भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस यशस्वीरित्या आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 359 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत ही सलामी जोडी नाबाद परतली. तर त्याआधी यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि केएल राहुल आऊट झाले. साई सुदर्शन याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी जबरदस्त कामगरी केली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसातील 3 पैकी 2 सत्र आपल्या नावावर करता आली. तर एकमेव सत्र हे बरोबरीत राहिलं.
पहिलं सत्र, 25.4 ओव्हर, 92 रन्स आणि 2 विकेट्स
दुसरं सत्र : 25.2 ओव्हर, 123 रन्स
तिसरं सत्र : 34 षटकं, 144 धावा आणि 1 विकेट