
खडकवासला 1.28 टीएमसी
पानशेत 2.16 टीएमसी
वरसगाव 3.67 टीएमसी
टेमघर 0.29 टीएमसी
Maharashtra Live News Update: पुण्यात सकाळी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी संततधार पाऊसरायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील खाट विभागात पुढील 48 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय..
पालखी सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज, अनुचित प्रकार टाळण्यासाठी आठ हजार पोलिस तैनातआषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या २० जून ते २३ जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील.
या पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
असा राहील पोलिस बंदोबस्त
अतिरिक्त आयुक्त- ४
पोलिस उपायुक्त - १०
सहाय्यक आयुक्त- २०
पोलिस निरीक्षक- १२८
सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- ५१३
पोलिस अंमलदार- ६१४३
एसआरपीएफ- एक कंपनी
होमगार्ड- १२४०
क्यूआरटी- १२
बीडीडीएस- सहा पथके.
पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास ७१ ठिकाणी राहण्याची सोयमुसळधार पावसामुळे मुळामुठा नदीला पूर आल्यास नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास त्यांच्या निवासासाठी महापालिकेने शहरात ७१ ठिकाणी सोय केली आहे. गेल्यावर्षी नदीला पूर आल्यानंतर नागरिकांच्या निवासाची गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रशासनाने यंदा तयारी करून ठेवली आहे.
या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. हे कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून त्यांना आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करून दिली आहे.
शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यास व मदतीसाठी याठिकाणी संपर्क साधावा ः ०२०-२५५०१२६९२, ०२०-२५५०६८००३, ०२०-६७८०१५०० असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त यांनी केले आहे.
- नागपूरातील २५ वर्षीय सुवर्णा शास्री हिने पहिल्याच प्रयत्नांत न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण- सुवर्णाचं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग २०२२ परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश
- सुवर्णा हिने महाराष्ट्रात आठवा क्रमांक, तर विदर्भातून प्रथम क्रमांक मिळवला
- सुवर्णाने मुख्य परीक्षेच्या पेपर -१ सिव्हिल मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळविले
नवी मुंबईच्या प्रश्नाबाबत ठाकरे गटांकडून अधिकाऱ्यांकडे बैठकानवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली त्यानुसार ठाकरे गटांनी सुद्धा नवी मुंबईतील प्रश्नांसंदर्भामध्ये नवी मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीमध्ये सोसायटीकडून मागण्यात आलेल्या वृक्ष छाटणीच्या परवानगी तत्काळ देण्यात याव्या औषध फवारणी नवी मुंबई शहरात तातडीने करण्यात यावी उद्यान विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साफसफाई केली जात नाहीये अशा विविध मागण्यांसाठी ठाकरे गटांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं.
नवी मुंबईच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडे आज बैठकनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आता मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली त्यामुळे नवी मुंबईच्या प्रश्नांसाठी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे नवी मुंबईच्या प्रश्नांसंदर्भामध्ये बैठकीचा आयोजन करण्यात आलंय या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त प्रश्न ऐरोली काटई नाका उन्नत मार्ग ,महानगरपालिके क्षेत्रातील 500 चौरस फूट क्षेत्रफळाचे घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत ,प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करण्याबाबत शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्प मधील बाधित झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई बाबतमराठी भाषा भवन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न इत्यादी विषयांवर मुख्यमंत्री वनमंत्री गणेश नाईक सिडकोचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी यासाठी मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे.
कंत्राटी कामगारांना तीन महिन्यापासून पगार थकीतनवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कामगारांना तीन महिन्यापासून पगार मिळाला नाहीये तसेच त्यांना पीएफ हा सुद्धा 14 महिन्यांपासून मिळत नाहीये त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे मुलांचे शाळा सुरू झाले आम्ही करायचं काय असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत तसेच ठेकेदारांकडून या कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही येत असा आरोप कामगारांकडून केला जात आहे
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 10 हजार 846 शेतकऱ्यांचे नुकसानधाराशिव जिल्ह्यात यंदा मे महीन्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला याचा फटका फळ पिकांसह बागायती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला.कृषी व महसूल विभागाच्या पथकाने नुकसानीचे पंचनामे केले असता तब्बल 10 हजार 846 शेतकऱ्यांचे 4 हजार 694 हेक्टर 15 आर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.प्रशासनाने शासनाकडे 8 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान आता मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आळंदी चाकण परिसरात मुसळधार पाऊस सुरू- पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदी कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
- वाहनाच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा
- संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होणार
- पालखी प्रस्थानाला पावसाची सकाळपासूनच जोरदार हजेरी..
गोवंश तस्करी उघड 50 गाईसह 2 आरोपी ताब्यात,धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईधाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत 50 गाईसह 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या गाई कत्तलसाठी धाराशिव येथे अकलूज येथून आणल्या असुन पोलिसांनी गाई,वाहन व 2 आरोपीना ताब्यात घेतले आहे. दोन ट्रकमध्ये गाई बांधून कोंबण्यात आल्या होत्या.ज्या चालकांना ताब्यात घेतले आहे त्यांना धाराशिव येथे गाई कुठे सोडायच्या आहेत हे सांगितले होते या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. गोवंश तस्करी करणारी मोठी टोळी धाराशिव शहरात व जिल्ह्यात सक्रीय असुन याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकाने यांनी ही कारवाई केली आहे असुन धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासाळ ओढ्यावरचा पूल पाण्याखाली; गार्डी ग्रामस्थांची गैरसोयपंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील कासाळ ओढ्यावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
येथील ग्रामस्थांनी ओढ्यावर पाईप टाकून तात्पुरत रस्ता तयार केला आहे, पण पावसाच्या पाण्यामुळे हा तात्पुरता पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. कायमस्वरूपी पूल बांधावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
Maharashtra Live News Update: पदमश्री मारुती चिंतमपल्ली यांच्यावर आज सोलापुरात होणार अंत्यसंस्कारआरण्यऋषी पदमश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर आज सोलापुरातील तुळजापूर नाका हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.दुपारी 12 मारुती चितमपल्ली यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर अक्कलकोटरोड वरून निघणार आहे.