मुंबई : आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन किल मी’ असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा मुडदा महाराष्ट्राने आधीच पाडला आहे, मेलेल्यांना काय मारणार असा टोलाही शिंदे यांनी लगावला. ते शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे. आपण बाळासाहेबांचा विचार जिवापाड जपलं. त्यामुळेच शिवसेनेची घोडदौड जोरात सुरू आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या इतके लवकर नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला, पण हिंदुत्व सोडलं नाही. पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाले. बाळासाहेब असते तर यांना उलटं टांगून खालून मिरचीचा धूर दिला असता.
आता यांना मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर गेला. बदलापूरच्या बाहेर गेला.